OPERATION THUNDERBOLT :ऑपेरेशन थंडरबोल्ड मोसाद ने युगांडा देशातून इस्राईली नागरिकांना सोडवले :भाग 2

त्या नंतर एका दुसऱ्या ऑपेरेशन विषयी चर्चा झाली. त्या ऑपेरेशन चे नाव होते ऑपेरेशन थंडरबोल्ट आणि सर्वच्या सहमतीने हे ऑपरेशन सुरु झाले.

इस्राईली सुरक्षाबल बंधकांना सोडवण्यासाठी काही मार्गांचा शोध घेत होती पण त्यांना कोणत्याही प्रकारे मार्ग सापडत न्हवता.

मोसाद ला एका नकाशा विषयी माहिती मिळाली तो नकाशा होता. त्याच बिल्डिंग चा ज्या मध्ये आतंकवाद्यांनी बंधकांना ठेवले होते.

त्यानंतर मोसाद ने रेस्क्यू ऑपरेशन ची योजना बनवली.

मोसाद ने त्या लोकांसोबत चर्चा केली जे आतंकवाद्यानी सोडून दिले होते. त्यानंतर मोसाद ला समजले कि आतंकवादी किती आहेत आणि त्यांच्याकडे कोण कोणती शस्त्रे आहेत.

ही सर्व माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ठरवले कि एक सैन्य तुकडी जाईल आणि रेस्क्यू ऑपेरेशन करून वापस येईल.

या कामासाठी इसराईल सेने ची सर्वात महत्वाची कामंडो युनिट ‘सेयेरेट मटकल’ ही जाईल.या युनिट ला लीड करत होते ‘योनातन नेत्यांनाहू’

इस्राईल चे पंतप्रधान :बेलज्यामिन नेत्यांनाहू ‘हे योनातन नेत्यांनाहू चे लहान भाऊ आहेत.

इकडे आतंकवाद्यांनी धमकी दिली होती कि त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 1जुलै पासून बंधकांना मारायला सुरवात करतील.

इसराईल सरकार 30जून ला आतंकवाद्या सोबत बोलणी करण्यासाठी तयार झाले. आणि या मुळे इस्राईल सैनिकांना आणखी तीन दिवसाचा वेळ मिळाला.

त्यानंतर वेळ होती ऑपेरेशन ची पण सर्वात मोठा अडथळा होता युगंडा आणि इसराईल मध्ये साढे चार हजार किमी चे अंतर होते. विमानाला जाऊन वापस येणे हे शक्यच न्हव्हते.

इस्राईल कडे हवे मध्ये रिफ्युलिंग करण्याची क्षमता न्हवती त्यासाठी कोण्यातरी देशाची मदत घेणे आवश्यक होते. त्या देश्यामध्ये जाऊन रिफ्युलिंग करता आले असते.आणि या साठी केनिया देश तयार झाला.

त्यानंतर केनिया मधून एक विमान पाठवून एतांबे विमानतळाचे काही फोटो घेतले त्यामुळे इसराईल कमांडोना अंदाज आला कि विमानतळ कसे आहे आणि युगांडा सैनिकांनी पोजिशन काय आहे.

त्यानंतर इसराईल कमांडो साठी एक चांगली घटना घडली. राष्ट्रपती इदी अमीन हा 3 जुलै ला देशाबाहेर गेला होता.

दुपारी 1वाजून 20 मिनिटे झाली होती. दोन लॉकहिड C-130 हरक्युलीज विमान युगांडा देश्याच्या दिशेने निघाले होते.

या मध्ये 200कमांडो एक ‘काळी मर्सडीज ‘आणि दोन लँड रोवर गाड्या होत्या. एक तिसरे विमान सुद्धा होते ते बांधकासाठी होते. त्यांच्या मागून दोन ‘बोईंग 707’ होते जे फक्त 40फूट उंचावून उडत होते.

प्रत्येक विमानाचे एक काम होते. बोईंग 707 केनिया मध्ये उतरले होते. त्या मध्ये डॉक्टर होते. दुसरे बोईंग हे’ कमांड पोस्ट ‘साठी होते.

मोसाद ला मिळालेल्या माहिती नुसार इदी अमीन हा एक ‘काळी मर्सडीज ‘वापरत होता. आणि त्याच्या गार्ड साठी लँड रोवर होत्या.

त्यांची योजना अश्या प्रकारे होती कि कमांडोचा एक ग्रुप मर्सडीज मध्ये बसून टर्मिनल कडे जाईल म्हणजे विमान तळावर जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना असे वाटेल कि इदी अमीन आला आहे. आणि अश्या प्रकारे कामंडो तिथे पोहचणार होते जिथे बंधक आहेत.

‘एतांबे विमानतळावर ’11 वाजता पहिले ‘हरक्युलीज विमान ‘ उतरले आणि त्याचे दरवाजे पहिलंच उघडलेले होते. कारण कमांडो आणि आतमधील मर्सडीज आणि लँड रोवर गाड्या लवकर बाहेर याव्यात.

काळ्या मर्सडीज मध्ये बसून युनिट जुन्या टर्मिनल कडे रवाना झाली. एक युनिट रणवे वरती होती आणि तिसरी युनिट खाली विमानाच्या सुरक्षेसाठी होती.ज्या मध्ये बंधकांना घ्यायचे होते.

चौथी युनिट होती एतांबे विमानतळावर. जेवढे युगंडाचे विमान होते त्यांना नष्ट करायचे काम या चौथ्या युनिट कडे होते. या मिशन साठी केवळ एका तासाचा वेळ दिला होता त्यामुळे एकाच तसाच मिशन पूर्ण करायचे होते.

ऑपेरेशन थंडरबोल्ट

योनातन नेत्यांनाहू यांची युनिट मर्सडीज आणि लँड रोवर मध्ये निघाली. पण सुरवातीलाच त्यांना एक मोठा अर्थळा निर्माण झाला. त्यांना असे वाटले कि विमान तळावरील गार्ड असे समजतील कि हा राष्ट्रपती इदी अमीन चा काफीला आहे. पण युगांडा सुरक्षा राक्षकांनी त्यांना थांबिवले.

मोसाद कडून एक चूक झाली होती त्यांना माहित न्हवते कि इदी अमीन ने काही दिवसापूर्वी आपली गाडी बदलली आणि आता काळी गाडी नसून पांढरी गाडी आहे.

नेत्यांनाहू यांच्याकडे वेळ खूप कमी होता त्या मुळे त्यांनी त्या गार्ड वरती गोळीबारी करण्याचा आदेश दिला. गोळीबारीच्या आवाजाने विमानतळावरील गार्ड सतर्क झाले. त्यामुळे इसरायली कमांडोना हे काम लवकर उरकायचे होते.

