The Balochistan story and history:बलोचिस्थान इतिहास आणि संघर्ष

The Balochistan story :बलोचिस्थान इतिहास आणि संघर्ष

पाकिस्तान म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येतो तो आतंकवाद. पाकिस्तान काश्मीर मध्ये जो आतंकवाद पेरतो ते संपूर्ण जग बघतच असते. आणि हाच आतंकवाद बलोचीस्तान मध्ये सुद्धा पेरत असतो.

आज आपण बघणार आहोत The Balochistan story and historyबलोचीस्तान विषयी मागील सत्तर वर्षांपासून बलोच पाकिस्तान च्या ताब्यात आहे. तेथील बलोच लोकांना पाकिस्तान सरकार कडून काहीही अर्थसाहाय्य भेटत नाही. उलट पाकिस्तान सरकार कडून त्यांना प्रताडीत केले जाते.

https://shorturl.bz/sTc

पाकिस्तान ने बलोचीस्तान वरती कब्जा कसा केला

भारत पाकिस्तान विभाजन झाले तेव्हा बलोचीस्तान चे सुद्धा विभाजन झाले होते. बलोचीस्तान 11ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला होता. विभाजन झाल्यानंतर 255,दिवस बलोचीस्तान एक स्वतंत्र देश होता.

1948मध्ये ऑल इंडिया रेडिओ वरती एका प्रसारणा मुळे जिन्ना ला बलुचिस्तान घेण्याची संधी भेटली. पाकिस्तान च्या मध्ये भागी असा एक भाग होता ज्याला स्वातंत्र्य ठेवण्यासाठी मोहम्मद आली जिन्ना ने वकालत केली होती. तो भाग होता कलात. 27मार्च 1948 कलात मध्ये खान मिर अहमद खान होते. सकाळी ठीक 9वाजता ऑल इंडिया रेडिओ वरती एक प्रसारण होत होते. तेव्हा खान मिर अहमद खान यांच्या पायाखालची जमीन सरकली. बातमी होती भारताने त्यांच्या रियासात विलंय चा प्रस्ताव नकाराला होता.

मुद्दा हा न्हवता कि भारताने प्रस्ताव नकाराला. पण मोठी समस्या ही होती कि पाकिस्तान ने सुद्धा ही बातमी ऐकली होती. आणि दुसऱ्याच दिवशी. पाकिस्तान आर्मी ने खान रियासतीवर धावा बोलला. कलात ला स्वातंत्र्य ठेवण्याचा मुद्दा मातीत मिळाला. कलात पाकिस्तान च्या बलुचिस्तान प्रांता मध्ये एक रियासात होती. विभाजना वेळेस खान सल्तनत ने स्वतःला स्वातंत्र्य घोषित केले होते. पण नंतर पाकिस्तान ने त्यांच्यावर कब्जा केला.

प्रत्येक वर्षी 2मार्च ला बलोचीस्तान मध्ये मध्ये बलोच संस्कृती वाचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बलोच संस्कृती पाकिस्तान पाकिस्तान संस्कृती पेक्ष्या वेगळी आहे.

बलोचीस्तान एक स्वातंत्र्य राष्ट्र होते

ज्याला आपण बलोचीस्तान नावाने ओळखतो त्यामध्ये चार रियासते होती. कलात, खरान, लास बेला, मकरान. 1870मध्ये इंग्रजानी कलात च्या खान सल्तनत सोबत एक करार केला. ज्यामुळे ही रियासात इंग्रजाच्या आधीन गेली. तरी सुद्धा इंग्रजाचा यांच्यावर कंट्रोल न्हवता.

या रियासतीची हालत जवळपास भूतान सारखीच होती.रुस आक्रमण करेल या भीतीने इंग्रजानी एक सैन्य तुकडी इथे नेहमी असायची. पण इंग्रज या प्रशासनात कोणतीही दखल देत न्हवते. जेव्हा विभाजनाची वेळ आली तेव्हा इंग्रजानी भूतान आणि सिक्कीम सारखी कॅटेगिरी इथे लावली. बलोचीस्तान च्या बाकी रियासात पाकिस्तान च्या बाजूने होत्या. पण कलात पाकिस्तान च्या बाजूने जायला तयार न्हवते. खान मिर अहमद खान स्वातंत्र्य राहणार होते.The Balochistan story and history

1946पासूनच त्यांनी प्रयत्न सुरु केले होते 1946साली कॅबिनेट मिशन जेव्हा भारतात आले तेव्हा खान मिर अहमद खान यांनी आपला एक वकील भारतात पाठवला होता. आणि हा वकील होता मोहम्मद आली जिन्ना.

जिन्ना आणि मिर अहमद यांची खूप मैत्री होती. मिर अहमद यांनी मुस्लिम लीग ला भरपूर पैसा दिला होता. जिन्ना ने सुद्धा खान सोबतची मैत्री पूर्ण केली होती. भारतात येऊन 1946ला जिन्ना ने कलात चा प्रश्न ठेवला होता. तेव्हा जिन्ना म्हणाला होता. “विभाजन करताना कलात ला स्वातंत्र्य देश म्हणून घोषित केले पाहिजे कारण ‘कलात करार ‘ हा ब्रिटिश इंडिया सरकार ने न करता ‘ब्रिटिश क्राऊन ‘ने केला होता.

त्या वेतिरिक्त मिर अहमद ने ‘समद खान ‘नावाचा एक बलोच नेता दिल्लीला पाठवला होता. समद खान ने जवाहरलाल नेहरु यांची भेट घेतली. पण नेहरू यांनी कलात ला स्वातंत्र्य असण्यासाठी नकार दिला.

त्यानंतर काही महिन्यांनी कलात ची एक डिलिगेशन दिल्ली मध्ये आली या वेळेला ‘कलात स्टेट नेशनल पार्टी ‘ चे अध्यक्ष गौस बक्ष ने मौलाना अबुल कलाम आजाद यांची भेट घेतली. आजाद यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि पाकिस्तान चे विभाजन झाल्या नंतर कलात रियासात ही स्वातंत्र्य राहु शकत नाही.

जिन्ना बलोचीस्तान च्या बाजूने वकील होता. सर्व प्रयत्न फसल्यानंतर कलात चे खान मिर स्वतःहा दिल्ली मध्ये आले होते. 4ऑगस्ट 1947ला दिल्ली मध्ये राउंड टेबल मिटिंग होती. या मिटिंग मध्ये जिन्ना आणि लॉर्ड माउंटबेटन सुद्धा होते. आणि या मिटिंग मध्ये ठरले होते कि कलात हा एक स्वतंत्र देश असेल. या मध्ये खरान, लॉस बेला सुद्धा विलंय होतील. त्यानंतर एका आठवड्यात 11ऑगस्ट 1947ला मुस्लिम लीग आणि कलात यांच्यात एका घोषणा पत्रावर हस्ताक्षर करण्यात आले. त्यामध्ये असे म्हटले होते कि कलात ची आपली एक वेगळी ओळख आहे. आणि मुस्लिम लीग कलात च्या स्वातंत्र्याचा सन्मान करेल.

15ऑगस्ट ला भारत स्वातंत्र्य झाला आणि याच्या पहिलेच कलात ने स्वतःला स्वातंत्र्य म्हणून घोषित केले होते. मिर अहमद यांनी लगेच कलात मध्ये संसद गठन केले होते.

या मध्ये दोन पार्लमेंट होते. उच्च सदन चे नाव होते ‘दारूल उमराह ‘आणि खालच्या सदन चे नाव होते ‘दारूल आवाम ‘दोन्ही सदन मध्ये स्वातंत्र्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि घोषणा केली कि पाकिस्तान सोबत त्यांचे संबधं मैत्रीचे असतील.

पाकिस्तान नावाचा देश सुद्धा नवीन झाला होता. पण आणि जिन्ना या मध्ये वेस्थ होता. पण 21ऑगस्ट 1947 साली एक घटना घडली आणि सर्व उलटे घडायला सुरवात झाली.

बलोच वरती जिन्ना ची नजर

बलोचीस्तान मध्ये चार रियासते होती. या मध्ये एक खरान रियासात होती. त्याचे शासक मिर मुहम्मद हबीबुल्ला ने जिन्ना ला एक पत्र लिहले होते. त्या मध्ये होते.

“माझी सल्तनत कलात च्या कब्जात जाणार नाही. आणि गेली तर आम्ही याचा भरपूर विरोध करू “.

हे पत्र म्हणजे खरान ला कलात मध्ये राहायचे नसून पाकिस्तान च्या बाजूने जायचे असा याचा अर्थ होत होता. त्यानंतर लॉस बेला, मकरान यांनी सुद्धा पाकिस्तान मध्ये जाण्याचा सुर लावायला सुरवात केली होती.

balochistan

BALOCH ARMY

कलात वरती दबाव जास्तच वाढत होता.ऑक्टोबर मध्ये जिन्ना ने सुद्धा कलात विरोधात बोलायला सुरवात केली होती. आणि यानंतर मिर खान यांनी सुद्धा त्यांच्या दारूला आवाम मधून जिन्ना ला उत्तर दिले.

“अफगाणिस्तान आणि इराण सारखीच आमची सुद्धा वेगळी संस्कृती आहे. आणि ती संस्कृती पाकिस्तान पेक्षा खूप वेगळी आहे. केवळ मुसलमान असल्यामुळे आम्ही पाकिस्तानी होऊ शकत नाही. आणि असे असेल तर इराण आणि अफगाणिस्तान ला सुद्धा पाकिस्तान मध्ये विलंय व्हावं लागेल.”

ऑल इंडिया रेडिओ वरील ती बातमी

जिन्ना चे संपूर्ण लक्ष काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद वरती होते. 17मार्च 1948मध्ये खरान, लॉस बेला, यांचा पाकिस्तान मध्ये विलंय झाला. म्हणजे बलोचीस्तान च्या एक तिहाई हिस्यावर पाकिस्तान ने कब्जा केला होता. त्यानंतर जिन्ना चे संपूर्ण लक्ष कलात वरती होते.

27मार्च 1928 ऑल इंडिया रेडिओ वरती एक प्रसारण होत होते. केंद्रीय सचिव विपी मेनन यांनी म्हटले होते. कलात चे खान भारताच्या बाजूने आहेत. पण मेनन चे म्हणणे होते “यात भारताला काहीही देणंघेणं नाही “. त्या वेळेला मेनन हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सोबत होते. आणि भारतातील रियासते भारताच्या बाजूने आणण्याचे काम करत होते.

ऑपेरेशन ‘रेथ ऑफ गोड ‘:ज्यामुळे इस्राईल चे दुश्मन आज सुद्धा घाबरतात.

baloch history

कलात मध्ये खान जेव्हा हे भाषण ऐकत होता तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन हादरून गेली होती. कारण खान ला माहित होते. आता पाकिस्तान शांत बसणार नाही. इकडे भारतात सुद्धा या बातमी मुळे वेगळे अर्थ निघत होते.

