चीन अमेरिकेत पसरवतोय कृषी दहशदवाद! भारताला सुद्धा या पासून धोका आहे का?

अमेरिकेत मंगळवारी मिशीगन च्या पूर्वी जिल्ह्यातील ऍटर्नी ऑफिसातील दोन चिनी नागरिकांच्या विरोधात आरोप लावले.या मध्ये सांगितले कि दोन चिनी नागरिक अमेरिकेत एक विशिष्ट प्रकारचे फंगस आणण्याच्या प्रयत्नात होते.

हे फंगस पिकांना ‘हेड ब्लाईट ‘म्हणजे एक विशिष्ट प्रकारची बिमारी चा प्रसार करू शकत होते.

विस्तृत

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी एका चिनी जोडफ्याला अटक केली.या दोघावर अमेरिकेमध्ये कृषी दहशदवाद फसरवण्याचा आरोप लावला आहे.अमेरिकी अधिकाऱ्यांनी या दोन चिनींना एक विशिष्ट प्रकारचे फंगस अमेरिकेत आणल्या मुळे अटक केली आहे.आणि आता कोर्टात त्यांच्यावर ‘जैविक हत्त्यार’ आणल्यामुळे केस चालणार आहे.

कृषी आतंकवाद अमेरिका

ही घटना झाल्यानंतर अमेरिकेत आणि संपूर्ण जगात काही प्रश्न उभे राहिले आहेत.म्हणजे हा कृषी आतंकवाद काय आहे?चिनी नागरिकांवर असे आरोप का लागले आहेत?हे जैविक हत्यार काय आहेत आणि या हत्यारामुळे संपूर्ण अमेरिका घुटण्यावर आली असती. आणि हा संपूर्ण जगासाठी किती खतरनाक आहे? चला तर या विषयी संपूर्ण विस्तृत माहिती बघूया.

चीन च्या त्या दोन नागरिकांवर कोणते आरोप लागले आहेत?

अमेरिकेत मंगळवारी मिशीगन च्या पूर्वी जिल्ह्यातील ऍटर्नी ऑफिसातील दोन चिनी नागरिकांच्या विरोधात आरोप लावले आणि ते निश्चित केले.या मध्ये सांगितले कि 33वर्षीय युनकिंग जियान्ग आणि 34वर्षीय जुनंयोंग लियु यांच्यावर तस्करी करणे,खोटे बयान देणे, धोकाधडी करणे,सारखे आरोप लावले आहेत.हे दोघे अमेरिकेत एक खास प्रकारचे फंगस आणण्याचा कट रचच होते.हे फंगस पिकावर ‘हेड ब्लाईट’ एक विशिष्ट प्रकारची बिमारी पसरवली असती.

तक्रारी मध्ये सांगितले कि ‘लियु’ आणि ‘जियान’ चीन मध्ये एक खास प्रकारच्या फंगस वरती काम करत होते.एवढंच नाही तर लियु च्या मोबाईल मध्ये एक लेख सुद्धा सापडला त्यामध्ये होते बदलत्या जलवायू परिस्तिथी मध्ये पैथोजन युद्ध.दोघांच्या मोबाईल मध्ये हे आढळून आले कि दोघांनी सुद्धा मिशीगन च्या लॅब मध्ये काही प्रयोग केले होते.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले त्या पैकी एक चिनी कम्युनिस्ट पार्टी चा सदस्य सुद्धा आहे.त्यांनी जे हे केले आहे ते अमेरिकेच्या सुरक्षा साठी खूप घातक आहे.फेडरलं तपास यंत्रणा (fbi)ने सांगितले आहे मागील वर्षी जुलै मध्ये तपास करताना लियु च्या बॅग मध्ये एक लाल रंगाची वनस्पती भेटली होती.तेव्हा लियु ने भरपूर वेळा आपले बयान बदललेहोते त्या मुळे वापस चीन ला पाठवण्यात आले होते.सुरवातीला या वनस्पती साठी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पण नंतर त्याने हे मान्य केल कि तो मिशीगन च्या लॅब मध्ये रिसर्च करण्यासाठी नेत आहे.

यामध्ये मिशीगन च्या लॅब ने सांगितले हे दोन आरोपी जे प्रयोग करत होते त्यासाठी चीन सरकार कडून मिशीगन लॅब ला कोणतीही फंडिंग भेटली नाही.मिशीगन युनिव्हर्सिटी ने सांगितले या सर्व मामल्यात युनिव्हर्सिटी तपास यंत्रनेची सर्व प्रकारे सहायत्ता करेल.युनिव्हर्सिटी ने या सर्व झालेल्या घटनेची निंदा सुद्धा केली.