कामंडो टर्मिनल कडे गेले आणि त्यांनी मेगाफोन मधून “हिब्रू भाषेत “एक घोषणा केली.”सर्व जण खाली बसा. आम्ही इसराईली कामंडो आहोत ” आणि त्यानंतर कमांडोनी अंधाधून गोळीबारीला सुरवात केली या मध्ये काही आतंकवादी मारले गेले पण ‘या मैमुनी ‘नावाचा एक मुलगा ज्याला हिब्रू भाषा समजत नसल्या करणानाने मारला गेला. आणखी दोन बंधक सुद्धा मारले गेले.

इसराईल कामंडोनी खूप चपळाईने हे ऑपरेशन पूर्ण केले. सर्व आतंकवाद्याना त्यांनी मारले. पण तोपर्यंत युगांडा सैनिकांनी सुद्धा गोळीबारी सुरु केली या गोळीबारीत युगांडा चे 45सैनिक मारले गेले.

या नंतर कमांडोनी सर्व बंधकांना विमानात बसवले आणि आणि विमानाने उड्डाणं भरली. एका युनिट ने विमानतळावरील युगांडाच्या सर्व विमानाना नष्ट केले. त्यानंतर सर्व कामंडो विमानात बसले आणि इसराईल च्या दिशेने गेले.

या ऑपेरेशन मध्ये इसराईल चे एक कमांडो मारल्या गेले योनातन नेत्यांनाहू. यामुळे इसराईल मध्ये या ऑपेरेशन ला योनातन ऑपेरेशन सुद्धा म्हणतात.

OPERATION THUNDERBOLT

OPERATION THUNDERBOLT :ऑपेरेशन थंडरबोल्ड मोसाद ने युगांडा देशातून इस्राईली नागरिकांना सोडवले:भाग 1

इस्राईल च्या मोसाद विषयी सर्वांनाच माहित आहे.इस्राईल ची मोसाद अशी आहे ती आपल्या शत्रूला जगाच्या कोणत्याही देश्यात जाऊन संपवते.

अश्याच एका मोसाद च्या एका ऑपेरेशन ची कहाणी ज्याने संपूर्ण जग अचंबित झाले. स्थान होते यूंगाडा देश आणि काही आतंकवाद्यांनी एक विमान हैजाक केले. त्यामध्ये 90 इस्राईली नागरिक होते

आतंकवाद्यांना या नागरिकांच्या बदल्यात इस्राईल कडे जे आतंकवादी होते ते मागितले होते.

तर बघूया ऑपेरेशन थंडरबोल्ड.

विमान आतंकवाद्याच्या ताब्यात

तारीख होती 27जून 1976 रविवार चा दिवस होता. इस्राईल ची राजधानी तेल अविव च्या ‘बेन गरियन ‘ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक विमान पॅरिस ला जाण्यासाठी निघाले.

पण मधात ग्रीस ची राजधानी ‘एथेन्स ‘ मध्ये उतरले. जेव्हा एथेन्स मधून विमान निघाले तेव्हा विमानात एक मोठी गडबड झाली. विमानाचे पायलट यांनी एक मोठा आवाज एकाला. त्यांनी एका इंजिनिअर ला आवाजाच्या च्या दिशेने पाठवले. इंजिनिअर ने जेव्हा कॉकपीट चा दरवाजा उघडला तेव्हा समोर एक वेक्ती होती. त्या वेक्ती कडे बघून त्या इंजिनिअर साहेबाचा पार थरकाप उडाला कारण त्या वेक्ती च्या हातात एक रिवाल्वर आणि दुसऱ्या हातात एक हाता बॉम्ब होता.

त्या आतंकी सोबत एक महिला सुद्धा होती. दोघे जण कॉकपीट च्या आत मध्ये घुसले आणि विमान आपल्या ताब्यात घेतले.

त्यांनी विमान लिबि्याकडे वळवण्याचे सांगितले. विमान दिशा बदलून दुसरीकडे जात होते पण नेमके कोठे जाणार हे कोणालाच माहित नव्हते.

काही तासानंतर विमान एका एअरपोर्ट वरती उतरले. जेव्हा विमान उतरले आणि विमानाचा दरवाजा उघडला तेव्हा त्या दरवाज्यातून एक भला मोठा एक वेक्ती विमानाच्या आत मध्ये आला.

जेव्हा ती वेक्ती विमानात आली तेव्हा काही प्रवाश्यांच्या लक्ष्यात आले कि विमान हे युगांडा देशात आहे. कारण विमानात येणारी ती वेक्ती दुसरी कोणी नसून युगांडा देशाचा सनकी राष्ट्रपती यदी अमीन होता.

इदी अमीन ने लोकांना सांगितले आम्ही तुम्हाला सोडण्याव साठी सर्व प्रयन्त करू.

OPERATION THUNDERBOLT

पण प्रवश्यापुढे प्रश्न हा होता कि विमान हाईजाक कोणी केले? तर विमान हाईजाक केले होते जर्मनी ची आतंकी संघटना (RZ)’रिवोल्युशनरी सेल्स’ आणि दुसरी आतंकी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ फिलिस्तिन ‘या दोन आतंकी संघटनानी मिळून हे विमान हाईजाक केले होते.

त्यांचा उद्देश होता त्यांचे 51माणसे सोडवने ज्यामधून 40इस्राईल च्या ताब्यात होते. हाईजाक झालेले विमान युगांडा देश्याच्या ‘एतांबे ‘विमान तळावर उतरले होते.

इकडे इस्राईल सरकार परेशान झाले होते. आणि इस्राईल च्या पॉलिसी नुसार ते आतंकवाद्या सोबत बातचीत करू शकत न्हवते. पण या वेळेला परिस्तिथी खूप वेगळी होती. विमाना मध्ये जवळपास 90 इस्राईली नागरिक होते.

त्या हॉस्टेज झालेल्या लोकांच्या परिवाराचा सरकार वरती दबाव वाढत होता. कारण त्यांना कोणत्याही परिस्तिथीत आपले लोक जिवंत पाहिजे होते. त्यामुळे सरकार ला आतंकवाद्या सोबत बोलणे करावेच लागले.

इस्राईल कडे दोन दिवसाचा वेळ होता कारण आतंकवाद्यानी धमकी दिली होती दोन दिवसात जर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ते लोकांना मारायला सुरवात करतील.