दुसऱ्या दिवशी हे वातावरण शांत करण्यासाठी एक बयान दिले. आणि त्यांनी सांगितले अश्या प्रकारे कोणतेही बयान दिले नाही.

Story of Balochistan

Baloch History

पण यानंतर सुद्धा जे नुकसान होणार होते ते नुकसान झाले.

28मार्च ला जिन्ना ने पाकिस्तानी आर्मिला कलात वर चढाई करण्याचा आदेश दिला. त्यानंतर कलात च्या खान ला पाकिस्तानी सेनाने अटक केली आणि त्यांच्यावर दबाव टाकून विलय पत्रावर स्वाक्षरी घेतली.

अश्या प्रकारे 225दिवस स्वातंत्र्य राहून कलात वर पाकिस्तान ने कब्जा केला.

The balochistan story

operation D-DAY ऑपेरेशन डी डे दुसऱ्या महायुद्धतील सर्वात मोठी सैन्य कारवाई

इतिहासाच्या पानामध्ये एक ऑपेरेशन असे सुद्धा आहे जाने दुसऱ्या महायुद्धला एक निर्णायक परिणाम दिला. नाझी जर्मनी जेव्हा संपूर्ण युरोप मध्ये धुमाकूळ घालत होती तेव्हा मित्र राष्ट्र पूर्ण पणे हताश झाले होते. चारी बाजूने फक्त हिटलर चा विजय होत होता. हिटलर चे हवाई हमले इंग्लंड च्या लंडन वरती सुद्धा होत होते. इकडे अमेरिका आणि जपान लढत होते जपाण्यानी सुद्धा अमेरिकेला पुरतं घायाळ करून सोडले होते. हिटलर च्या जीवनतील सर्वात मोठे ऑपरेशन बरबारोसा मुळे सोवियत रुस सुद्धा पूर्ण पणे बिखरून गेला होता. या दुसऱ्या महायुद्धात हिटलर अजय ठरत होता. नाझी सैनिकांनी मानव जातीला लाजवेल असे काम केले होते. जर्मनी मध्ये येहुदी समाजाला लाजिरवाण्या पद्धतीने नाझी मारत होते. हिटलर आणि नाझी यांनी अत्याचाराचा कळस गाठला होता. आणि आता मित्र राष्ट्रा कडे एकच पर्याय उरला होता. हिटलर ला हरवणे आणि दुसरे महायुद्ध समाप्त करणे कारण या या महायुद्धात लाखो करोडो लोक तो पर्यंत मारल्या गेले होते. आणि हे युद्ध चालूच होते. त्या नंतर या महायुद्धला एक निर्णायक मोड भेटला आणि तो म्हणजे ऑपेरेशन d day तर आज आपण बघणार आहोत ऑपेरेशन d day विषयी जाने दुसरे महायुद्ध संपले.

6जून 1944हा दिवस म्हणजे 20व्या शतकाला पूर्ण पणे कलाटणी देणारा ठरला होता. दुसऱ्या महायुद्धच्या झळा संपूर्ण जगाला लागल्या होत्या.

D day मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठे संयुक्त सैन्य ऑपरेशन

1944पर्यंत महायुद्ध संपूर्ण जगात पोहचले होते. नाझी जर्मनिनी अत्याचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. आणि युरोपीय देशाची अवस्था खूप बिकट झाली होती त्यामुळे त्यांच्या समोर ‘करो या मरो ‘ची स्तिती झाली होती.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि सर्वच मित्र राष्ट्र हे युद्ध थांबेल कसे याचा विचार करत होते. 1944जून मध्ये मित्र राष्ट्रानी 1लाख 56हजार सैनिक नाझी जर्मनीच्या विरोधात उभे केले. मित्र राष्ट्राच्या सैनिकांनी 6जून 1944ला उत्तरी फ्रान्स च्या नॉरमेंडी शहराच्या किनाऱ्यावर घुसपैठ केली. हा भाग जर्मनीच्या ताब्यात होता. या घुसपैठीला मानव इतिहासातील सर्वात मोठी सबमरीन घुसपैठ म्हणतात. दुसऱ्या महायुद्धातील सर्वात मोठे सैन्य अभियान आहे.

या संयुक्त सैन्य अभियानाला ऑपेरेशन ओव्हरलोड सुद्धा म्हणतात. युरोप मध्ये नांझिंच्या भागात हा हमला होता. या ऑपरेशन ला नेपच्युन हे सुद्धा नाव दिले होते. दुसरे महायुद्ध समाप्त करणे हाच याचा उद्देश होता. या अभियानात तिन्ही सेनानीं भाग घेतला होता. पोर्टसमाऊथ च्या डी डे संग्रहालयातील आकाड्यानुसार नाझी सैनिकांच्या विरोधात जे सैन्य अभियान चालू होते त्या मध्ये मित्र राष्ट्राचे 4413सैनिक मारले गेले होते आणि नाझी जर्मनीचे 9हजार सैनिक मारले गेले होते.

या ऑपेरेशन मध्ये मित्र राष्ट्रानी फ्रान्स मध्ये चढाई करून फ्रान्स नांझिंच्या हातून सोडून घेतले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धला एक नवीन दिशा मिळालली. त्यानंतर सोवियत सैनिकांनी सुद्धा पूर्वे कडून हमाला केला ज्यामुळे हिटलर चे बर्लीन शहर त्याच्या हातून जाणार होते. त्यानंतर केवळ 11महिन्यांनी नाझी जर्मनी दुसरे महायुद्ध हरली.

नॉरमंडी च्या लढाई नंतर एका वर्षात दुसरे महायुद्ध संपले

नॉरमंडी च्या लढाई नंतर हिटलर सोबत जे राष्ट्र होते ते हरत चालले होते.

आणि त्यांचा एक एक भाग मित्र राष्ट्राच्या ताब्यात जात होता. ऑक्टोबर मध्ये फिलिपीन्स च्या लेटी भागावर मित्र राष्ट्रानी धावा बोलला. ज्या मध्ये जपान हरला. त्यानंतर ओकेनावा भुभागवरून सुद्धा जपान चा ताबा गेला. जो भुभाग जपान कडे मागील 75वर्षांपासून होता. त्या नंतर जे घडणार होते ते महाभयंकर होते. मानव जातीच्या इतिहासातील सर्वात मोठा असा हल्ला होणार होता.

6ऑगस्ट ला अमेरिकेने हिरोशीमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. या हल्ल्यात हजारो माणसे मारल्या गेली आणि लाखो माणसे जखमी झाली किंवा अर्ध मेली झाली.

Hiroshima

दुसरा अणुबॉम्ब तीन दिवसाने नागासाकी शहरावर टाकला. त्यानंतर 2सब्टेंबर 1945ला जपान ने बिना शर्त आत्मसमर्पण केले. यानंतर 6वर्ष चालणार महायुद्ध समाप्त झालं.

word war 2

Adolf hitlar

ऑपेरेशन ‘रेथ ऑफ गोड ‘:ज्यामुळे इस्राईल चे दुश्मन आज सुद्धा घाबरतात.

इस्राईल गुप्तचर यंत्रणा म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते त्यांचे वेगवेगळे ऑपेरेशन आणि त्यांनी बनविलेला प्लान ज्याने त्यांच्या दुश्मनाचा थरकाप उडतो. आज आपण बघणार आहोत अश्याच एका ऑपेरेशन विषयी माहिती ऑपेरेशन रेथ ऑफ गोड विषयी माहिती.

1980आणि 90च्या दशकात फिलिस्तींनी समर्थक आतंकवाद्याच्या घरी एक फुलाचा गुलदस्ता येत होता. त्या सोबत एक नोट असायची त्यात लिहिलेले असायचे “आम्ही विसरत नाही, आणि माफ सुद्धा करत नाही. त्यानंतर तेथील आतंकवाद्याची हत्या होत असे. आणि हे काम होत जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर यंत्रणा मोसाद चे. या वेळेस इस्राईल चे दुस्मन जगाच्या पाठीवर कोठेही लपलेले असतील तर त्यांना शोधून मारण्याची ताखत मोसाद कडे होती. पण अशी कोणती घटना घडली होती कि मोसाद आपल्या दुश्मणाला संपूर्ण जगात शोधून मारत होते.

म्युनिख नरसंहार

6सप्टेंबर 1972 या दिवशी इस्राईल देश्यातील नागरिक TV आणि रेडिओ ला चिपकून बसले होते. जर्मनीच्या म्युनिख शहरांत ऑलम्पिक चालू होते. पण त्या दिवशी इस्राईली नागरिक ऑलम्पिक गेम बघत न्हवते तर तिथे चालू होता इस्राईल खेळाडूंचा नरसंहार.

फिलिस्तीन च्या एका आतंकवादी संघटनेच्या काही आतंकवाद्यांनी इस्राईल च्या खेळाडूंना बंधक बनविले होते ज्या आतंकवाद्यानी इस्राईल च्या खेळाडूंना बंधक बनविले होते ज्या आतंकवाद्यानी खेळाडूंना बंधक बनवले होते त्या आतंकी संघटनेच नाव होत “, ब्लॅक सप्टेंबर “.

या आतंकवाद्यानि सुरवातीला दोन खेळाडूंना मारले आणि बाकीच्यांना बंधक बनविले या बांधकाच्या बदल्यात 200 फिलिस्तींनी कैद्याना सोडण्याची मागणी केली.

जर्मनीचे चान्सलर विली ब्रांट यांनी इस्राईल च्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांना फोन केला आणि या घटनेबद्दल सांगितले गोल्डा मेयर या इसराईल च्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. 17मार्च 1969 ला त्या इसराईल च्या सत्तेवर आल्या होत्या. सत्तेवर आल्यापासून सर्वात मोठी समस्या त्यांच्या समोर आली होती. त्यांनी इसराईल ची जुनी परंपरा कायम ठेऊन त्यानि जर्मन चान्सलर विली ब्रांट यांना सांगितले ‘आम्ही आतंकवाद्याची कोणतीही मागणी पूर्ण करणार नाही ‘.