या फंगस पासून पिकाला कश्या प्रकारे नुकसान होते?

या फंगस च एक वैशिष्ट्य आहे आहे हे फंगस एका पिका वरून दुसऱ्या पिकावर वर सुद्धा जाते, ज्या मुळे केवळ एका शेताचे नाही तर सर्वच अलग अलग शेतीचे सुद्धा नुकसान होऊ शकते.एका रिपोर्ट च्या अनुसार ‘फ्युसिरीयम ग्रामीरेनियम ‘हे 1990च्या दशकात पिकावर महामारी सारखे आले होते.आणि या महामारीला कीटक नाशकाने सुद्धा संपवता येणार नाही.

काय आहे कृषी आतंकवाद?

चायना फंगस

FBI च्या नुसार ज्या फंगस ला चिनी नागरिक घेऊन आले ते एवढे खरनाक आहे कि एक जैविक हात्त्यार म्हणून संपूर्ण शेती नष्ट करू शकते.सोप्या शब्दात सांगायचे तर कृषी आतंकवाद म्हणजे कृषी प्रणाली मध्ये मुध्दामहुन अशी काही बिमारी आणणे ज्याने संपूर्ण शेती नष्ट होते. ज्याने खाद्य पदार्थाची जी चैन आहे ती संपवणे जाने त्या देशातीला अर्थवेवस्था बिघडवून जाते.

Chinese Arrested For Smuggling Biological Pathogen Into US

या जैविक हत्यारा मुळे त्या देशाला सर्वात जास्त नुकसान होईल ज्याची अर्थवेवस्था शेती वर अवलंबुन आहे.या आतंकवादाला या मुळे खतरनाक मानले जाते कि जास्त प्रमाणात लोकांना माहित सुद्धा नसते या एका फंगस मुळे संपूर्ण देशाची शेती नष्ट होऊ शकते आणि संपूर्ण देश या मुळे अडचणीत येतो.

या फंगस मुळे माणसाला सुद्धा खतरा असतो कारण हे फंगस जर शरीरात गेले तर या पासून विष बाधा सुद्धा होऊ शकते.या फंगस मुळे माणसाला उलट्या होणे आणि नंतर लिव्हर सुद्धा खराब करू शकते.या मुळे माणसाची आणि जनावरांची प्रजन क्षमता कमी करू शकते.

भारताला सुद्धा अलर्ट राहावे लागणार

या सर्व घटने नंतर सोशियल मीडिया मधून सुद्धा म्हटले जाते भारताला अलर्ट राहावे लागणार आहे.नेटकऱ्यांचे म्हणणे आहे जर अमेरिके सारख्या देश्यात चीन हे सर्व करू शकतो तर भारतात सुद्धा असे काही करण्याच्या प्रयत्नात चीन राहील. त्यामुळे भारत देशाला सुद्धा या पासून सावधान राहावे लागेल. कारण चीन संपूर्ण जगासाठीच घातक ठरणार आहे.

इराण इराक युद्ध ज्यामुळे दहा लाखा पेक्ष्या जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. इराण इराक युद्धाची संपूर्ण कहाणी

1980 ते 1988 पर्यंत चालणारे इराक इराण युद्ध, इराक इराण हे शेजारी देश आहेत. आणि या काळात यांच्यात एक संघर्ष चालू होता. हे युद्ध इतिहासिक प्रश्न, जातीवाद, तणाव आणि राजकीय समस्या या सर्वामुळे झाले होते. 1979मध्ये इराण मध्ये क्रांती झाली होती. त्यानंतर आयातुल्ला खुमेनी यांच्या नेतृत्वात इराण मध्ये खुमेनी सरकार ची स्थापना झाली. जेव्हा इराण मध्ये क्रांती झाली तेव्हा पासूनच सद्दाम हुसेन ला सुद्धा भीती वाटत होती. ही क्रांती आपल्या देशात होऊ शकते आणि त्याच वेळेला इराण हा आर्थिक दृष्ट्या कमजोर होता सद्दाम हुसेन ला याच वेळेचा फायदा घ्यावा वाटला.