या दोन दिवसात आतंकवाद्यानी आणखी एक काम केले. इस्राईली नागरिकांना बाकीच्या लोकांपासून वेगळे केले. आणि जे इस्राईली न्हवते त्यांना सोडून दिले.

इस्राईल सरकार त्यांच्या वरती आरोप करत होते कि ते फक्त यहूदी लोकांना टार्गेट करत आहेत. आणि ते काही अंशी खरे सुद्धा होते.

पण इकडे जनतेचा सरकार वरती दबाव जरा जास्तच वाढत होता. त्याच वेळेला इस्राईल सेना ने एक आपत्कालीन मिटिंग बोलावली आणि रेस्क्यू ओपॅरेशन विषयी चर्चा केली.

पण इस्राईल पसून युगांडा देश साडे चार हजार किमी दूर आहे. आणि इतक्या दूर ऑपेरेशन करणे सोपे न्हवते आणि शक्यही न्हवते. आनि महत्वाचे म्हणजे विमान कोणत्या ठिकाणी आहे हे इस्राईल च्या सेनेला माहित सुद्धा न्हवते.

मोसाद ची योजना

खूप विचार केल्या नंतर एका ऑपेरेशन विषयी ठरले. ऑपेरेशन ची योजना अश्या प्रकारे होती कि इस्राईली कमांडोना युगांडा च्या ‘विक्टोरिया झील ‘ मध्ये ड्रॉप करायचे आणि यानंतर नेव्ही कमांडो आतंकवाद्याना मारतील.

पण त्यामध्ये प्रश्न असा उपस्तित होता कि इसराईल च्या नागरिकांना वापस कसे आणायचे? कारण युगांडा चा राष्ट्रपती इदी अमीन हा उघड पणे आतंकवाद्या सोबत होता.

त्यासाठी इस्राईल ने इदी अमीन ला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मिश्र देशाचे राष्ट्रपती अन्वर साधात ने इदी अमीन सोबत बोलणे केले. इतकंच काय पण यासर आराफत त्याकाळी फिलिस्तिन चे सर्वात मोठे नेते होते त्यांनी सुद्धा इदी अमीन ला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कोणाचे ही ऐकले नाही.

इस्राईल ने इदी अमीन ला एक प्रस्थावं सुद्धा दिला कि इदी अमीन ने इस्राईल ला मदत केली तर त्याला शांत तेचा नोबेल दिला जाईल. पण इदी अमीन ने सर्व प्रस्ताव पायदळी तुडवले.

इदी अमीन च्या मदती शिवाय हे ऑपेरेशन शक्य न्हवते म्हणून हे ओपॅरेशन रद्द केले.

या पुढची माहिती आपण भाग 2मध्ये बघू

OPERATION THUNDERBOLT

Operation RED DAWN: ऑपरेशन रेड डॉन ज्याने सद्दाम हुसेन ला पकडले

नमस्कार मित्रानो मी अविनाश मी आपल्याला geopolitics मध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना विषयी सांगत असतो.

आज आपण बघणार आहोत इराक या देशाचा तानाशहा सद्दाम हुसेन याला पकडण्याची संपूर्ण कहाणी.

सद्दाम हुसेन याला एका मिशन द्वारे पकडेल त्या मिशन चे नाव होते ऑपेरेशन रेड डॉन.

30मार्च 2003 ला गठबंधन सैनिकांनी सद्दाम हुसेन ला सत्तेपासून बाजूला केले आणि इराकि लोकांना सद्दाम हुसेन च्या जाचापासून वाचवले.

दोन ते तीन आठवड्यामध्ये अमेरिकी जवानांनी इराकची राजधानी बगदाद आपल्या ताब्यात घेतले. पण सद्दाम हुसेन राजधानी बगदाद सोडून पळून गेला.

त्यानंतर इराक च्या सत्तेवर कोणीही न्हवते त्या मुळे सत्तेवर राष्ट्रपती असणे आवश्यक होते आणि ह्यासाठी अपदस्त राष्ट्रपती राष्ट्रपती ठरवण्यासाठी अमेरिकेचे नऊ महिने गेले.

हुसेन यांच्या सत्ते नंतर 4th इन्फेन्ट्री डिव्हिजन ने हुसेन यांचे राहते घर आणि आसपास त्यांची प्रॉपर्टी वरती छापा टाकला.

2003 च्या उन्हाळ्यात अमेरिकी सेना ने गुप्त एजेंट आणि दुभाषिक, HUMINT टीम यांना तैनात केले.

या लोकांनी स्थानिक लोकांची पूछताछ केली आणि सद्दाम हुसेन यांच्या परिवाराची माहिती काढली..

सुरावतीला त्या लोकांचा शोध घेण्याचे ठरवले ज्या लोकांचे नाव “ब्लॅक लिस्ट “मध्ये होते किंवा मोस्ट वांटेड “डेक ऑफ कार्ड्स ” मध्ये होते. त्यांनी सुरवातीला हुसेन चे राष्ट्रपती सचिव आणि काही इराकी नेत्यांना पकडले.

जेव्हा अमेरिकी या लोकांना पकडत होते तेव्हा दूरदूर पर्यंत सद्दाम हुसेन चा पत्ता न्हवता.

तेव्हा त्यांच्या लक्ष्यात आले कि सद्दाम ला पकडण्यासाठी त्यांचे राजकीय सहकारी काहीच कामाचे नाहीत.

त्याउलट सद्दाम हुसेन यांचे वेक्तिगत संबध ज्यांच्या सोबत आहेत त्यांनाच पकडावे लागेल.

4th इन्फ्रेन्ट्री डिव्हिजन, 1st ब्रिगेड चे गुप्त एजेंटांनी हुसेन यांच्या जवळ असलेले परिवार यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांची विचारणा करण्यासाठी एक ‘तीन स्तरीय ‘ रनणिती नेमली.

त्यांनी सद्दाम हुसेन यांच्या जवळच्या परिवारा सोबत व्यक्तिगत संबंध वाढवले. त्यांची विचारणा केल्यानंतर सद्दाम हुसेन विषयी भरपूर माहिती समोर आली.

वेगवेगळ्या स्रोता मधून जी माहिती समोर आली त्यानुसार गुप्त कर्मचाऱ्यांनी अल -मुसलीत नावाच्या बंधुवर लक्ष केंद्रित केले. हे भाऊ म्हणजे हुसेन यांच्या अंग रक्षकापैकी एक होते.

मुसलीत परिवार हा हुसेन यांचा सर्वात विश्वासू आणि जवळचा परिवार होता. कारण त्यांनीच हुसेन यांचे अगरक्षक ठरवले होते आणि ठरवत होते.