आतंकवाद्यानि बंधकांना विमान तळावर नेले तेव्हा जर्मन सुरक्षा रक्षकांनी एक रेस्क्यू ऑपेरेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सर्वांचे लक्ष या ऑपेरेशन वरती होते तेव्हा tv वरती एक बातमी आली. आतंकवाद्या पासून खेळाडूंना सोडवण्यात यश आले आहे. त्यानंतर इस्राईल मध्ये सर्वत्र आनंद वेक्त होत होता. पंतप्रधान गोल्डा मेयर सुद्धा आपल्या ऑफिस मध्ये आनंद वेक्त करत होत्या. त्यांना वाटत होते खूप मोठ्या संकटातून खेळाडू वाचले पण त्यांना काय माहित होते? कि हा आनंद फक्त एका रात्री पुरताच आहे.कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना समजले कि ही बातमी पूर्ण पणे खोटी होती.आणि सकाळी त्यांना या पेक्षा सुद्धा मोठा धक्का बसला होता. केवळ गोल्डा मेयर च नाही तर संपूर्ण इसराईल आणि जगाला सुद्धा कारण आतकंवाद्यानी इस्राईल च्या सर्व खेळाडूंना मारले होते.आणि ही भयंकर बातमी पचवण इस्राईल साठी एवढं सुद्धा सोपं न्हवत. खरं तर केवळ इसराईल साठीच नाही तर तर संपूर्ण ऑलम्पिक साठी हा दिवस काळा झाला होता. या मध्ये जर्मनीला सुद्धा खूप मोठा धक्का होता. हे सर्व जर्मनीच्या जमिनीवर चालू होत. पंचवीस ते तीस वर्ष्यापुर्वी याच जर्मनीत लाखो येहुदी हिटलर ने मारले होते आणि त्यानंतर ही घटना घडली होती. यानंतर पाच आतंकवाद्याना मारले होते पण आणखी तीन जिवंत होते.

संपूर्ण इसराईल शोकाकुल होते दुःख आणि राग त्यांच्या मनात भरला होता. त्यांच्याकडून एकच आवाज येत होता. झालेल्या घटनेचा बदला.

प्लेन हाईजाक

इस्राईल ने या हत्येचा बदला घेण्यासाठी लेबनानं आणि सिरिया मध्ये आतंकवाद्या च्या ठिकाणावर भरपूर हवाई हमाले केले या हमल्यात 200पेक्ष्या जास्त आतंकी मारले गेले. पण तरीही इसराईल शांत बसू शकत न्हवता कारण ते तीन आतंकी आणखीन सुद्धा जिवंत होते आणि त्या हत्येचा प्लॅन बनवणारे सुद्धा जिवंतच होते. त्या तीन आतंकवाद्याची नावे होती अदनान अल गाशे, जमाल अल गाशे, आणि मोहमद गदाफी हे सर्व जर्मनी च्या ताब्यात होते पण जर्मनी च्या संविधाना नुसार त्यांना मृत्यू दंड देता येत न्हवता. त्यामुळे इस्राईल जर्मणीकडे मागणी करत होता कि हे आतंकी इस्राईल च्या हवाली करा. त्यानंतर काही आठवड्यात एक घटना घडली आणि इस्राईल जर्मणीकडे जी मागणी करत होता त्या मागणी वर पाणी फिरले होते.

आक्टोबर 1972ला एक विमान 615सिरिया मधून जर्मनीला जात होते. त्या विमानात दोन आतंकवादी होते. काही वेळात त्यांनी ते विमान हाईजाक केले. त्यांची मागणी होती म्युनिख मध्ये जे तीन आतंकवादी पकडले होते ते सोडावे. जर्मनीने आपल्या नागरिकांसाठी त्यांची मागणी पूर्ण केली. आणि साहजिकच इसराईल मध्ये एक संतापाची लाट उठली.

इस्राईल पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्यावर खूप जास्त जनतेकडून दबाव वाढत होता. जनतेची एकच मागणी होती. ती म्हणजे बदला. गोल्डा मेयर यांनी इस्राईल च्या गुप्त अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आणि या बैठकीत एक कमिटी बनवली त्या कमिटीला नाव दिले कमिटी एक्स आणि या कमिटीलाच ठरवायचे होते म्युनिख च्या आतंकवाद्याना कसे व केव्हा मारायचे.हे काम सोपं सुद्धा न्हवत.

गुप्तचरांकडून मिळालेल्या माहिती नुसार 20ते 35लोकांची त्यांनी एक लिस्ट बनवली हे सर्व आतंकी युरोप किंवा मध्य पूर्व मध्ये होते.प्रत्येक आतंकवाद्याला शोधायचे होते आणि मारायचे होते.या मध्ये एक दक्षता घ्यायची होती कि हे सर्व मारल्या नंतर कोणत्याही प्रकारे संशयाची सुई इसराईल कडे होता कामा नाही. हे सर्व फक्त इसराईल ची मोसादच करू शकत होती मोसाद ने या ऑपरेशन ला नाव दिले “रेथ ऑफ गोड “.

मोसाद च्या या ऑपरेशन ला लीड करत होते एजेंट मायकल हरारी. त्यांनी पाच टीमा बनविल्या. आणि या प्रत्येक टीम ला हिब्रू अल्फा बेट मध्ये नाव दिले.

1)आलीफ – या टीम मध्ये दोन किलर होते

2)बेट – या टीम मध्ये दोन एजेंट असे होते कि ते कोणाची ही खोटी identy बनवत होते.

3)हेट – या टीम च्या एजेंट ना काम होते हॉटेल आणि कार चा बंदोबस्त करणे.

4)आयिन -या टीम चे काम होते बाकी टीम साठी एस्केप रूट तयार करणे.

5)कोफ –या टीम चे काम होते बाकी सर्व टीम च्या संपर्कात राहायचे.

या ऑपेरेशन मधील एजेंट चा इसराईल सरकार सोबत कोणताही संबंध ठेवला न्हवता ते फक्त मायकल हरारी ला रिपोर्ट देत होते.

ईश्वराचा उद्रेक

या ऑपरेशन ला सुरवात झाली 16ऑक्टोबर 1972ला रोम मधील एका हॉटेल मध्ये गोळ्यांचा आवाज आला.आणि या लिस्ट मधून एक नाव काढण्यात आले एका आतंकी चा खात्मा झाला होता. त्यानंतर एका महिन्याने फ्रान्स मधून अशीच एक बातमी आली. ‘ब्लॅक सप्टेंबर ‘चा लीडर महमूद हमशारी याला माहित होते कि आपल्यावर मोसाद ची नजर आहे.मोसाद च्या भीतीने तो आपल्या अपार्ममेंट मध्ये लपून बसला होता. त्यामुळे त्याला मारणे अवघड होऊन बसले होते. त्यानंतर मोसाद च्या टीम ने एक प्लान बनविला. एके दिवशी त्याला एका पत्रकाराचा फोन आला. पत्रकाराने त्याला भेटण्यासाठी बोलावले. महमूद त्या पत्रकारला भेटण्यासाठी बाहेर गेला त्याच वेळेला मोसाद ची टीम त्याच्या घरात गेली. आणि त्याच्या टेलिफोन मध्ये बॉम्ब सेट केला. जेव्हा महमुद घरी गेला आणि त्याला एक फोन आला त्याने फोन उचलला आणि एक स्फोट झाला. त्यात महमूद गंभीर जखमी झाला. तो काही दिवस हॉस्पिटल मध्ये होता पण डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. त्यानंतर असेच हमले होत राहिले आणि म्युनिख हमल्याला जिम्मेदार असलेले सर्व आतंकवादी मारले गेले. हे ऑपरेशन करताना मोसाद ने कोणाचाही विचार केला नाही. बेरूत मधील एका युनिव्हर्सिटी मध्ये काम करणाऱ्या प्रोफेसर ला सुद्धा मारले.त्या प्रोफेसर वरती मोसाद ला संशय होता कि म्युनिख हत्या कांड मध्ये त्याचा सुद्धा हात होता.

ह्या सर्व आतंकवाद्यांना मारण्या आगोदर मोसाद त्यांच्या घरी फुलांचा एक गुलदस्ता पाठवत होते. आणि त्यावर लिहिलेले असायचे “आम्ही विसरत नाही आणि माफ सुद्धा करत नाही “यावेतिरिक्त पेपर मध्ये सुद्धा मरणारा विषयी शोक संदेश लिहिला जात असे. त्यामुळे मरणाराला जास्तच भीती वाटत असे.

OPERATION WRATH OF GOD

mosad

ऑपेरेशन स्प्रिंग ऑफ युथ

या अचानक हल्ल्यामुळे आतंकवाद्यामध्ये घाबराट सुटली होती. मोसाद च्या लिस्ट मधील तीन आतंकवाद्यानि आपल्या घरासमोर सुरक्षा लावली होती. त्यांना मारणे मोसाद साठी अवघड होऊन बसले होते. मोसाद ने यांना मारण्यासाठी स्पेशल ऑपरेशन चा फ्लान करावा लागला त्या ऑपरेशन चे नाव होते. स्प्रिंग ऑफ युथ. या ऑपरेशन साठी इसराईल नेवी आणि एअरफ़ोर्स चा उपयोग घेतला गेला.स्पीड बोट घेऊन इसराईली स्पेशल फ़ोर्स चे कमांडो लेबनान च्या किनाऱ्यावर आले. त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांची वेशभूषा केली. काही कमांडोनी बुरखा घातला आणि टार्गेट पर्यंत गेले. रोतो रात हे कमांडो त्या बिल्डिंग मध्ये गेले आणि त्या तीन आतंकवाद्यांना मारून बाहेर पडले.

हे सर्व चालू असताना इसराईल च्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या हत्तेचा सुद्धा प्रयन्त झाला होता. पण मोसाद आतंकवाद्याच्या या प्लान वरती पाणी फिरवले. पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या हत्येचा प्लान बनविणारा आतंकी ‘आली हसन सलामेह ‘होता तो भरपूर दिवस मोसाद ला चकमा देत होता पण शेवटी 1979ला मोसाद ने त्याच्या गाडीत बॉम्ब ठेवला आणि त्याचा सुद्धा खात्मा केला.

GOLDA MAIR

सिरियाई गृहयुद्ध ज्याने जग दोन भागात विभागले गेले होते. -भाग 2

आपण बघत आहोत सिरिया मधील गृह युद्ध भाग एक मध्ये काही भाग बघितला आता बघूया भाग 2

गृहयुद्ध

सिरियाई विद्रोह हा गृहयुद्धा मध्ये कधी बदलून गेला हे कोणालाच समजले नाही. जुलै महिन्यात सिरियाई सैन्या मधून काही विद्रोही पळून गेले होते आणि त्यांनी एक विद्रोह गट निर्माण केला त्याचे नाव होते ‘फ्री सिरीयन आर्मी ‘पण स्थानिक लोकांनी त्यांना मान्यता दिली नाही.