हा संघर्ष मुख्य तीन चरणामध्ये होता. ज्याची सुरुवात इराणी भागात जे इराकि होते त्यांच्याकडून झाली. त्यानंतर इराणकडून जवाबी हमले झाले. त्यानंतर इराक कडून सुद्धा रासायनिक हत्याराचा उपयोग करण्यात आला.
दोन्ही देशाचे भरपूर नुकसान झाले अनुमान आहे की दहा लाखापर्यंत सैनिक मारल्या गेले यामध्ये भरपूर नागरिक सुद्धा मारले गेले.
1988 च्या शेवटी संयुक्त राष्ट्राच्या मध्यस्थीने युद्धविराम झाला पण या युद्धाने इराक इरांन मध्ये एवढा बदल झाला की नंतर या देशाची सत्तावादी सरकार आणखीन मजबूत झाले.

इराण इराक युद्धचे दुर्गामी परिणाम होते. ज्याने फारस खाडीच्या भुराजनीतिक परिदृश्याला आकार दिला. आणि युद्ध समाप्तीनंतर सुद्धा रजनीतिक संघर्ष चालूच होता. हा संघर्ष चालूच होता. हा संघर्ष म्हणजे खूप भयावह होता. आणि या मध्ये सैन्य, आणि नागरिक मोठ्या प्रमाणात मारल्या गेले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समंध्दामध्ये एक जटीलता आहे. याची आठवण करून दिली.

इराक इराण संघर्षाची सुरवात

इराण इराक युद्ध म्हणजे 20व्या शतकातील सर्वात लांब युद्ध होते. दुसऱ्या महायुद्धा नंतर सर्वात घातक युद्ध मानले जाते. ज्या मध्ये दहा लाखापेक्षा जास्त लोकांचे प्राण गेले. रासायनिक शस्त्रचा उपयोग झाला. फारस खाडीमध्ये अस्थिरता उत्पन्न झाली. ज्यामुळे 21व्या शतकात या भागात अशांती चे वातावरण झाले.

घटना आणि सारांश

इराक आणि इराण मधील जी सीमा आहे ती दोन्ही देशाला आणि दोन्ही संस्कृतीला अलग करते. यामध्ये इराकी लोक अरबी आहेत तर इराणी लोक फारसी आहेत. ज्यामुळे दोघांतील संघर्ष हा पूर्वी पासूनच आहे. 1970च्या दशकात या संघर्षाला सुरवात झाली. 1979पर्यंत सद्दाम हुसेन ने इराक मध्ये पूर्ण रजनीतिक सत्ता आपल्या ताब्यात घेतली. फेब्रुवारी 1979मध्ये इराण मध्ये क्रांती झाली आणि ‘मोहमद रजा शहा पहलवी ‘ला सत्तेमधून काढून टाकले. आणि आयातुल्ला खुमेनी इराण च्या सत्तेचा सर्वेसर्वा झाला. खोमेनीने इराण देशाचे नाव बदलून ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ‘केले. म्हणजे इराण या देशाला ‘इस्लामिक ‘ देश म्हणून घोषित करण्यात आले.

1979मध्ये इराण च्या काही विद्यार्थ्यांनी ‘तेहरान ‘ मधील ‘अमेरिकी धुतवासा ‘वरती धावा बोलला. त्यांची मागणी होती कि ‘मोहम्मद रजा शाह’ ला अमेरिकेमधून इराण मध्ये पाठवावे. त्यांनी 444दिवस 52अमेरिकी लोकांना बंदी बनून ठेवले होते. या वेळेला इराण मध्ये खूप राजकीय उथल पुथलं चालू होती. आणि याचा फायदा सद्दाम हुसेन ने घेतला. 22सप्टेंबर 1980मध्ये इराण वरती इराक ने हमला केला.

सद्दाम हुसेन ने इराण वरती जो हमला केला त्याच्या मागे कारणे सुद्धा होती. सर्वात महत्वाचे म्हणजे सिया सुन्नी विवाद आणि राजकीय स्वार्थ होता. आणि असे बोलले जाते कि सद्दाम हुसेन ला इराक हे धर्म -निरिपेक्ष राष्ट्र बनवायचे होते. पण इराण मध्ये जी इस्लामिक क्रांती झाली. त्यामुळे सद्दाम हुसेन ला भीती होती कि भविष्यात हीच क्रांती इराक मध्ये येईल.

हुसेन ने इराणी अधिकाऱ्यांच्या मध्य पूर्वेत क्रांती भडकावयाच्या भाषणाने ‘फारस खाडी ‘ क्षेत्रात याचा प्रभाव होईल याची भीती वेक्त केली होती. यामध्ये इराणी लोकांनी इराक मध्ये जे सिया लोक होते यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. आणि सद्दाम हुसेन विरोधात सुद्धा क्रांती व्हावी असे खोमेनी यांना वाटत होते.