11आक्टोबर ला अल मुसलीत च्या सर्वात लहान भावाला पकडले.आणि त्याला 4th id मध्ये नेण्यात आले त्याची विचारणा करताना इब्राहिम अल मुसलीत चा ड्राइवर आणि त्याचा जवळचा मित्र बसीम लतीफ विषयी माहिती मिळाली.

बसीम लतीफ कडून जी माहिती मिळाली ती माहिती खूप महत्वाची होती कारण त्यानंतर हुसेन कोठे आहे याचे धागे दोरे मिळायला सुरवात झाली.

लतीफ याला पुन्हा एकदा पूछताछ करण्यासाठी बोलावले,त्याने यावेळी इब्राहिम अल मुसलीत चा पत्ता सांगितला.

लतीफ याची चौकशी झाल्या नंतर समोरचा घटनाक्रम खूप वेगाने होत होता.

13डिसेंबर ला सकाळी सकाळी टास्क फोर्स 121ने लतीफ द्वारा जे स्थान सांगितले त्या सर्व जागेवर छापे मारले आणि इब्राहिम अल मुसलीत ला पकडले.

इब्राहिम ची जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्याने सांगितले सद्दाम हुसेन तकरिक च्या दक्षिण भागात ‘एड डावर ‘पाशी एका एका शेतात लपला आहे.

त्यानंतर सायंकाळी सहा च्या सुमारात operation रेड डॉन च्या साहाय्याने ब्रिगेड 1,टास्क फोर्स 121,ने टीगारस नदी पासी दोन फार्महाउस वरती छापा मारला पण त्यांना हुसेन सापडला नाही.

त्यानंतर MUMINT ने तो जिथे लपला आहे त्याचा शोध लावला. त्यानंतर 121फोर्स ने ज्या जागी लपला होता त्या जागी जाऊन पकडले.

हुसेन जमिनीखाली एका गड्ड्यात लपला होता जेव्हा टीम तिथे गेली तेव्हा त्या गड्ड्यात सद्दाम हुसेन होता. आणि त्यांतर टीम ने त्याला पकडले.

Operation RED DAWN

Operation Neptune Spear:ऑपेरेशन नेपच्युन स्पेअर ज्याने अमेरिकेने ओसामा बिन लादेन चा खात्मा केला

नमस्कार मित्रांनो मी अविनाश आज आपण बघणार आहोत जगातील मोस्ट वांटेड आतंकि ‘ओसामा बिन लादेन’ च्या खत्म्याची कहाणी.

अमेरिकेचा सर्वात मोठा दुस्मन समजल्या जाणाऱ्या ओसामा बिन लादेन ला शोधण्यासाठी अमेरिकेने बिलीयन डॉलर खर्च केले.

संपूर्ण जग भर ओसामा चा त्यांनी शोध घेतला.

जेव्हा अमेरिकेला समजले ओसामा हा अफगाणिस्तान च्या तोरबोरा पर्वत रांगा मध्ये लपून बसला आहे.तेव्हा अमेरिकेने तोरा बोरा मध्ये एवढे बॉम्ब टाकले कि आसपास भूकंपाचे धक्के बसले होते.

ओसामा बिन लादेन हा 9/11चा अमेरिकेवरील हल्ला झाला. त्या हल्ल्या चा मास्टर माईंड होता.

इकडे अमेरिका संपूर्ण जग पायाखाली घालत होती आणि ओसामा हा पाकिस्तान च्या आबाटाबाद मध्ये लपून बसला होता.

जेव्हा याचा अमेरिकेला सुगवा लागला तेव्हा अमेरिकेने त्याला तिथे जाऊन मारण्याचा एक प्लान बनविला त्या प्लान चे नाव होते. Operation Neptune Spear

बिन लादेन चा शोध

जवळपास दहा वर्ष्यापासून अमेरिकी गुप्तचर यंत्रणा बिन लादेन चा शोध घेण्यासाठी संपूर्ण जग भर फिरत होती.

सप्टेंबर 2010 मध्ये CIA ला सुगावा लागला कि ओसामा पाकिस्तान च्या आबाटा बाद मध्ये आहे. खूप वर्षा नंतर त्यांना ओसामा विषयी थोडी का असेना माहिती भेटली होती.

त्यांना काही फोटो आणि गुप्त रिपोर्ट च्या साहाय्याने माहित झाले कि एक अज्ञात संदेश वाहक पाकिस्तान च्या आबाटाबाद परिसरात नेहमी येत असतो.

त्यांनी काही महिने त्या परिसराची आणि त्या अज्ञात संदेशवाहकाची निगरांनी केली. त्यानंतर CIA ने निष्कर्ष लावला कि बिन लादेन आणि त्याचा परिवार याच भागात राहतो.

पण त्यांच्याकडे कोणताही ठोस पुरावा न्हवता कि बिन लादेन इथेच राहतो. त्याच्याकडे फक्त अनुमान होते.

Operation Neptune Spear

अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात गुप्त मिशन ची सुरवात झाली होती.

तारीख होती 2मे 2011 रात्री ची वेळ होती. अमेरिकी दोन ‘स्टील ब्लॅक हॉक’ हेलिकॉप्टर पाकिस्तान च्या आबाटाबाद च्या दिशेने निघाले होते.

आबाटाबाद हे शहर पाकिस्तान ची राजधानी पासून 35मिल दूर आहे. या ऑपेरेशन मध्ये अमेरिकी नौसेना टीम सहा चे 23 कमांडो होते. एक अनुवादक आणि एक काइरा नावाचा श्वान होता.

रात्री च्या अंधारात अमेरिकी विमान पाकिस्तान मध्ये घुसले. दोन्ही विमान अलग अलग दिशेने होते. पाकिस्तान च्या वेळेनुसार रात्री 12:30 वाजता हे हेलिकॉपर त्या परिसरात आले.

या मिशन साठी नौसेना कमांडोनी खूप अभ्यास केला होता. आता फक्त जमिनीवर उतरून त्या मिशन ला अंजाम देण्याची वेळ आली होती.

पण त्याच वेळेला एक दुर्घटना झाली. दोन हेलिकॉप्टर मधून एक हेलिकॉप्टर परिसरातील त्या 18फूट उंचीच्या भिंतीला धडकले. त्यामुळे पायलट ला सॉफ्ट क्रॅश लँडिंग करावी लागली.

या दुर्घटनेनंतर कोण्याही सील कमांडोला गंभीर जखम झाली नाही. आणि ही टीम ऑपेरेशन साठी त्या बिल्डिंग च्या दिशेने रवाना झाली.