2011च्या शेवटी आणि 2012च्या सुरवातीला हा सत्तासंघर्ष थांबवण्यासाठी अंतरराष्ट्रीय संघटनानी भरपूर प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नोव्हेंबर 2011च्या सुरवातीला काही सिरीयन अधिकाऱ्यांनी एका समझोत्यावर सहमती दाखवली. अरब लीग ने सांगितले सिरियाई सरकार प्रदर्शन कारी लोकांवर हिंसा करते ती थांबवावी, शहरा मधून सैनिक आणि त्यांचे टॅंक हटवावे, प्रदर्शनकारी जे अटक झाले होते त्यांना सोडावे. डिसेंबर 2011मध्ये डिसेंबर 2011मध्ये सिरिया सरकार ने अरब लीग च्या अधिकाऱ्यांना सिरिया मध्ये येऊन निरीक्षण करण्याची अनुमती दिली.

दुसरा करार, संयुक्त राष्ट्र महासचिव च्या मध्यस्थीने झाला. कोफी अन्नान च्या नेतृत्वात संयुक्त राष्ट्र आणि अरब लीग यांच्या द्वारा एका प्रयोजित संयुक्त राष्ट्र महासभा 75व्या सत्रात एक युद्ध विराम झाला. पण त्यानंतर लवकरच पुन्हा एकदा सिरिया मध्ये हिंसा सुरु झाल्या आणि सुरवाती पेक्ष्या जास्त प्रमाणात ह्या हिंसा होत्या. आणि त्यामुळे अरब लीग आणि सयुक्त राष्ट्राची टीम यांना वापस बोलावण्यात आले.प्रदर्शनकारी आणि सरकार यांच्यात शांती स्थापित करण्यात सफलता भेटली नाही.

त्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि अरब लीग ने या समाधानासाठी आंतरराष्ट्रीय संमेलन मध्ये जिनेवा विज्ञप्ती तयार केली. पण या साठी अमेरिका आणि रुस यावर सहमत न्हवते.कारण येणाऱ्या काळात सिरियाच्या सरकारात असद ला घ्यायचे का नाही हा विषय होता.

2012च्या सुरवातीला स्पष्ट झाले होते कि ऑगस्ट 2011मध्ये इस्ताबूल मध्ये गठीत विध्यार्थी समूह सिरिया राष्ट्रीय परिषद (snc)विपक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप कमजोर आहे कारण त्यांच्यात अंतर्गत मतभेद होते.

त्यानंतर नोव्हेंबर मध्ये सिरियातील सर्व सरकार विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार विरोधात एक गटबंधन तयार केले ‘सिरिया क्रांतिकारी आणि विपक्षा साठी’ राष्ट्रीय गठबंधन तयार केले. आणि केवळ एका महिन्यात भरपूर देशानी यांना मान्यता दिली. 2012च्या उन्हाळ्यात विद्रोही लोकांना काही प्रमाणात सफलता मिळवता आली. सिरियाच्या सैनिकांना उत्तर आणि पूर्व च्या इलाख्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे विद्रोहीना पहिली वेळ एका महत्वपूर्ण जागेवर नियंत्रण करता आले.

जैले महिन्यात सिरियाचे सर्वात मोठे शहर अलेप्पो वरती हल्ला केला आणि शहराच्या पूर्व भागात नियंत्रण केले.

2013च्या सुरवातीला सिरीयन सैनिकांनी विद्रोहीना बरेच मागे ढकलले विद्रोहीनी उत्तरी भागात आपली पकड मजबूत बनवली. पण त्यांच्याकडे सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी हात्त्यार कमी होते त्या मुळे ते कमजोर पडले आणि सिरीयन आर्मी सुद्धा इथे कमी पडत गेली.

जे क्षेत्र विवादित होते त्या क्षेत्रात लढाया जास्त प्रमाणात होत होत्या. त्यामुळे सामान्य माणूस सुद्धा त्या मध्ये नहाग मारल्या जात होता. आणि या सामान्य माणसाच्या मृत्यू चा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला होता.

ही लढाई कोणत्याही निर्णयाकडे जात न्हवती ना सरकार जिंकले होते ना विद्रोही त्या मुळे ज्यांच्या त्यांच्या अंतरराष्ट्रीय सहयोगिनी समर्थन वाढवायला सुरवात केली. टर्की, सौदी अरब आणि कतर हे देश विद्रोहीना हत्यार देत होते. अमेरिकन सरकार हत्यार देण्यासाठी घाबरत होते कारण त्यांना भीती होती कि शस्त्र आतंकवाद्याच्या आणि कट्टर पंथी लोकांच्या हाताला लागतील. 2012च्या शेवटी हिजबुल्ला संघटनाने सुद्धा सिरिया सरकार ला मदत दिली.

त्यानंतर सिरिया गृहयुधाच्या दिशेने वाटचाल करू लागला.

युद्धात रासायनिक हत्त्यार

21ऑगस्ट 2013ला दमिश्क शहराच्या भागात रासायनिक हाथीयारांचा हल्ला झाला आणि हजारो लोक मारल्या गेले त्यानंतर सिरिया मध्ये अंतरराष्ट्रीय सैन्य कारवाईसाठी आव्हान करण्यात आले.

सिरियाच्या विपक्ष दलानि सरकार वरती आरोप केले कि हे हल्ले सरकार समर्थीत लोकांनी केले पण असद सरकार ने साफ नकार दिला आणि विद्रोही लोकांना जिम्मेदार ठरविले.त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या हाथीयार निरंक्षकांनी रासायनिक स्थळावर सबूत एकत्र केले आणि सिरीयन सरकार ची निंदा केली. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी सांगितले होते ते असद सरकार च्या विरोधात कारवाई करण्या संबंधि विचार करत आहेत. त्यानंतर रुस, चीन आणि इराण यांनी सुद्धा असद सरकार ला उधड पणे पाठिंबा दिला. आणि पश्चिम देशा विरोधात लढण्याची ग्वाही दिली.

ऑगस्ट च्या शेवट पर्यंत अंतरराष्ट्रीय कारवाई होणार ही गोष्ट फिकी पडली. अमेरिका आणि इंग्लंड हे सिरियामध्ये सैन्य कारवाईच्या विरोधात होते. इंग्लंड संसदेत सिरिया मध्ये सैन्य कारवाई करण्या संबंधी मतदान झाले आणि विफल ठरले. अमेरिकी काँग्रेस मध्ये सुद्धा 10सप्टेंबर ला मतदान होणार होते पण ते स्थागित करण्यात आले. आणि त्याच वेळेला कुटनीती सर्वांच्या कामी आली. 14सप्टेंबर ला रुस सिरिया आणि अमेरिका यांच्या त एक करार झाला त्या नुसार सिरिया मधील संपूर्ण रासायनिक हत्यार आंतरराष्ट्रीय नियंत्रणात असतील असे ठरले या कराराला लागू केले 30जून 2014 साली आणि या कराराची समय सीमा पर्यंत सिरिया मधून रासायनिक हत्यार काढून घेण्यात आले.

नुसरा फ्रंट आणि isis चा उदय

2013साली इस्लामिक आतंकवाद्यानी महत्वाच्या जागी कब्जा करायला सुरवात केली. कारण तोपर्यंत विद्रोही सैनिक आणि सरकार यांच्यातील लढाईने त्यांचे सैनिक कमजोर झाले होते.

नुसरा फ्रंट (जबाहत अल नुसरा )सिरिया मध्ये सक्रिय असलेली संघटना अल कायदा सोबत मिळालेली होती. ही संघटना बाकीच्या आतंकवादी तुलनेत मोठी होती.

इकडे एप्रिल मध्ये isis चा ‘अबू बक्र अल बगदादी ‘ने घोषणा केली होती कि इराक मध्ये isis संघटना नुसरा फ्रंट सोबत मिळवेल. पण नुसरा फ्रंट आणि isis यांच्यात छोट्या मोठ्या लढाया होत राहिल्या. कारण isis ला सिरिया मध्ये आपले पाय रोवायचे होते. ज्याची सुरवात ‘अल रक्का ‘शहरातील ‘फरात’ घाटी पासून झाली आणि त्याचा विस्तार इराक सिरिया सीमा भागा पर्यंत झाला.

अंतराष्ट्रीय हस्तक्षेप आणि रुस चा प्रवेश

इराक मध्ये isis ची अचानक बढत झाली. ज्याच्या सोबत हिंसक आणि क्रूर प्रचाराची सुद्धा सुरवात झाली. त्यावेळी जागतिक पातळीवर isis विरोधात कारवाईची मागणी होत होती. त्यानंतर ही मागणी आणखी त्रिव होत गेली.

8ऑगस्ट ला अमेरिकेने isis ला उत्तरी इराक मध्ये रोकून धरले कारण समोर कुर्द क्षेत्र होते या भागात इसाई आणि यजदी समुदाय राहत होते. त्यामुळे अमेरिकेने isis वरती हवाई हल्ले सुरु केले. पण त्यानंतर isis च्या आतंकवाद्यानी काही क्रूर वीडियो पाठवायला सुरवात केली ज्यामध्ये पत्रकारांचे गळे कापले होते. 33डिसेंबर ला अमेरिका आणि अरब देश यांनी एक गठबंधन करून सिरिया मध्ये isis च्या ठिकाणावर हवाई हमले केले.

2015मध्ये रुस यामध्ये आणखी सक्रिय झाला.’लताकीया ‘मध्ये एका हवाई अड्डयावर रुसी सैनिकांना तैन्यात करण्यात आले.

सप्टेंबर मध्ये रुस ने पहिला हवाई हमला केला. रशियाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला होता कि हवाई हमले isis ला निशाणा बनवत आहेत. पण त्यानंतर अमेरिकेने आरोप केला कि रशिया असद च्या विरोधात लढणाऱ्या विद्रोही लोकांवर हल्ले करत आहे. रुस ने सुद्धा अमेरिकेवर आरोप केला होता कि अमेरिका isis च्या ठिकाणावर हल्ला न करता सिरीयन आर्मी वर करत आहे.

सप्टेंबर 2016मध्ये रुस आणि सिरीययी सैनिक आणि पश्चिम समर्थीत विद्रोही मध्ये युद्ध विराम संपल्यानंतर रुस ने व सिरीयन सैनिकांनी विद्रोहीच्या कब्जात असलेले ‘अल्लेपो’ शहर आणि त्याचा पूर्वी हिस्सा वर आपले ध्यान केंद्रित केले. त्यानंतर रसियाने भरपूर हवाई हल्ले केले.

2016पर्यंत isis काही वर्ष उत्तरी सिरिया आणि पूर्वी सिरिया मध्ये अजेय होत होता. त्यानंतर कुर्द सैनिक, अमेरिकी सहयोगि, इराण रुस समर्थीत असद सैनिक यांच्यातील टाकरावणे isis कमजोर पडू लागला.