इराण मध्ये जी क्रांती होत होती त्यांनी क्षत्रिय प्रभाव कमी केला होता. खोमेनी ने आपले नेतृत्व आणखीन मजबूत व्हावे यासाठी कट्टरपंथीणा खतपाणी घातले.

इराण मध्ये भरपूर राजकीय दल असे होते की त्यांना सुद्धा सत्तेवर यायचे होते. त्या व्यतिरिक्त इराणमध्ये खोमेनी सरकारने भरपूर अधिकाऱ्यांना मारले जे या सत्तेच्या विरोधात होते.
या वेळेला इराण मध्ये भरपूर प्रमाणात राजकीय आणि सामाजिक उथल पुथलं चालू होती.
आणि सद्दाम हुसेन ने याचा फायदा घ्यायचा ठरवलं होतं.

हुसेन आणि खोमेनी हे एकमेकांना विरोध करत होते. इराण मध्ये जेव्हा ‘शहा सरकार’ होते तेव्हा १९६२ मध्ये खोमिनी इराण सोडून इराक मध्ये गेले होते. पण 1977 मध्ये सद्दाम हुसेन यांनी खोमेनीला इराक मधून हाकलून दिले होते. त्यानंतर खोमेनी फ्रान्स मध्ये गेले. तेथून ते सद्दाम हुसेन विरोधात काम करत होते. त्यांनी सद्दाम हुसेन वरती आरोप लावले की इराक मध्ये सद्दाम सिया विरोधी काम करतो. खोमणे जेव्हा इराण मध्ये आले तेव्हा हुसेन विरोधात आणखीन जास्त काम करत होते. इराण सोबत इराक चा सीमा विवाद होता आणि इराकला हेच कारण भेटले होते इराण वरती हमला करण्याचे.

युद्ध

हे युद्ध तीन चारणात झाले होते. सुरवातीला इराण इराक सीमेच्या उत्तर आणि मध्य भागात इराकी सेना ने हमला केला. इराणी सेना खूप कमजोर असल्या कारणाने इराक ने इराण च्या काही भागावर नियंत्रण मिळवले. मुख्य हमला फारस च्या खाडीतच्या त्या भागावर झाला जिथे इराक इराण सीमा विवाद होता.

इराकी सेना ‘खुजेस्तान ‘भागात जवळपास 80km इराण च्या आत मध्ये गेली होती. पण इथून पूढे इराण चे सैनिक इराक ला जड जात होते आणि स्थानिक इराणी लोकांनी सुद्धा इराकी सैनिकाला अडवून धरले होते. त्यामुळे सद्दाम हुसेन खूप निराश झाला होता. सद्दाम हुसेन ला वाटले होते. या भागात जे अरब आहेत ते इराक च्या बाजूने येतील पण असे काही झाले नाही. त्यामुळे इराण च्या विरोधात जी सद्दाम हुसेन ने रानणिती आखली होती ती इथपर्यंत पूर्ण पणे विफल ठरली होती.

इराणी नेत्यांनी लवकरच तीन सैन्य बलाचे संघटन केले होते.नऊ ते पन्नास वर्षाचे स्वयंसेवक ज्यांना ‘पासदारण ‘ म्हणतं होते. इराणी क्रांती मध्ये ज्यांचा महत्वपूर्ण हात होता. त्यांनी सुद्धा या युद्धात भाग घेतला होता.

पण त्यांच्याकडे सैन्याचे प्रशिक्षण आणि लढण्यासाठी शस्त्रे न्हवती. इराण मध्ये काही सैनिक असे होते जे सरकार ने त्यांना जेल मध्ये टाकले होते. त्यांना सुद्धा सोडण्यात आले. ज्यामध्ये मोठं मोठे अधिकारी आणि पायलट सुद्धा होते. 1981मध्ये इराणी सेना एवढी बळकट झाली होती कि इराक च्या हल्ल्याला प्रतिउत्तर नक्कीच देऊ शकत होती.

या युद्धात इराण चे जे ‘पासदारण ‘ स्वयंसेवक होते. ते इराकी सैन्यावर तुडून पडत आणि या स्वयंसेवाकाकडे शस्त्रे नसल्या कारणाने त्यांना इराकी सेना सहज हरवत असत. या मुळे हजारो च्या संख्येने इराणी मरत असत.