सील टीम अंधारात बिल्डिंग मध्ये ओसामाचा शोध घेत होती. त्यांनी’नाईट व्हिजन गॉगल्स’घातले होते.

त्याच वेळेला ओसामा बिन लादेन चा खास विश्वासू कुरिअर ‘अबू अहमद अल -कुवेती’ ने गार्ड हाऊस दरवाजाच्या मागून फायरिंग केली. या झटपटीत कुवेती मारला गेला.

मुख्य इमारतीच्या आत मध्ये गेल्या नंतर ग्राउंड फ्लोर वरती अल कुवेती चा भाऊ होता त्याला सुद्धा कमांडोने निशाणा बनवले.

त्यानंतर सील कमांडो पायऱ्या चढून वरती गेले तेव्हा तिथे बिन लादेन चा मुलगा खालिद होता त्याला सुद्धा निशाना बनविले.

या ऑपेरेशन च्या वीस मिनिटा नंतर, बिल्डिंग च्या सर्वात वरच्या मजल्यावर एक दाढीवाला उंच माणूस दिसला.

त्याच्यावरती फायरिंग केली पण तो बचावला होता तोच होता ‘ओसामा बिन लादेन ‘.

बिन लादेन आपल्या रूम मध्ये वापस गेला. सील कमांडोणे त्याचा पाठलाग केला त्याच्या रूम मध्ये गेले, त्या रूम मध्ये दोन मुली आणि महिला होत्या. त्या महिलांना सील कमांडोनी बाजूला केले. आणि बिन लादेन वरती गोळ्या झाडल्या.

त्याला दोन गोळ्या लागल्या. एक गोळी डोळ्याच्या वरती आणि दुसरी त्याच्या छातीत लागली.

ही फायरिंग केली त्या कामंडोचे नाव होते ‘रोबर्ट जे ओ निल ‘.

जगातील सर्वात मोस्ट वांटेड आतंकवादी ओसामा बिन लादेन मारला गेला होता. तेव्हा सील टीम ने रेडिओ वरून एक घोषणा केली. “ईश्वरासाठी आणि देशासाठी “गेरोनिमो, गेरोनिमो, गेरोनिमो.

ओसामा बिन लादेन ला पकडण्यासाठी किंवा त्याला मारण्यासाठी हा कोड होता

हे सर्व दास्तावेज एकत्र करून बिन लादेन चा मृत्यूदेह एका body bag मध्ये टाकून सील टीम आपल्या हेलिकॉप्टर कडे रवाना झाली. सील टीम ला त्या बिल्डिंग मधून काढण्यासाठी एक बैकअप हेलिकॉपर आले.

सील टीम ने त्या बिल्डिंग ची संपूर्ण छानबीन केली. त्यात त्यांना कॉम्प्युटर हार्ड ड्राईव्ह, मेमोरि स्टिक, असे भरपूर दास्तावेज सापडले.

त्यानंतर ओसामा बिन लादेन चे शव घेऊन तिथून सील टीम अफगाणिस्तान कडे निघाली.

हे ऑपेरेशन एवढ्या गतीने होते कि फक्त 40 मिनिटात पूर्ण झाले.

सील टीम ने बिन लादेन ची ओळख पटण्यासाठी DNA चे नमुने घेतले. बिन लादेन च्या शवला इस्लामी कायद्यानुसार तयार केले आणि समुद्रात त्याची दफन विधी केली.

जगातील सर्वात मोस्ट आतंकी ओसामा बिन लादेन मारला गेला. आणि अमेरिकेने 9/11चा बदला घेतला.

Operation Neptune Spear

Operation Barbarossa :ऑपेरेशन बारबरोसा ज्याने हिटलर ला आत्महत्या करावी लागली

ऑगस्ट 1939:युरोप मध्ये दुसऱ्या महायुद्धचे वारे वाहत होते.

आणि यातच जर्मनी आणि सोवियत संघ यांच्यात एकमेकांवरती हल्ला न करण्याचा करार झाला होता. या कराराने संपूर्ण जग चकित झाले. कारण दोन्ही देशांचे वैचारिक मतभेद भरपूर होते आणि याच विचाराने काही देश चकित होते.

हिटलर ने जेव्हा पोलंड देशावरती हल्ला केला, तेव्हा सोवीयत रुस ने सुद्धा पोलंडच्या पश्चिम दिशेकडून हल्ला केला त्यानंतर पोलंड देशाचे विभाजन करून पोलंड चा काही भाग हिटलर ने व काही भाग स्टॅलिन कडे होता.

त्यानंतर एक ते दीड वर्ष जर्मनी आणि सोवीयत रुस यांच्या मध्ये चांगली मैत्री होती. दोन्ही देशानी एकमेकांना खूप अर्थसाहाय्य केल आणि या अर्थसाहाय्या मुळे नाझि जर्मनीला चांगलाच फायदा झाला.

सोवीयत रुस जर्मनीला अन्न आणि तेल निर्यात करत होता तर जर्मनी रुस ला तैयार झालेला माल पुरवत होती.

जर्मनीचा फ्रान्स वरती हल्ला

स्टॅलिन चा जेव्हा हिटलर ला सहयोग मिळाला तेव्हा हिटलर ने संपूर्ण ताकतीने युरोपभर आपला विस्तार करण्याची योजना आखली.

1940 ला हिटलर ने फ्रान्स वरती हल्ला करून फक्त पाच ते सहा आठवड्यात फ्रान्स ला पराभूत करून फ्रान्स वरती नाझी झेंडा फडकवला.

पण या विजयानंतर हिटलर ची महत्वकांक्षा जास्तच वाढली. आणि आता पूर्व दिशेला सुद्धा मोहीम आखाण्याची योजना बनवली. हिटलर चा पूर्वीपासूनच सोवियत रुस वरती नजर होती. हिटलर च्या मनात सुद्धा नेहमी विचार येत असे जपान जर सोवियत सारख्या विशालकाय देशाला हरवू शकतो तर आपण का नाही.

हिटलर ‘यहूदी बोल्षेवीकवाद ‘नष्ट करून ‘नाझी प्रभुत्व ‘लादन्याचा प्रयत्न करत होता.

हिटलर च्या नजरेत सोवियत रुस मधील “स्लाविक” जनता ही शूद्रच होती. त्या मुळे हिटलर सोवीयत जनतेला एकदम तुच्छ समजत असे.

ऑपेरेशन बारबरोसा

operation barbarossa

ती तारीख होती 18डिसेंबर 1940 हिटलर ने सोवियत संघा वरती हल्ला करण्याचा आदेश दिला आणि जर्मनीचा तानाशहा अडोल्फ हिटलर ने आपल्या जीवनतील सर्वात मोठी चूक केली.