उत्तरेला कुर्द आणि तुर्की समर्थीत सैनिक यांनी तुर्की सीमा भागात आपली पकड मजबूत केली. त्यामुळे isis च्या हातून एक महत्वपूर्ण क्षेत्र गेले. आणि अमेरिकेने isis वरती हवाई हमले आणखी जास्त वाढवल्यामुळे isis खूप जास्त कमजोर झाले.

असद सरकार पडले

2024मध्ये एक नवीन विद्रोह झाला त्यावेळी असद सरकार ला आंतरराष्ट्रीय समर्थन जास्त मिळत न्हवते. रुस युक्रेन युद्धा मुळे रुस ची असद ला सहायत्ता खूप कमी होती. आणि इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे असद ला इराण कडून सुद्धा जास्त समर्थन मिळत न्हवते. आक्टोबर मध्ये हिजबुल्हाने सुद्धा सिरिया मधून त्यांचे माणसं वापस बोलावले होते.

त्यानंतर hts एका आठवढ्यात ‘हामा’ पर्यंत आपला विस्तार करण्यात त्यांना यश मिळाले.त्यानंतर ‘दरारा आणि होम्स वरती 7डिसेंबर ला कब्जा केला. त्यानंतर विद्रोही सेना ‘दमिश्क’ शहरात आली आणि रातो रात त्यांनी ‘दमिश्क’शहरावर आपले नियंत्रण मिळवले. त्यावेळी त्यांना समजले कि असद हे देश सोडून पळून गेले होते. त्यानंतर सिरिया मध्ये नवीन सरकार चे गठन करण्यात आले आणि असद सरकार कायमचे कोसळले.असद यांनी रुस मध्ये राजकीय आश्रय घेतला आहे.

what is indus water treaty?काय आहे सिंधू जल करार? ज्याने पाकिस्तान चा थरकाप उडाला आहे.

भारताच्या जमिनीवर आणखी एकदा आतंकवादी हमला झाला. भारत सरकार ने आतंकवाद्याला समर्थन देणाऱ्या पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली आहे.भारत सरकार ने सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान चे चांगलेच कंबरडे मोडणार आहे आणि या मुळे पाकिस्तान मध्ये अन्न, पाणी आणि ऊर्जा चे मोठे संकट उद्भवणार आहे.

दक्षिण काश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकावर आतंकवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकार सुरक्षा समितीची (CCS) बैठक झाली. या बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले या मध्ये 1960झाली झालेल्या ‘सिंधू जल करार ‘ला थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

काश्मीर मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्या नंतर पाकिस्तान च्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे, असे बोलले जात आहे. सिंधू जल करारा मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये नेहमी वाद होत आला आहे. या मध्ये आपल्याला माहित असणे आवश्यकत आहे कि सिंधू जल करार काय आहे?

काय आहे सिंधू जल करार

भारत आणि पाकिस्तान मध्ये सिंधू जल करार हा 19सप्टेंबर 1960 ला कराची मध्ये झाला होता. हा करार सिंधू नदीच्या उपनद्या चे पाणी वापर साठी झाला होता. विश्व् बँक या करारासाठी भारत आणि पाकिस्तान मध्ये 9 वर्षा पासून बोलणी करत होते. भारता कडून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तान कडून राष्ट्रपती अयुब खान ने या करारावर स्वाक्षरी केली.

सिंधू करारा वर भारत सरकार पुन्हा एकदा विचार करत होते.

भारताने जानेवारी 2023 मध्ये पाकिस्तान ला सिंधू जल करारावर बदल करण्यासाठी एक नोटीस पाठवली होती यामध्ये भारताने झालेल्या करारावर आणखी सुधार करायची असे बोलले होते. त्या नंतर दीड वर्ष्याने सप्टेंबर 2024मध्ये भारत सरकार ने पुन्हा एकदा पाकिस्तान ला नोटीस पाठवली होती.

या मागचा भारत सरकार चा उद्देश होता कि मागील 64वर्ष्यापासून जो करार झाला होता तो रद्द करून नवीन करार करण्यात यावा. भारत पाकिस्तान सिंधू जल करारा मध्ये अनुच्छेद XII(3) नुसार दोघांच्या सहमतीने वेळो वेळी या करारा मध्ये सुधारणा करू शकतो. भारताने या अनुच्छेद चा वापर करून पाकिस्तान ला या करारा मध्ये बदल करण्यासाठी नोटीस पाठवली होती.

भारताने जम्मू काश्मीर मध्ये दोन जल विदयुत प्रकलपाचे काम चालू केले आहे. त्यामध्ये एक परियोजना बंदिपोरा जिल्ह्यातील झेलम नदीची उपनदि किशनगंगा नदीवर आहे. आणि दुसरा रतले हाईड्रॉइलेक्ट्रिक प्रकल्प किश्तवाड जिल्हातील चेनाब नदीवर आहे. दोन्ही प्रकल्प नदीच्या प्राकृतिक पद्धतीने वीज बनवू शकतात.

भारताचा उद्देश आहे कि या प्रोजेक्ट पासून क्रमश :330मेगावॅट आणि 850मेगावॅट ऊर्जा बनवण्याचे लक्ष आहे.

indus water

पाकिस्तान याचा विरोध करत आहे.

पाकिस्तान चा या प्रकल्पला लगातार विरोध होत आहे. पाकिस्तान चे म्हणणे आहे हे प्रकल्प म्हणजे सिंधू जल कराराचे उ्लंघन आहे. आणि भारत सरकार ने सुद्धा या विषयी बातचीत करण्यासाठी बोलले होते. या साठी नोटीस सुद्धा पाठवल्या होत्या.

शहापूर कडी बांध

सिंधू जल विभाजन साठी भारत आणि पाकिस्तान मध्ये 1960 ला सिंधू जल करारा वर हस्ताक्षर झाले होते. कराराच्या अनुसार भारताला रावी, व्यास आणि सतलज या तीन नद्याच्या पाण्याचा पूर्ण अधिकार भेटला. भारत सरकार च्या म्हणण्यानुसार रावी नदी चे पाणी माधोपूर हेडवर्क च्या माध्यमातून पाकिस्तान मध्ये बरबाद होत आहे. पाण्याची ही बरबादी थांबवण्यासाठी ‘शहापूर कडी बांध’ परियोजना ची कल्पना केली.

शहापूर कडी बांध विषयी समजण्यासाठी 1979च्या करारा विषयी समजणे आवश्यक आहे. जानेवारी 1979 मध्ये पंजाब आणि जम्मू काश्मीर यांच्यात एक द्विपक्षीय करार झाला. या करारा च्या अनुसार ‘रणजित सागर ‘ बांध आणि शहापूर कडी बांध चे निर्माण पंजाब सरकार द्वारा केले जाणार होते. रणजित सागर बांध ऑगस्ट 2000 मध्ये चालू केले होते. शहापूर कडी बांध परियोजनेला रावी नदी च्या रणजित सागर बांधाच्या 8किमी अपस्ट्रीम वर बनवायचे होते. योजना आयोगाने नोव्हेंबर 2001 ला या परियोजना मंजूर केल्या.

पाकिस्तान मध्ये अन्नाचे आणि पाण्याचे संकट येऊ शकते.

सिंधू नदीचे पाणी थांबवल्या नंतर पाकिस्तान मध्ये पाण्याचे संकट येऊ शकते पाकिस्तान ची 80%शेती या पाण्यावर अवलंबून आहे. पाणी थांबवल्यानंतर पाकिस्तान मध्ये अन्न आणि पाण्याचे संकट येऊ शकते. सिंधू नदीवर पाकिस्तान चे प्रमुख शहर कराची, लाहोर, मुलतान हे निर्भर आहेत. पाकिस्तान चे तरबेला आणि मंगला सारखे पॉवर प्रोजेक्ट या नदीवर निर्भर आहेत. आणि या मुळे नक्कीच पाकिस्तान चे कंबरडे मोडणार आहे.

sindhu jal karar

सिरियाई गृहयुद्ध ज्याने जग दोन भागात विभागले गेले होते. -भाग 1

मार्च 2011मध्ये सिरीयाच्या एका भागात लोकशाही मार्गाने विरोध प्रदर्शन सुरु झाले. प्रदर्शनाचे कारण होते असद सरकार बरखास्त करण्याची मागणी कारण असद सरकार हे सत्तावादी होते. आणि याची सुरवात 1971मध्य झाली जेव्हा ‘बशर अल असद ‘ चे वडील ‘हाफिज अल असद ‘ हे सिरियाचे राष्ट्रपती झाले.

हे प्रदर्शन दाबण्यासाठी सिरीयाई सरकार ने प्रदर्शनकारी लोकांसोबत हिंसा केली होती. ज्यामध्ये, पोलीस, सेना आणि अर्धसैनिक यांचा उपयोग केला होता.

नंतर हे प्रदर्शन गृहयुद्धात बदलून गेले. नोव्हेंबर 2024 च्या शेवटी सैन्य सहयोग समाप्त झाला.त्यामुळे सिरिया देशामधील विपक्ष आणखी मजबूत झाला. आणि असद सरकार हे कमजोर पडले. डिसेंबर च्या सुरवातीला ‘बशर अल असद ‘ देश सोडून पळून गेले आणि रशिया मध्ये त्यांनी आश्रय घेतला.

तर आज आपण पाहणार आहोत सिरिया देशातील गृह युद्ध आणि त्यामागील इतिहास.

सिरिया मध्ये विद्रोह

जानेवारी 2011मध्ये सिरियाचे राष्ट्रपती ‘बशर अल असद ‘यांना विचारले कि अरब जगतात जे सत्तावादी सरकार च्या विरोधात विरोध प्रदर्शन सुरु आहेत त्यामध्ये ‘ट्युनिशिया,’ आणि ‘मिस्र ‘या देशातील सत्तावादी सरकार संपले आहे आणि हे प्रदर्शन सिरिया पर्यंत पोहचेल का? तेव्हा असद यांनी सांगितले होते कि सिरिया मध्ये आर्थिक समस्या भरपूर आहेत. आणि ही समस्या सुधारण्यासाठी प्रगती खूप हळू आहे. पण त्यांना विश्वास होता कि सिरिया मध्ये असे कोणतेही प्रदर्शन होणार नाही कारण ते अमेरिका आणि इस्राईल चा विरोध करतात आणि ही मान्यता सिरीयन लोकांचीच आहे.

पण त्या नंतर काही आठवड्यातच सरकार विरोधात प्रदर्शन सुरु झाले. आणि त्यावेळी संपूर्ण जगाला समजले कि असद ने जे सांगितले त्या पेक्ष्या जास्त आर्थिक समस्या सिरिया मध्ये आहेत.

एकच घराणे सत्तेवर असल्यामुळे आर्थिक समस्या आणखी जास्त वाढतच गेली. जेव्हा ‘बशर अल असद’ यांनी पदभार सांभाळला तेव्हा वर्ष होते 2000 आणि ‘बशर अल असद ‘यांच्याकडे जनता सुधारक आधुनिकरन करणारा अश्या नजरेने बघत होती.