युद्धाचे दुसरे चरण 1982च्या माध्यत सुरु झाले जेव्हा इराण ने एक सफल आक्रमण केले. ज्यामध्ये इराक च्या ताब्यात जे महत्वपूर्ण इराणी शहर होती. त्या शहरांना इराण ने वापस आपल्या ताब्यात घेतले.त्यामुळे इराक चे मनोबल आणखीन जास्त पडले.

Iranian Revolution

saddam husean

जून जैले 1982 मध्ये इराक ने आपले सैन्य वापस न्यायला सुरवात केली. आणि युद्ध समाप्त करण्याची विनंती संयुक्त राष्ट्र संघाकडे केली. पण इराण ने युद्ध चालूच ठेवले. त्यानंतर इराण ने इराक वरती एक जोरदार हमला केला. आणि ‘मानव तरंग ‘ हमल्याचा सुद्धा वापर केला. 1983पर्यंत कोणताही देश निर्णायक युद्ध जिंकला नाही.

यामध्ये इराक हा इराण समोर खूप कमजोर दिसत होता आणि इराण हे युद्ध जिंकेल असे वाटत होते.

तिसऱ्या चरणातील युद्ध 1984पर्यंत चालू झाले. जेव्हा सद्दाम हुसेन ने एक नवीन रानणिती आखली होती. इराण इराक च्या क्षेत्रवार जो कब्जा करणार होता. तिथे सद्दाम ने इराण ला आडवले आणि इराण विरोधात आता नवीन हात्त्यार वापरणार होता. या नंतर इराण च्या मानव तरंगाणा थांबवण्यासाठी इराक ने रासायनिक शस्त्रचा वापर केला. फारस खाडीतील शपिंग वर हमला केला. (ज्याला ट्रॅन्क युद्ध असे म्हटले जाते. )

irak iran war

त्यानंतर इराक ने मिसाईल आणि तोफांनी इराणी शहरावर हमला केला. (शहरातील युद्ध ) इराक ने 1884मध्ये रासायनिक हत्यारांचा वापर केला. रासायनिक हत्याराचा वापर केल्या मुळे 1986मध्ये ‘संयुक्त राष्ट्र संघाने’ निंदा वेक्त केली होती. 1987पर्यंत इराक ने रासायनिक शास्त्राचा वापर ‘रक्षत्मक ‘पद्धतीने न करता ‘आक्रमक’ पद्धतीने केला.

मार्च 1988पर्यंत इराक ने इराक च्या पूर्वत्तर भागात जवळपास तीस रासायनिक हमले केले. इराक च्या पुर्वोत्तर भागात ‘कुर्द ‘जमातीचे लोक राहतात आणि हे कुर्द लोक इराण चे समर्थन करत होते. या मध्ये ‘हलबजा ‘ नावाच्या शहरात पाच हजार नागरिक मारले गेले होते. जागतिक पातळीवर या हमल्याची खूप निंदा करण्यात आली होती.

मार्च 1984 मध्ये टॅंक युद्ध खूप जास्त प्रमाणात भडकले होते. इराक ने इराण च्या तेल टॅंक वरती हमले केले. इराक ने इराण चे तेल राजस्व कमी करण्याचा प्रयत्न केला होता. हुसेन ला वाटत होते तेल टॅंक वरती जर हमले केले तर पश्चिमी राष्ट्र युद्ध बंद करण्यासाठी मध्यस्ती करतील. इराण ने इराक च्या जाहजावर हमले करून या हमल्याला प्रतिउत्तर दिले. हे हमले इराण ने त्या जाहजा वरती केले जे जाहज कुवेत आणि सौदी मधून येत होते. इराण ने सौदी आणि कुवेत वरती आरोप केला होता कि इराक ला हे देश मदत करत आहेत आणि इराक ला शस्त्रे पुरवत आहेत.

या तेल हमल्यामुळे इराक चे 70%आणि इराण चे 50%तेलाचे नुकसान झाले होते. आणि यामुळे फारस खाडी मध्ये 25%शिपिंग कमी झाली होती. हे टॅंक युद्ध 1987पर्यंत चालू होते. जेव्हा एका इराकी मिसाईल ने ‘यु एस एस स्टार्क ‘वरती हमला केला. ज्यामध्ये 37चालक मारल्या गेले होते. त्यानंतर इराण ने हे युद्ध भडकवले असा आरोप अमेरिकेने केला होता. आणि इराण च्या विरोधात एक संघटन बनवण्याची धमकी दिली होती. पण अरब राष्ट्रा मध्ये संशय होता. अमेरिकी राष्ट्रपती ‘रोनाल्ड रीगन ‘ यांनी इराण ला अव्यध्य शस्त्रे पुरवली होती. 1988पर्यन्त 18राष्ट्रीय नोसेना चे जहाज फारस खाडी मध्ये गस्त घालत होते. 400पेक्ष्या जास्त नविक मारले गेले होते.