हिटलर ची योजना होती उत्तरी रुस च्या अस्तरखान बंदरगाह पर्यंत हल्ला करायचा. या मुळे सोवियत च्या जास्तीत जास्त आबादीवर जर्मनीचा कब्जा होईल आणि जर्मनीच्या ताब्यात सोवियत संघाची भरपूर संपत्ती येईल.

22जून 1941 ला सोवियत संघावरती जर्मनीने हल्ला केला म्हणजे ‘ऑपेरेशन बारबरोसा’ सुरु झाले.

माध्यकाळात फ्रेड्रिक बारबरोसा नावाचा एक रोम सम्राट होऊन गेला त्याने जनतेवर खूप अन्याय अत्याचार केले.त्याने नाही नाही ते कर जनतेवर लादले आणि जनतेला खूप हाल हाल करून सोडले त्या अन्यायी सम्राटच्या नावारती हिटलर ने या ऑपेरेशन चे नाव ‘ऑपेरेशन बारबरोसा’ ठेवले.

तब्बल तीस लाख जर्मन सैनिकांनी सोवियत रुस वरती हल्ला केला.

हिटलर च्या या जर्मन सैनिकांकडे 3400टॅंक, 2700 लढाऊ विमान होते. इतिहासातील सर्वात ताकतवान ही फौज होती.

जर्मन सैनिक तीन जागी विभागले आणि सोवीयत रुस वरती हल्ला केला.

‘नॉर्थ आर्मीग्रुप ‘ला लेनिनगार्ड ताब्यात घेण्याचे काम दिले, ही बटालियन लात्विक, लिथुआनिया आणि एस्टोनिया वरती कब्जा करून, लेनीनगार्ड कडे जाईल असे ठरविले.

‘आर्मी ग्रुप साऊथ ‘ ला युक्रेन वरती हल्ला करण्याचे आदेश दिले.

आणि या दोन ग्रुप मध्ये होती ‘आर्मी ग्रुप सेंटर ‘या ग्रुप ला मीन्स्क, स्मोलेन्स्क आणि मास्को वरती कब्जा करण्याची जिम्मेदारी दिली. त्यांच्या योजने नुसार 10 दिवसात रुस वरती संपूर्ण कब्जा करायचा होता.

जर्मनीला बढत

स्टॅलिन सुद्धा हिटलर वरती विश्वास करत न्हवता पण हिटलर इतक्या लवकर हल्ला करेल असे स्टॅलिन ला वाटले न्हवते.

सोवीयत रुस कडे 50लाख सैनिक आणि 23000टॅंक होते पण एवढे असूनही रेड आर्मी या अचानक युद्धा साठी तयार न्हवती.

या युद्धात सुरवातीला जर्मन सेना खूप जोराने आणि आत्मविसाने लढत होती. त्यामुळे सोवियत रुस च्या रेड आर्मी ची धुळधान उडाली.

त्यानंतर सोवियत रुस ने हवाई हल्ले करायला सुरवात केली आणि जर्मन सैन्य मागे यायला लागले. त्यानंतर जर्मनीने सुद्धा हवाई हमले करायला सुरवात केली.आणि पुन्हा एकदा जर्मनीचा आत्मविश्वास वाढला. या मध्ये सोवियत रुस चे 1800लढाकू विमान निकामी केले.

‘आर्मी ग्रुप नॉर्थ ‘लेनिनग्राद ‘च्या दिशेने समोर जात होता. या भागात रुस आर्मी खूप कमी होती. जर्मन आर्मी ने फक्त तीन ते चार आठवड्यात 804km क्षेत्रावर कब्जा केला. जर्मन आर्मी लेनिनगार्ड पासून फक्त 96km दूर होती.

इकडे आर्मी ग्रुप सेंटर ने सुद्धा कमाल केली त्यांनी 28जून पर्यंत रुस च्या तिन्ही सेनाची घेराबंदी केली आणि ‘बियालिस्टॊक मीन्स्क पॉकेट ‘मध्ये रुस च्या तब्बल तीन लाख वीस हजार सैनिकांना ताब्यात घेतले. 27जुलै पर्यंत रुस चे आणखी तीन लाख सैने जर्मनीच्या ताब्यात आले. पण आर्मी ग्रुप साऊथ यांना सोवियत सैनिकांनी पुढे सरकू दिले नाही.

त्यानंतर 8आगस्ट ला जर्मन सैनिकांनी सोवियत च्या दोन तुकड्यांची घेरा बंदी केली आणि पुन्हा एकदा एक लाख सैनिकांना बंदी बनवलं.

कीव शहरावर जर्मन कब्जा

जर्मन सेना मोठ्या धिटाईने पुढे सरकत होती. विजय काही दिवसावर आला असे जर्मन सैनिकांना वाटत होते. पण त्यातच जर्मन आर्मीचे राशन संपत चालले होते, जर्मन सैनकांची अवस्था खूप वाईट झाली असती.

हे हिटलर ला जेव्हा समजले तेव्हा हिटलर ने मास्को शहराकडे न जाण्याचा

आदेश दिला. हिटलर ने उत्तर आणि दक्षिण मोर्च्यावर जाण्यासाठी जर्मनिहून आणखी सैने रवाना केले.

जर्मन सेना ही मास्को शहराच्या खूप जवळ पोहचली होती पण हिटलर ला मास्को पेक्ष्या युक्रेन महत्वाचे वाटत होते. कारण युक्रेन मध्ये भरपूर संसाधन होते.

आतापर्यन्त सोवीयत सेनेचा पूर्णपणे धुव्वा उडाला होता. सब्टेंबर च्या शेवटी शेवटी जर्मनीचा कीव शहरावर ताबा झाला होता. आणि तोपर्यंत जवळपास साडे सहा लाख सोवियत सैनिक जर्मनीच्या ताब्यात होते किंवा मारले गेले होते.

जर्मन सेना ‘काला सागर ‘किनाऱ्याच्या दिशेने समोर क्रिमियात घुसली त्यांनी ‘सेवस्टापूल ‘वरती ताबा मिळवला. त्यानंतर खारकोव सुद्धा जिंकले.

त्यानंतर जर्मन सेना खूप थकून गेली होती युद्धात त्यांचे भरपूर सैनिक मारले गेले होते. सब्टेंबर मध्ये लेनिनगार्ड बाकी रुस पासून वेगळे केले होते, पण रुस वरती ताबा मिळवू शकले नाहीत.