असं जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा जनतेमध्ये एक नवीन अशा निर्माण झाली होती पण ती काही पूर्ण झाली नाही पण पण त्या उलट असत ना त्यांच्या वडिलांसारखेच केले आणि असंच सरकार विरोधी जर कोणी जात असेल तर त्याला क्रूर मारल्या जात असे

सुरुवातीला असद अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फायदा जनतेला न मिळता देशातील पुंजीपतींना च भेटला . त्यामुळे सिरिया मध्ये आर्थिक असमानता जास्त प्रमाणात वाढू लागली.

सिरीयच्या विद्रोहामध्ये पर्यावरण संकटाची सुद्धा भूमिका होती. 2006ते 2010 पर्यंत सिरिया मध्ये दुष्काळ होता. त्यामुळे लाखो शेतकरी कर्जबाजारी होऊन गरिबी रेषेखाली गेले. त्यामुळे गावातील जनता शहरा कडे गेली. मार्च 2011 मध्ये सिरियाच्या दक्षिण भागात जिथे दुष्काळ पडला होता तिथे पहिले आणि मोठे विरोध प्रदर्शन झाले होते.

या विरोध प्रदर्शनामध्ये एक मुलांचा ग्रुप आला होता ते सुद्धा प्रदर्शन करत होते आणि असद विरोधी काही पोस्टर त्यांनाकडे होते. त्यानंतर तेथील पोलिसांनी त्या मुलांच्या ग्रुप ला अटक केली आणि त्यांना प्राताडित केले.

स्थानिक जनता राजनीतिक आणि आर्थिक सुधारणासाठी रस्त्यावर आले होते. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. प्रदर्शन करणार्यांना अटक झाली आणि त्यांच्यावर गोळीबार सुद्धा केला. त्यामुळे संपूर्ण सिरिया भर विरोध प्रदर्शन सुरु झाले आणि ते काही प्रमाणात हिंसक सुद्धा झाले होते. तेव्हा प्रदर्शनकारी लोकांवर गोळीबार केलेल्याचे video सुद्धा आले होते.

सुरवातीपासून सरकार आणि विद्रोही यांच्यात एक संप्रदायिक तेढ होते. या मध्ये प्रदर्शन करणारे सुन्नी होते आणि सत्ताधारी असद हे ‘आलावी ‘पंथाचे होते. असद घराणे हे सिरिया मध्ये आल्पसंख्यक होते.

सुरवातीला संप्रदायिक विभाजन जास्त प्रमाणात न्हवते. जसा जसा संघर्ष होत गेला तसें संप्रदायिक विभाजन होत गेले. पण सुरवातीपासूनच काही कट्टरपंथी सिरिया मध्ये ‘आलावी’ पंथीयांना मारत होते.

त्यानंतर विरोध प्रदर्शन जास्त प्रमाणात होत गेले आणि सरकार सुद्धा या विरोधात कठोर कारवाई करत होते.

असद सरकार ने ज्या शहरात जास्त प्रदर्शन होत होते ते संपूर्ण शहर घेरायला सुरवात केली. त्यावेळी काही प्रदर्शन कारणाऱ्या लोकांनी सरकार विरुद्ध हाथीयार उचलायला सुरवात केली. त्यानंतर असद सरकार ने सुद्धा मोठे पाऊल उचलायला सुरवात केली आणि जून महिन्यात सिरियाई सेना ‘टॅंक’ घेऊन ‘जिस्र अल शुगर ‘ नावाच्या शहरात गेली. तेव्हा भरपूर लोकांचे पलायन झाले आणि ते लोक तुर्की मध्ये गेले.

siriyan civil war

2011च्या उन्हाळ्यापर्यंत सिरिया देश्यातील विद्रोह बद्दल संपूर्ण जगाला कळाले. आणि त्या वेळेला जग सुद्धा दोन भागात विभागले गेले काही देश असद सरकार कडून होते तर काही देश विद्रोही लोकांना पाठिंबा देत होते. अमेरिका आणि युरोपीय संघ असद सरकार ची आलोचना करत होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा आणि काही युरोपीय राष्ट्रअध्यक्ष असद ला आपला पदभार सोडण्याचे सांगत होते. 2011च्या शेवटी कतर,तुर्की आणि सौदी अरब यांनी मिळून असद च्या विरोधात एक गट निर्माण केला. यामध्ये सिरिया देशाचे जुने मित्र इराण आणि रुस ने असद सरकार ला आपले समर्थन दिले.

siriya war

इराण परमाणू कार्यक्रम काय आहे? जाने अमेरिका आणि इस्राईल नेहमी सतर्क असतात.

इराण आणि जगातील सहा प्रमुख ताखती यांनी इराण परमाणू समझोता केला होता. त्या मध्ये अमेरिका सुद्धा होती पण वर्ष 2018मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा या समझोत्यातून अमेरिका बाहेर पडली.

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण वरती पुन्हा आर्थिक प्रबधं लावले त्यामुळे इराण नाराज झाले. आणि इराण वरती सैन्य कारवाईची सुद्धा धमकी दिली.

तर इराण आणि अमेरिका, इस्राईल यांच्यात नेहमी वाद होत असतो त्या वादाचे मुख्य कारण आहे इराण परमाणू कार्यक्रम तर आज आपण बघणार आहोत इराण परमाणू कार्यक्रम विषयी या परमाणू कार्यक्रमा मुळे इस्राईल आणि अमेरिका नेहमी सतर्क असतात. या मध्ये इस्राएल च्या म्हणण्यानुसार जर इराण हा परमाणू संप्पन देश साला तर ते इसराईल च्या अस्तित्वासाठी खतरनाक आहे त्यामुळे नेहमी इस्राईल हा इराणच्या परमाणू कार्यक्रमा विरोधात असतो आणि त्या विरोधात कारवाई करत असतो. तर बघूया थोडक्यात काय आहे? इराण परमाणू कार्यक्रम ज्या मुळे इस्राईल आणि अमेरिका नेहमी सतर्क असतात.

इराण ला परमाणू बॉम्ब ठेवण्याची परवानगी का नाही?

इराण चे म्हणणे आहे त्यांचा परमाणू कार्यक्रम केवळ नागरी उद्देशासाठी आहे. इराण नेहमी सांगत असतो कि इराण परमाणू बॉम्ब विकसित करत नाही.पण संपूर्ण जगभरातील परमाणू कार्यक्रमावर नजर ठेवणारी संस्था ” आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी “(IAEA) इराण च्या या दाव्याला सहमत नाही.

वर्ष 2002 मध्ये जेव्हा इराण च्या गुप्त परमाणू ठिकाणाचा पत्ता लागला. तेव्हा पासून इराण हा येणाऱ्या काळात परमाणू बॉम्ब बनवेल असा संशय येत होता.

NPT नावाची अंतरराष्ट्रीय संस्था सैन्या साठी आणि बाकी गरजा साठी परमाणू तकनिक वापरण्याची अनुमती देते. यामध्ये शेती,ऊर्जा, चिकित्सा साठी अनुमती आहे. पण परमाणू बॉम्ब बनवण्याची कोणतीही परवानगी देत नाही.

वर्ष 2018 मध्ये जेव्हा अमेरिका JCPOA पासून दूर झाला तेव्हा पासून इराण ने अमेरिकेने लावलेल्या प्रतिबंधा विरुद्ध उ्लंघन करायला सुरवात केली.

इराण चा परमाणू बॉम्ब किती विकसित आहे?

इराण ने युरेनियम संवर्धणासाठी हजारो सेंट्रिंफ्युज मशीन विकसित केली आहे. आणि यावर सुद्धा JCPOA ने प्रतिबंध लावले होते.

परमाणू बॉम्ब साठी 90% शुद्ध युरेनियम ची आवश्यकता असते आणि JCPOA नुसार इराण ला केवळ 300किलो ग्राम युरेनियम ठेवण्याची आवश्यकता होती आणि एवढे युरेनियम बाकी कामासाठी पुरे आहे.

त्यानंतर IAEA च्या म्हणण्यानुसार 2025 पर्यंत इराण जवळ 275किलो ग्राम युरेनियम होते. ज्याला इराण ने 60%पर्यंत शुद्ध केले होते. आणि इराण ने या युरेनियम ला आणखी जास्त शुद्ध केले असते तर इराण ने नक्कीच परमाणू बॉम्ब विकाशित केला असता. काही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इराण त्या युरेनियम ला केवळ एका आठवड्यात परमाणू बॉम्ब बनवण्याच्या प्रमाणात बदलू शकतो आणि काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्या नुसार इराण एक ते दीड वर्ष्यात परमाणू बॉम्ब बनवू शकतो.

अमेरिका इराण परामानु समाझोत्या मधून बाहेर का पडला?

संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि युरोप संघाने वर्ष 2010 मध्ये इराण वर आर्थिक प्रतिबंध लावले होते. कारण त्यांना संशय होता कि इराण परमाणू बॉम्ब बनवत आहे.

या आर्थिक प्रतिबंधमुळे इराण ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल विकता येणार नव्हते आणि 100अरब डॉलर पेक्ष्या जास्त इराण ची विदेशी मुद्रा फ्रिज केली.

त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था दाबघाईला आली आणि इराणी चलन खूप प्रमाणात कोसळले.यामुळे देशात प्रमाणापेक्षा जास्त महागाई वाढली.

वर्ष 2015 मध्ये इराण आणि जगातील प्रमुख सहा देश ज्यामध्ये अमेरिका, चिन, फ्रान्स, रुस, जर्मनी, ब्रिटन हे देश JCPOA वरती सहमत होते. या मध्ये इराण परमाणू कार्यक्रमा संबंधी जे काही करण्याची अनुमती या वरील देशानी दिली होती त्या सोबत काही अटी सुद्धा होत्या. ज्यामध्ये इराण परमाणू ठिकाणाची चौकशी होईल. आणि त्या बदल्यात इराण वरती जी आर्थिक पाबंदी लावली होती त्याला हटवण्याची सुद्धा अनुमती दिली होती.

JCPOA 15 वर्ष्या करता होता. त्यानंतर इराण वरती लावलेले आर्थिक प्रतिबंध संपणार होते.

त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती पदावर डोनाल्ड ट्रम्प आले आणि 2018 साली त्यांनी JCPOA कायद्यापासून अमेरिकेला दूर केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हा सौदा एकदम बेकार होता.

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय आल्यानंतर इस्राईल ने या निर्णयचे स्वागत केले होते कारण सुरवातीपासून इस्राईल या विरोधात होता.