शेकडो जाहजावर हमले केले होते. जामध्ये 80पेक्ष्या जास्त लोक मारल्या गेले होते. यामध्ये जाहजाच्या मालकाचे लाखो डॉलर्स चे नुकसान झाले होते.

इराक इराण युद्ध 1988मध्ये समाप्त झाले होते. जेव्हा इराण ने आपल्या प्रमुख शहरावर इराक ने रासायनिक हमले केले होते. तेव्हा इराण ने ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ‘ चा प्रस्ताव 598ला स्वीकार केले आणि सर्वात लांब चाललेले युद्ध समाप्त करण्याची विनंती केली.

Persian Gulf War:आखाती (खाडी )युद्ध ज्यामुळे अमेरिकेला मध्यपूर्वेत आपले पाय रोवता आले

Persian Gulf War:आखाती (खाडी )युद्ध ज्यामुळे अमेरिकेला मध्यपूर्वेत आपले पाय रोवता आले

आखाती युद्ध (खाडी युद्ध ) एक जागतिक संघर्ष होता. 1990 मध्ये सद्दाम हुसेन ने आपला शेजारी देश कुवेत वर आक्रमण केले होते. तेव्हा संयुक्त राष्ट्राने याचे खंडन केले होते. जेव्हा इराक ची सेना कुवेत मध्ये होती तेव्हा अमेरिका आणि 34 अन्य देशांची भागीदारी झाली होती.जागतिक युद्ध आणि शीत युद्धाच्या समाप्तीनंतर हे जगातील सर्वात मोठे सैन्य अभियान होते त्यामुळे विश्वयुद्धाची सुद्धा भीती होती.

काय होते आखाती युद्ध?

आखाती युद्धात इराक च्या विरुद्ध 35 राष्ट्रांनी अमेरिकेच्या नेतृत्वात सैन्य हमला केला होता. हा हमला म्हणजे कुवेत विरुद्ध जे इराक ने केले होते त्याचा बदला होता.

इराक इराण युद्धानंतर इराक हा कर्जात बुडाला होता आणि कुवेतचे इराक वरती 14 बिलियन डॉलर एवढे कर्ज होते. इराक हा कुवेतला इराक चा भाग समजत होता. पण यामध्ये एवढे तथ्य नव्हते. इराकी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांनी कुवेतला आपले कर्ज माफ करा म्हणून सांगितले. सद्दाम हुसेन यांनी सांगितले होते इराण हा विस्तारवादी देश आहे आणि तो संपूर्ण अरब वरती आपला विस्तार करू पाहत होता. पण इराकने त्याला थांबवले. म्हणजे इराकने संपूर्ण अरब राष्ट्राचे रक्षण केले. त्यामुळे इराक वर जे कर्ज आहे ते माफ व्हावे.

पण सद्दाम हुसेन यांच्या बोलण्याकडे संपूर्ण खाडी देशानि दुर्लक्ष केले. म्हणजे अप्रत्यक्षरीत्या ते कोणत्याही प्रकारचे कर्ज माफ करणार नव्हते. पण सैन्यामध्ये कमजोर असलेला शेजारी देश कुवेतला सद्दाम हुसेन ने धमकी द्यायला सुरुवात केली. बारबाह आणि बुबियान द्विपावरती कबजा करण्याची आणि यासाठी युद्धाची सुद्धा धमकी दिली.


हे द्वीप इराक साठी खूप महत्त्वाचे होते कारण की खावर अब्दुल्लाह वरती स्थित त्याच्या बंदरगाला सुरक्षा मिळाली असती.
फारस खाडीपर्यंत जाणारा जलमार्ग जो इराक इरान युद्धात बंद होता आणि त्यांच्यासाठी हा एक मात्र जलमार्ग होता .इराक आणि कुवेत मध्ये जो संघर्ष होता. तो बुबियान आणि बारबाह द्विपा वरूनच होता.

1961 मध्ये जेव्हा युनायटेड किंगडम ने कुवेत वरून आपले संरक्षण समाप्त केले. तेव्हा इराकी पंतप्रधान जनरल ‘अब्द अल करीम ‘ नि एक दावा केला होता.