मास्को ची लढाई

त्यानंतर हिटलर ने मास्को युद्ध सुरु करण्याचे ठरविले. 2ऑक्टोबर ला ऑपेरेशन ‘टाइफुन ‘लॉंच केले. हिटलर चे मत होते आता रुसखूप कमजोर झाला आहे आणि त्यांची आर्मी मास्को शहराला सुद्धा वाचवू शकत नाही.

पण इकडे सोवीयत आर्मी एका नव्या जोशात तयार होत होती. जवळपास दहा लाख सैने मास्को वाचवण्यासाठी तयार होते. त्यांच्या कडे काही विमान आणि काही टॅंक शिल्लक होती.

मास्को युद्धात सुरवातीला जर्मन सेनेला यश मिळाल. जर्मन सेना जेव्हा मास्को शहराच्या जवळ गेली आणि निसर्गाने मास्को शहराला वाचवलं कारण अचानक हवामानत बदल झाला आणि पाऊस सुरु झाला. खूप जास्त पाऊस आल्याने संपूर्ण रस्त्याने चिखल झाला त्यामुळे जर्मन सैनिकांना समोर जाता येत न्हवते. घोड्याने ओढणाऱ्या गाड्या चिखलात फसल्या त्या मुळे जर्मन आर्मी माघार घ्यावी लागली आणि अश्या परिस्थिती लढण्याचा त्यांना अनुभव न्हवता.

नोव्हेंबर महिना आल्या नंतर जर्मन सेना पुन्हा एकदा मास्को तयारी साठी सज्ज झाली.

पाऊस थांबला होता आणि आणि आता जमीन कोरडी होत होती. इकडे सोवियत सेनेला तैयारी करण्यासाठी भरपूर वेळ मिळाला होता.

पाच डिसेंबर ला सोवियत च्या रेड आर्मी ने अचानक जर्मन सैन्यवरती हल्ला केला. हा हल्ला एवढा होता कि जर्मन सेना झपाट्याने मागे जात होती. 1944 च्या उन्हाळ्या पर्यंत रुसी आर्मीने जर्मनीची धुळधान केली. आणि जास्तीत जास्त क्षेत्र जर्मनीच्या कब्जातून मोकळे केले.

हिटलर ची आत्महत्या

हिटलर ने सोवीयत संघावरती हल्ला करून आपल्याच पायावर्ती कुऱ्हाडी मारली. त्यानंतर सोवियत रुस ने आपली जमीन ताब्यात घेऊन बर्लीन शहरावरती आक्रमन केले.

त्यानंतर हिटलर बंकर मध्ये लपला आणि त्याला आत्महत्या करावी लागली.

8मे 1945 ला बर्लीन शरण आले आणि दुसरे महायुद्ध समाप्त झाले.

Operation Barbarossa

‘बे ऑफ पिग्स ‘ क्यूबा मध्ये अमेरिकेची झालेली फजिती

नमस्कार मित्रानो आज आपण बघणार आहोत क्यूबा नावाच्या देशात अमेरिकेची झालेली फजिती आणि अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA ची निकामी झालेली ताकत

“मी अमेरिकेचे आभार मानू इच्छितो की त्यांनी आमच्यावर हल्ला केला. या हल्ल्याने क्युबाला अमेरिकेच्या बरोबरीने आणले “

वर्ष होते 1959, क्युबामध्ये क्रांती झाली. फिदेल कास्ट्रो यांची गनिमी काव्याने लढणारी सेना ने बटीस्ता सरकार कोसळून टाकले.

क्यूबा चे अमेरिकी धार्जिन राष्ट्रपती बटीस्ता हे देश सोडून पळून गेले. राष्ट्रपती बटीस्ता हे अमेरिकेचे पपेट होते आणि त्यामुळे बटीस्ता यांचा कल अमेरिकेकडे होता.

पण त्या उलट फिदेल कास्ट्रो एक कम्युनिस्ट होते आणि साहजिकच त्यांचा कल हा सोवियत संघाकडे होता आणि शीतयुद्धच्या काळात सोवियत चा जो मित्र असे तो अमेरिकेचा दुश्मन असे.

1952 मध्ये क्यूबा मध्ये जो विद्रोह झाला त्या नंतर अमेरिकेच्या पाठिंब्याने बटीस्ता हे क्यूबा देशाचे राष्ट्रपती झाले. बटीस्ता हे सेना मध्ये जनरल पदावरती होते.

बटीस्ता हे सत्तेवरती आल्या नंतर क्यूबा मध्ये अमेरिकेचा हस्तक्षेप खूप जास्त प्रमाणात वाढला होता. क्यूबा च्या शेतीवर अमेरिकी वेवसायिकांचा संपूर्ण कब्जा झाला होता. स्थानिक लोक फक्त शेतमजूर म्हणून राहिले होते.

बटीस्ता हे राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी मानमानी करायला सुरवात केली त्यांनी कोणत्याही प्रकारच्या आंदोलनावर बंदी आणली होती आणि त्या मुळे सरकार विरोधी आंदोलन सुद्धा कोणी करू शकत न्हवते ज्यांनी कोणी सरकार विरोधी बोलले त्याला बटीस्ता सरकार ने कायमच संपून टाकले.

त्या नंतर क्यूबा देशात पुन्हा एकदा क्रांतीचे वारे वाहू लागले आणि फिदेल कास्ट्रो यांनी क्रांती करून बटीस्ता यांचे सरकार पाडले आणि फिदेल कास्ट्रो सत्तेवर आले.आणि या मुळे अमेरिकेला चांगलाच झटका बसला.

फिदेल कास्ट्रो यांनी बटीस्ता ने जे कायदे बनवले होते त्या मध्ये बदल करून अमेरिकी अरबपती कडे जी जमीन होती ती संपूर्ण जमीन नॅशनलाईज केली.

फिदेल कास्ट्रो यांनी बटीस्ता समर्थकांना अटक करायला सुरवात केली. बटीस्ता समर्थक आणि अमेरिकी लोक देश सोडून गेले.

या मुळे अमेरिकी राष्ट्रपती डेविड आइज़नहावर चांगलेच परेशान झाले होते. आणि त्या वेळेला अमेरिका सुद्धा त्या प्रत्येक ठिकाणी लढण्यासाठी तयार होती जिथे कम्युनिस्ट मजबूत होत होता. त्यानंतर अमेरिकी राष्ट्रपती
डेविड आइज़नहावर यांनी अमेरिकी गुप्तचर यंत्रणा CIA ला कामाला लावलं. CIA ने जे क्यूबा मधून लोक पळून आले त्यांना क्यूबा विरोधात लढण्यासाठी तयार केले फ्लो्रीडा आणि ग्वाटेमाला मध्ये ट्रेनिंग कॅम्प सुरु केले.