इस्राईल च्या म्हणण्यानुसार इराण हा गुप्त पणे परमाणू बॉम्ब बनवत आहे. आणि इराण ला जे अरबो डॉलर्स दिले आहेत ते पैसे इराण आपली सैने ताकत वाढवण्यासाठी वापरत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती कि इराण सोबत वार्ता करण्यासाठी अमेरिका तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प नेहमी म्हणतं आले कि JCPOA पेक्ष्या चांगला सौदा करणार पण इराण ने या साठी नकार दिला होता.

अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा म्हणाले होते की इराण ने जर नवीन समझोता नाही केला तर इराणवर अमेरिका हल्ला करेल.

त्यानंतर इराणचे विदेश मंत्री “अब्बास आराघची ” यांनी सांगितले कि ते बातचीत करण्यासाठी तयार आहेत. पण अमेरिकेने कोणतीही सैने कारवाई करू नये आणि या साठी ते सहमत झाले पाहिजे.

इसराईल प्रधान मंत्री नेत्यांनाहू यांनी म्हटले आहे या मध्ये स्वीकार करण्यासारखे काहीच नाही फक्त एकच सौदा होईल तो म्हणजे इराण ने आपला परमाणू बॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम बंद करावा.

नेत्यांनाहू हे सुद्धा म्हणाले होते कि जर इराण या साठी तयार नसेल तर आम्ही अमेरिकेच्या देखरेखी मध्ये इराण चे परमाणू ठिकाणे उडवून देऊ आणि जेवढे इराण कडे परमाणू उपकरण आहेत त्यांना सुद्धा नष्ट करू.

इराण ला सर्वात मोठी भीती ही आहे कि अमेरिका इराण वरती त्यांना जे वाटेल तो समझोता करेल आणि जागतिक राजकारणात अमेरिकेची कुटणिती जीत झाली हे सांगतील.

इकडे इसराईल चे म्हणणे आहे जर इराण कडे परमाणू बॉम्ब आला तर तो इसराईल च्या अस्तित्वासाठी खतरा आहे.

Israil hamas war history :इस्राईल हमास युद्धाचा इतिहास
इस्राईल हमास युद्धाचा इतिहास

Israil hamas war history :इस्राईल हमास युद्धाचा इतिहास

मध्य पूर्व म्हणजे युद्धाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे मागील सात ते आठ दशका पासून ही जमीन युद्धाच्या आगीत जळते आहे. अरब आणि येहूदी लोकांचा हा संघर्ष काही नवा नाही हा संघर्ष मागील हजारो वर्षांपासून आहे.खरं तर आज ज्या जमिनी साठी अरब लढतायेत आणि संपूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न करतात कि ही जमीन फक्त फिलिस्तींनी लोकांची आहे पण आपण थोडे मागे जर गेलो तर कदाचित तुम्हला सुद्धा कळेल कि ही जमीन खऱ्या अर्थाने तेथील येहूदी लोकांची आहे. मुस्लिम साम्राज्य जेव्हा मध्ये पूर्वेत सर्वीकडे आपले साम्राज्य सर्व दिशेला वाढवत होत तेव्हा त्यांनी आजच्या इस्राईल वरती सुद्धा कब्जा केला आणि तेथील येहूदी लोकांना त्यांच्याच जमिनीवरून हाकलून दिल.

आज इस्राईल झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढतोय तर आज आपण बघू हमास आणि इस्राईल चा संघर्ष आणि त्या संघर्ष्याचा इतिहास.

Israel hamas war

19व्या शतकात ऑटोमन सम्राज्याच्या नकाशावर एक छोटा जमिनीचा हिस्सा होता. या भागात फक्त दोन शहर होते एक गजा आणि दुसरा खान युनूस.

त्या वेळी या भागात राहणारे काही अरब खेडे गावात सुद्धा राहत होते. हे गाव मिस्र आणि फिलिस्तीन ला जोडणाऱ्या रस्त्यावर होते.

गजा हे शहर समुद्राच्या किनाऱ्यावर होते. आपण त्या समुद्राला भूमध्य समुद्र म्हणून ओळखतो. पहिले महायुद्ध सुरु झाले तेव्हा तिथे अरब जास्त होती आणि येहूदी फक्त 6% होते त्यानंतर 1917 च्या सुमारास ऑटोमन साम्राज्य ऱ्हास झाले आणि तिथे ब्रिटिश साम्राज्य अस्तित्वात आले. आणि संपूर्ण गजा पट्टी ब्रिटिश सम्राज्याच्या आधीन झाली.

याच वेळेला बेलफोर्ड डिक्लिरेशन अस्तित्वात आले आणि हे डिक्लिरेशन आसा विचार होता कि या मुळे येहूदी लोकांमध्ये राष्ट्रवाद जन्माला आला. आणि याच जमिनिवर यहूदी लोकांसाठी देश स्थापन करण्याची चर्चा होऊ लागली.

1920ते 1940 च्या दशकात याच भागात यहूदी लोक येत होते.दुसऱ्या महायुद्धात हिटलर कडून यातना होत असताना या भागात येहुदी लोकसंख्या जास्त प्रमाणात पलायन करून येत होती.

1947 पर्यंत येहुदी लोकसंख्या या भागात 33%झाली आणि यानंतर अरब आणि येहूदी यांच्यात तणाव निर्माण होत होता आणि हा तणाव बऱ्याच वेळा हिंसक होत होता. काही अरबी लोक येहूदी लोकांच्या घरावर चालून जात असत आणि त्यांना मारहान करत असत. त्यांच्या घराला आग लावत असत. या मुळे येहूदी लोक खूप त्रस्त झाले होते आणि त्यांना आता हक्काचे घर पाहिजे होते.

यानंतर युनाटेडनेशन ने 1947साली फिलिस्तीन चे विभाजन केले आणि 55% जमीन येहूदी लोकांना दिली आणि 45%जमीन अरबी लोकांना दिली आणि या भागातील महत्वाचे शहर म्हणजे ‘येरुशा्लेम’ ला अंतराराष्ट्रीय शहर म्हणून घोषित केले.या निर्णयामुळे तेथील अरब लोक नाखुष होती.

इकडे दुसरे महायुद्ध संपले या मध्ये ब्रिटिश सम्राज्यचा सुद्धा ऱ्हास झाला आणि इंग्रजाना हा भाग सोडून द्यावा लागला. 1948 मध्ये येहूदी देश इस्राईल ची स्थापना झाली. आणि या नवीन झालेल्या देश्या विरुद्ध संपूर्ण अरब राष्ट्र एक झाले आणि इस्राईल विरुद्ध युद्ध सुरु केले.

या युद्धनंतर स्थानिक लोकांचा काहीच फायदा झाला नाही पण गजा पट्टी मिस्र देश्याच्या नियंत्रणात आली आणि ईस्ट जेरुसा्लेम जॉर्डन कडे गेल. आणि वेस्ट जेरूसलेम वरती इस्राईल चे नियंत्रण झाले.

1948च्या युद्धात गजापट्टी इस्राईल च्या हातात नाही आली पण त्यावेळचे इस्राईल कामंडर यीगाल अलोन म्हणतं होते या युद्धात इस्राईल ला जर फक्त दोन दिवस भेटले असते तर गजा आज इस्राईल च्या ताब्यात असते.

या युद्धात लाखो फिलस्तींनी लोकांचे विस्थापन झाले. या विस्थापनाला ‘नकाब’असे बोलले जाते. आणि या नंतर गजा मध्ये जागोजागी शरनार्थी दिसत होते. इस्राईल चे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गरियन यांनी 1955 साली गजापट्टीवर कब्जा करण्याचा प्रस्थावं ठेवला त्या मागचा उद्देश होता तेथील शरनार्थी लोकांना लोकांना जॉर्डन मध्ये पाठवणे.

1967 साली पुन्हा एकदा इस्राईल आणि अरब युद्ध झाले त्याला ‘सिक्स दे वार ‘ म्हणून ओळखल्या जात. या युद्धा नंतर मध्य पूर्व चा नकाशा भरपूर प्रमाणात बदलून गेला. इस्राईल ने या युद्धात ईस्ट जेरूसलेम आणि वेस्ट बँक जिंकून घेतले. या नंतर या विषयी भरपूर राजकारण झाले. खरं तर या फिलस्तींनी लोकांना उसकावण्याचं काम बाकी अरब आणि मुस्लिम राष्ट्रानी केल. आणि हमास सारख्या आतंकवादी संघटना जन्माला घातल्या.

1987साली पहिला ‘इतिफादा ‘झाला. इतिफादा हा एक अरबी शब्द आहे याचा अर्थ ‘विद्रोह आंदोलन’ करणे आहे. आणि याचा उद्देश होता वेस्ट बँक आणि पूर्वी जेरूसलेम इस्राईल च्या कब्जातून वापस घेणे. याच वेळेस ‘शेख अहमद यासिन’ ने हमास ची स्थापना केली. हमास चे पूर्ण नाव ‘हरकत अल मुकम्मा अल इस्लामिया ‘म्हणजे ‘इस्लामिक रजिस्ट्स मुमेंट ‘

हमास या संघटनेला भरपूर देशानी आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्या मध्ये अमेरिका, ब्रिटन,इजराइल,जपान,ऑस्ट्रेलिया, इत्यादी.

2004पर्यंत 7000 हजार इस्राईली नागरिक गजा मध्ये राहत होते आणि या लोकांसाठी वीज, पाणी, अन्न आणि इस्राईली फौज तैनात होती. त्यानंतर 2004साली इस्राईल चे पंतप्रधान एरियल शेरोन यांनी म्हटले होते.आता वेळ आली आहे कि गजा मधून सर्व इस्राईली नागरिक काढावे लागतील. आणि त्यानंतर गजा मधून सर्व इस्राईली नागरिक आणि फौज बाहेर काढली त्यानंतर हळू हळू गजा मधून इस्राईल ची ताकत कमी होत गेली. पण फिलाडेफी कॅरिडोर मिश्र आणि गजा मधून जातो तिथे आज सुद्धा इस्राईली आर्मी आहे.

इस्राईल ने सांगितले होते आम्ही गजा मध्ये स्थाई बेस ठेवणार नाही पण एअर स्पेस इस्राईलचाच असेल आणि कोस्ट लाईन वरती इस्राईल ची नजर असेल.त्या वेळेस इस्राईल ने हे सुद्धा बोलले होते कि गजा ही इस्राईल ची अधिकृत जमीन नाही पण आम्ही गजा वर नजर ठेवणार.