की कुवेत इराक चा अभिन्न भाग आहे. कारण ‘अल बसरा’ च्या पूर्वी तो ऑटोमन साम्राज्याचा भाग होता.
त्या वेळेला इराकने कुवेत वरती कब्जा करण्याची धमकी दिली होती. पण कुवेत मध्ये ब्रिटिश फौज असल्या कारणाने इराकला माघार घ्यावी लागली होती.


पण त्यानंतर इराकच्या सत्तेवर जे आले त्यांनी कुवेतला मान्यता दिली आणि ह्या संघर्षावर पूर्णविराम दिला.
पण नंतर इराक वर पाच पक्षाची सत्ता आली तेव्हा दोन्ही देशात सीमा विवाद पुन्हा नव्याने चालू झाला.

इराक इराण युद्ध झाले तेव्हा इराक वरती आर्थिक संकट कोसळले होते जुलै महिन्यात सद्दाम हुसेनने कुवेत आणि संयुक्त अरब अमिरात वर पेट्रोलियम निर्यातक उत्पादक (ऑपेक )कोटा तोडल्याचा आणि कच्च्या तेलाचा जास्त उत्पादन केल्याचा आरोप लावला.

आणि यामुळे तेलाच्या किमती कमी झाल्या त्यामुळे इराक वरती आर्थिक संकट आले. इराक ने कुवेत वरती आणखी एक आरोप लावला की कुवेत इराक सीमा भागा वरती लागून असलेल्या रुमालयातील क्षेत्रातून तेल चोरत आहे. आणि सद्दा हुसेन ने ही सुद्धा मागणी केली की कुवेत बुबियान आणि बारबाह द्विपाचे नियंत्रण इराकला द्याव.

इराक अमेरिका संघर्ष

त्याच वेळेला संयुक्त राज्य अमेरिका आणि इराक चे संबंध बिघडत चालले होते.
इराकने संयुक्त राज्य अमेरिका आणि इजराइल वरती आरोप लावले. कुवेतला तेलाची किंमत कमी करण्यासाठी या दोन्ही देशांनी प्रोत्साहित केले. कारण इराक यामुळे कमजोर होईल.

जेव्हा जुलै 1990 मध्ये इराकने कुवेतला धमकवायला सुरुवात केली. त्यामुळे अमेरिकेने आखातीमध्ये युद्ध अभ्यास सुरू केला. त्या त्या मागचा उद्देश होता की इराकने कुवेत आणि संयुक्त अमीरात वरती सैन्य हल्ला करू नये. अमेरिकी राष्ट्रपती जॉर्ज एच डब्ल्यू बुश ने इराक सोबत आर्थिक आणि राजनीतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

12 एप्रिल 1990 ला सिनेटर ‘रॉबर्ट डोल’ च्या नेतृत्वात अमेरिकी सिनेटरचा एक प्रतिनिधी मंडळ हुसेनला भेटण्यासाठी पाठवले.
सिनेटर डोल व्हाईट हाऊस मधून एक संदेश घेऊन आले होते. त्यामध्ये होते अमेरिका इराक सोबत आपले संबंध चांगले करू इच्छितो आहे.

इराक कुवेत संघर्ष

IRAK WAR

2 ऑगस्ट 1990 मध्ये एक लाख सैन्य घेऊन इराकने कुवेत वरती हमला केला. आणि काही तासाच्या आत इराक ने कुवेत वर कब्जा केला.
कुवेत वर हमला केल्याच्या कारणाने इराक वर ‘संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने’ प्रतिबंध लावले.


अमेरिका आणि गटबंधन देशांनी इराक वरती हमला केला हा हमला हवा आणि जमिनीवरून होता.
16 जानेवारी 1991 ला युद्धाची सुरुवात झाली आणि 28 फेब्रुवारी 1991 ला इराक हरला आणि कुवेत मधून सद्दाम हुसेन ला माघार घ्यावी लागली. या सोबतच इराक हे युद्ध हरला.

IRAK AMERIKA WAR

खरं तर अमेरिकेला इराक च्या धमकी विषयी माहिती होते. पण इराक सैन्य कारवाई करेल याची थोडीशी सुद्धा कल्पना नव्हती. इराक रिपब्लिकन गार्ड कुवेत शहराकडे गेली आणि इराकी विशेष बलांनी वारबा आणि बुबयान द्विपा वरती कब्जा केला. इराकि आक्रमन जेव्हा झाले तेव्हा कुवेत चा प्रतिरोध फक्त काही प्रमाणात होता. पण इराकी सैनिकांनी कुवेत वरती सहज कब्जा केला.