जे ट्रेनिंग कॅम्प सुरु केले त्या तुकडीचे नाव होते ‘ब्रिगेड 2506’

आणि या वेळेला अमेरिकेमध्ये निवडणुका झाल्या आणि सत्तेवर नवीन युवा राष्ट्रपती आले ते होते जॉन एफ कॅनडी. कॅनडी यांनी फेब्रुवारी 1961 मध्ये क्यूबवरती हमला करण्याची मंजुरी दिली. 15 एप्रिल 1961 मध्ये अमेरिकेच्या आठ लढाकू विमानानी क्यूबा वरती बाँम्ब टाकायला सुरवात केली पण अधिक तर बाँम्ब निष्याण्यावरती पडलेच नाही.

अमेरिकेने या लढाकू विमानांना क्यूबा एअर फ़ोर्स सारखे पेंट केले होते. ही घटना जेव्हा संपूर्ण जगभर पसरली तेव्हा अमेरिकेची जगभर थू थू झाली. त्या नंतर अमेरिकेने दुसरा हवाई हमला कॅन्सल केला.

त्यानंतर ‘ब्रेगेड 2506’ या तुकडीला उतरण्यासाठी क्यूबाचा दक्षिण किनारा अमेरिकेने निवडला त्या किनाऱ्याचे नाव होते ‘बे ऑफ पिग्स ‘होते या किनाऱ्यावर लपण्या साठी भरपूर जागा होती. 25 एप्रिल या दिवशी ब्रिगेड बे ऑफ पिग्स वरती पोहचली.

फिदेल कास्ट्रो यांनी अगोदरच क्यूबन एअर फोर्स ला सतर्कतेचा इशारा दिला होता कारण तो पर्यंत क्यूबा सरकार सतर्क झाली होती. आणि येणाऱ्या संकटाची त्यांना चाहूल लागली होती.

क्यूबा सरकार ने वीस हजार सैनिकांना ‘बे ऑफ पिग्स च्या दिशेने रवाना केले होते. याची ‘ब्रिगेड 2506’ला काहीही कल्पना न्हवती.

या युद्धात अमेरिकेचे चार सैनिक मारले गेले आणि दोन लाडाकू विमान, दोन जहाज उधवस्त झाले होते.

19एप्रिल पर्यंत संपूर्ण युद्ध समाप्त झाले होते आणि ब्रिगेड 2506 चे 100पेक्ष्या जास्त सैनिक मारले गेले. बाराशे पेक्ष्या जास्त सैनिक क्यूबाच्या ताब्यात आले होते.

त्यांना सोडवण्यासाठी अमेरिकेची चांगलीच फजिती झाली होती. पण कास्ट्रो यांनी त्यांना सोडून दिले पण त्या बदल्यात पाच करोड डॉलर्स चे औषधं आणि बेबी फूड घेतले.

अश्याप्रकारे इतिहासातील एक सर्वात मोठी घटना घडली आणि संपूर्ण जगासमोर अमेरिकेची फजिती झाली.

त्यानंतर अगस्त 1961 मध्ये उरुगवे या देशात एक संमेलन झाले त्यामध्ये कास्ट्रो चे मित्र आणि सहकारी ग्वेरा सुद्धा आले होते त्यावेळी ग्वेरा म्हणाले होते “मी अमेरीरिकेचे आभार मानू इच्छितो कि त्यांनी आमच्यावरती हल्ला केला.या हल्ल्याने क्यूबाला अमेरिकेच्या बरोबरीने आणले.

मालदीव संकट

आज आपण बघणार आहोत भारत मालदीवसंबंध आणि कुटनिती मालदीव हा भारताचा एक शेजारी देश आहे भारताचे आणि मालदीवची पूर्वीपासूनच खूप चांगले संबंध आहेत पण काही महिन्यापासून भारत आणि मालदीव मध्ये थोडी कटूता आली आज आपण भारत आणि मालदीव विषयी संपूर्ण माहिती बघूया


“जो लोग अपने अंदर के साहसी व्यक्ती को गले लगाना चाहते है लक्षदीप उनकी सूची मे होणा चाहिये “

या पोस्टने इंटरनेट वरती धुमाकूळ घातला होता ही पोस्ट होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख होती पाच जानेवारी 2024 या पोस्टने भारतच नाही तर मालदीव मध्ये सुद्धा खूप धुमाकूळ घातला होता खरं तर भारत आणि मालदीव संबंध मोहम्मद मोईजू मालदीव चे राष्ट्रपती झाल्यापासून खूप बिघडले भारतीय सैनिक मालदीव मधून वापस पाठवून चीन सोबत संबंध घट करत होते आणि याच वेळेला भारत आणि मालदीव संबंध बिघडत चालले होते आणि भारतासोबत संबंध खराब करून मालदीवने स्वतःचे नुकसान करून घेतले. कारण 2023 च्या आकड्यानुसार भारतीय पर्यटक मालदीव 56 हजार पेक्षा जास्त केले होते पण 2024 झाली हा आकडा 34 हजार 800 पर्यंत खाली आला आणि हा जो फरक आहे तो फक्त तीन महिन्याचा आहे


भारत आणि मालदीव संबंध खूप जुने आहे तेव्हा इंग्रज भारत सोडून गेले तेव्हापासून आहे 2008 मध्ये मालदीव मध्ये लोकशाही परिवर्तन झाल्यानंतर भारताने मालदीव मध्ये सैन्य व्यापार, शिक्षण आणि अशा भरपूर योजना देऊन भारत आणि मालदीव संबंध चांगले केले.
भारतासाठी मालदीव हा खूप महत्त्वाचा देश आहे मालदीव हिंद महासागरामध्ये खूप महत्त्वाचा देश आणि त्या ठिकाणी भारतासाठी खूप महत्त्व ठेवतो.

भारताचे आणि मालदीवच्या संस्कृती सुद्धा संबंध आहेत बारावी शताब्दीच्या पहिले मालदीव मध्ये बौद्ध धर्म हा एक महत्त्वाचा धर्म होता “वज्रायन “नावाचा बोद्ध धर्माचा शिलालेख मालदीव मध्ये होता

मालदीव साठी सुद्धा भारत एक महत्त्वाचा देश आहे भारत भारत मालदीवला तांदूळ मसाले फळभाजी आणि मेडिकल सारखे महत्त्वाचे वस्तू पूर्वत असतो.

भारत मालदीवच्या युवा तरुणांना शिक्षण सुद्धा देतो भारत सरकार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुद्धा देतो.