इस्राईल आणि गजा भुराजनीती

इस्राईल मागील सात दशकापासून एक देश आहे त्याच्या पूर्वेला आणि दक्षिणेला जमिनीचे दोन भाग आहेत. याला फिलिस्तींनी टेरीटरीज म्हणतात. पूर्व दिशेला वेस्ट बँक, दक्षिण मध्ये गजा पट्टी (या भागाला जमिनीचे दोन भाग यासाठी म्हटले आहे कि यांना देशाचा दर्जा नाही. )

वेस्ट बँक वरती फिलिस्तीन आथॉरिटी म्हणजे PA सरकार चालवते. त्यामध्ये फतेह मुमेंट चा दबदबा आहे. पण वेस्ट बँक वरती त्यांचा दबदबा नाही. कारण तिथे इस्राईल चा दबदबा दिसून येतो.

दुसरी टेरीटरी आहे गजा पट्टी जवळपास 41किमी लांब एक जमिनीचा तुकडा आहे त्याची चौडाई 6ते 12 किमी आहे. त्याची पश्चिम सीमा भुमध्य समुद्राला मिळते आणि उत्तर पूर्व सीमा इस्राईल ला लागून आहे.

2007 पासून गजा पट्टी चा कंट्रोल हमास कडे आहे. या भुभागाविषयी थोडक्यात माहिती आपण बघितली आता आपण जाऊया 7आक्टोबर 2023 कडे. याच दिवशी हमास ने आणि काही फिलिस्तींनी गटांनी इस्राईल वर हमला केला. आतंकवादी इस्राईल च्या सीमा भागात आले आणि इस्राईल चे 1200 पेक्ष्या जास्त नागरिक मारले आणि 250पेक्ष्या जास्त लोकांना बंधक बनविले. त्यानंतर इस्राईल ने गजा विरुद्ध युद्ध सुरु केले.

हे युद्ध 15महिने चालू होते. 15महिन्याच्या युद्धनंतर 17जानेवारी 2025 ला तीन चारणात युद्ध विराम लागू करण्यासाठी इस्राईल आणि हमास तयार झाले. 19जानेवारीला पहिले चरण चालू साले ते 1मार्च पर्यंत संपले पण युद्ध समाप्त न्हवते झाले.

पर्ल हार्बर :जपान च्या या चुकीमुळे, हिरोशीमा आणि नागासाकी घडले

कारण हमास चे आतंकवादी इस्राईली बंधकांना सोडायला तयार न्हवते इस्राईली सरकार ने विनंती करूनही हमास चे आतंकवादी बंधकांना सोडायला तयार न्हवते. त्या मुळे इस्राईल सुद्धा म्हणतं होते जो पर्यंत युl हमास ला संपवणार नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही.

साहजिकच या युद्धामुळे गजा मध्ये संपूर्ण जणजीवन विस्कळीत झाले आणि या युद्धा मुळे इस्राईल चे सुद्धा भरपूर नुकसान झाले. पण कदाचित हे युद्ध बंद होणारच नाही किंवा एक दिवस इस्राईल संपूर्ण गजावर आपले नियंत्रण आणेल.

Israil hamas war history :इस्राईल हमास युद्धाचा इतिहास

Israil hamas war history :इस्राईल हमास युद्धाचा इतिहास

israel hamas war

पर्ल हार्बर :जपान च्या या चुकीमुळे, हिरोशीमा आणि नागासाकी घडले

7डिसेंबर 1941 प्रशांत महासागराच्या एका द्विप समूहावर दोन घंटे अशी बॉम्ब भेक झाली कि दुसऱ्या महायुद्धचे वारे फिरले.

जपान च्या या चुकीमुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली आणि दुसऱ्या महायुद्धाची रूपरेखा पूर्ण पणे बदलली.

त्यानंतर अमेरिकेने जपान च्या हिरोशीमा आणि नागासाकी शहरावर परमाणू हमला केला. आणि दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली.

चला तर आज आपण बघू जपान ने पर्ल हार्बर वरती केलेल्या हल्ल्याची थोडक्यात माहिती.

त्या दिवशी सकाळी सकाळी हवाई द्विप समूहावरील अमेरिकी नौसेनेच्या एका अड्डयावर जपान ने हमला केला. हा हमला एवढा मोठा होता कि पर्ल हार्बर वर तैनात असलेले अमेरिकेचे आठ जंगी जहाज नष्ट झाले. यामधून चार समुद्राच्या तळाशी गेले.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेवरती हा पहिला हमला होता या हमल्यापूर्वी अमेरिका दुसऱ्या महायुद्धा पासून दूर होती पण जपान ने केलेल्या आकस्मित हमल्या मुळे अमेरिका या महायुद्धात उतरली.

जपान च्या या हमल्या मध्ये 2400 पेक्ष्या जास्त अमेरिकी जवान मारल्या गेले आणि सर्व 19जहाज निकामी झाले. त्यामध्ये आठ जंगी जहाज होते. आणि 328अमेरिकी विमान सुद्धा नष्ट झाले.

एवढा सगळा विनाश करायला जपान ला एक घंटा पंधरा मिनिटापर्यंत बमबारी करावी लागली. या हमल्यात 100पेक्ष्या जास्त जपानी सैनिक सुद्धा मारले गेले. त्यानंतर अमेरिका सुद्धा मित्र राष्ट्राकडून या महायुद्धात उतरली.

7डिसेंबर 1941 च्या सकाळी पर्ल हार्बर वर जो हमला झाला ती केवळ एक घटना न्हवती तर तो जपान ने जाणीवपूर्वक केलेला हमला होता.

हा हमला अमेरिकेसाठी खूप आश्चर्यात टाकणारा होता. कारण त्याच वेळेला वॉशिंगटन मध्ये जपानी प्रतिनिधी अमेरिकेच्या विदेश मंत्र्या सोबत बातचीत करत होते. विषय होता जपान वरती अमेरिकेने लावलेले आर्थिक प्रतिबंध कमी करणे.

आणि त्याच वेळेला जपान ने अमेरिकेवर हमला केला. अमेरिकेने जपान वरती या साठी प्रतिबंध लावले होते कि जपान चीन मध्ये जास्त प्रमाणात हस्तक्षेप करत होता. त्यानंतर अमेरिकेने चीन ला सैन्य सहायत्ता देण्याचे ठरवले होते. याच कारणाने जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वरती हमला केला.

त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्र्पती फ्रँकलीन डी रुजवेल्ट ने सुद्धा जपान विरुद्ध युद्धाची घोषणा केली.

जपान अमेरिका संबंध

दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यानंतर सुद्धा अमेरिका आणि जपान मध्ये संबंध बिघडलेले होते.

2016च्या मे महिन्यात तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी यांनी हिरोशीमा शहरला भेट दिली होती.

बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांनी हिरोशीमा शहराला भेट दिली.

क्यूबा मिसाइल संकट :जेव्हा संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धच्या संकटात आले होते

आज रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे या युद्धात अनेक लोक बेघर झाले भरपूर लोक या युद्धात मारले गेले. एकीकडे रुस आणि युक्रेन युद्ध चालू आहे तर दुसरी कडे पॅलेस्टिन आणि इस्राईल युद्ध चालू आहे. संपूर्ण जग या युद्धच्या काळ्या गर्द छायेत गेले आहे. अश्याच प्रकारे साठ वर्ष्यापूर्वी अमेरिका आणि सोवियत रुस मध्ये परमाणू युद्ध होण्याची शक्यता होती. पण ती घटना टाळाली गेली.

60वर्ष्यापुर्वी जग परमाणू युद्धच्या संकटात गेलं होत.

आणि या संकटाला ‘क्यूबा मिसाईल संकटा ‘च्या नावाने ओळखले जाते. क्यूबा मिसाईल संकटाची सुरवात 1962 मध्ये झाली होती.

14आक्टोबर ला अमेरिकन ‘टोही’ विमानाने बघितले कि अमेरिकेच्या फक्त काही किमी दूर अंतरावर क्यूबा मध्ये सोवियत संघाने परमाणू मिसाईल तैनात केली होती.

तेव्हा अमेरिकेला येणारा खतरा समजला त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती यांना सोवियत संघा कडे शांततेचा प्रस्ताव पाठवावा लागला.

रुस ने बदला घेतला

क्यूबा एक लहान द्विपीय कम्युनिस्ट देश ज्याची अमेरिकेसोबत दुस्मनी होती. कारण क्यूबा हा देश कम्युनिस्ट असल्या कारणाने अमेरिकेचा वैचारिक विरोधी होता. आणि अमेरिकेने सुद्धा क्यूबा देश्याच्या राजकारणात हस्तक्षेप केला होता. क्यूबा हा अमेरिकेचा शेजारी देश आहे.

सोवियत संघाने सुद्धा क्यूबा देशाचा वापर आपल्याच फायद्या साठी केला होता. कारण सोवियत संघाला सुद्धा अमेरिकेच्या शेजारी आपल्या विचाराचा देश पाहिजे होता. म्हणजे त्या देश्याच्या आडून अमेरिकेत लक्ष ठेवता येत होते.

1962मध्ये शीत युद्ध हे चरम वरती होती. आणि त्याच वेळेला रुस ने अमेरिकेच्या जवळ क्यूबा मध्ये परमाणू मिसाईल ठेवायला सुरवात केली.

पण ही रुस ची एकतरफा कारवाई न्हवती. अमेरिकेने सुद्धा ब्रिटन, तुर्की आणि इटली मध्ये 100पेक्ष्या जास्त परमाणू मिसाइल ठेवल्या होत्या.

आणि रुस ने सुद्धा क्यूबा मध्ये मिसाईल ठेऊन बदला घेतला होता.

ह्या मिसाईल जिथे ठेवल्या होत्या तेथून फ्लो्रीडा तट फक्त 150km दूर होता.

शीत युद्धा मध्ये क्यूबा मिसाईल संकट एक तणावपूर्ण घटना होती. आणि कोणत्याही क्षणात युद्धाची ठिणगी पडली असती.

14आक्टोबर ला अमेरिकेच्या एका जासूसी विमानाने क्यूबा मध्ये जाऊन 928 फोटो घेतले. त्या मध्ये रुसी परमाणू मिसाईल दिसल्या होत्या.

युद्ध टळले

अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ कॅनडी ने क्यूबा ची नौसैनिक नाकाबंदी सुरु केली होती. त्याच्या मागचा उद्देश होता रुसी मिसाइल जी क्यूबा मध्ये रुस आणत होते त्याला अडवणे.

28आक्टोबर ला अमेरिकी राष्ट्रपती ने सोवियत संघाला एक संदेश पाठवला आणि येणारे संकट टळले.

सोवियत संघांचे नेता निकिता खुर्चेव्ह यांनी क्यूबा मधून मिसाइल हटवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अमेरिकाकडे दोन शर्ते ठेवली एक तर अमेरिका क्यूबा वरती हल्ला करणार नाही आणि दुसरी म्हणजे तुर्की देश्यातील मिसाईल काढून घेणे.

Cuban Missile Crisis