MIDDLE EAST WAR

Persian Gulf War:आखाती (खाडी )युद्ध ज्यामुळे अमेरिकेला मध्यपूर्वेत आपले पाय रोवता आले

इराकी आक्रमण झाल्यानंतर कुवैती शाही परिवार सौदी अरबाला पळून गेला. तिथून त्यांनी आंतरराष्ट्रीय समर्थनाची अपील केली. 28ऑगस्ट ला इराक ने घोषणा केली कि कु्वैत इराक चा 29 वा प्रांत आहे.

इराक ने कुवेत वरती आक्रमण केल्यानंतर सर्व देशांनी इराक ची निंदा केली होती. त्यानंतर काही दिवसांनी अमेरिकेने आंतरराष्ट्रीय गटबंधन करण्यासाठी नेतृत्व केले.
या गटबंधन ने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद च्या माध्यमातून इराकने लवकरात लवकर कोणतीही शर्त न लावता कुवेत मधून वापस जावे ही मागणी केली.
आणि हा प्रस्ताव 660 मध्ये पारित झाला. प्रस्ताव 661 मध्ये इराक वरती आर्थिक प्रतिबंध लावले. आणि प्रस्ताव 663 मधून कुवेत चे इराक मध्ये केलेले विलय अमान्य करण्यात आले.

अमेरिका आणि सौदी अरब यांनी प्रायद्विपच्या रक्षणाकरिता अमेरिकी सैन्य सौदी अरब मध्ये तैनात करण्यात आले.
त्यासोबत अमेरिका आणि गटबंधन ने इराक वरती दबाव टाकला की कुवेत मधून इराकने बाहेर पडावे.
पण इराक मे याकडे दुर्लक्ष केले. आणि संपूर्ण कुवेत मध्ये लूटपाट करायला सुरुवात केली.
30 ऑक्टोबर पर्यंत बूश सरकारने हा निर्णय घेतला होता. इराक जर कुवेत मधून बाहेर निघत नसेल तर अमेरिका सैन्य शक्तीचा उपयोग करून इराक ला कुवेत मधून हाकलून देईल.

अमेरिकेने सैन्यशक्ती वाढवली आणि इराक वरती हल्ला करण्यासाठी सज्ज झाले.
इराकला कुवेत मधून वापस जाण्यासाठी 45 दिवसाचा अवधी दिला होता. पण या वेळेत सुद्धा इराक कुवेत मधून बाहेर पडला नाही.
त्यामुळे अमेरिकेने इराक वरती हवाई हमले करायला सुरुवात केली होती.

24 तासात अमेरिका आणि गटबंधन सैनिकांनी इराक च्या हवाई क्षेत्रात ताबा मिळवला आणि इराक च्या प्रत्येक महत्त्वाच्या जागी हवाई हामले करून उध्वस्त केले.

Persian Gulf War

याला उत्तर म्हणून सद्दाम हुसेन ने इजराइल विरोधात आणि सौदी अरब मधील जे गटबंधन सैनिक होते त्यांच्या वरती मिसाईल हमले केले.
पण इजराइल ने या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. 34 देशाच्या गटबंधन सैनिकांनी मिळून कुवेत देशाला इराक पासून स्वातंत्र्य केले . इथून पुढे इराकी सैन्य वापस जायला लागले.
दोन मार्चला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद प्रस्ताव 686 पारित केला. यामध्ये युद्धविरांमासाठी काही शर्ते लागू केले आणि इराकला मान्य करण्यासाठी बाद्य करण्यात आले. ज्यामध्ये इराक ने प्रतिबंध आणि युद्धातील खर्च देण्यात यावा हे होते.


संयुक्त राज्य अमेरिका ने संयुक्त राष्ट्राच्या माध्यमातून इराक वरती दबाव टाकायला सुरुवात केली.
यामध्ये सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव 687 ला पारित केले. ज्यामध्ये इराक ची रासायनिक आणि जैविक हथियार क्षमतांची निरीक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विशेष आयोग (युएनएससीओएम ) ची स्थापना करण्यात आली.
युद्धानंतर दक्षिण इराक मध्ये शिया विद्रोह आणि कुर्द विद्रोह होत होते. पण नंतर ते विद्रोह दाबण्यात आले.

SADDAM HUSSAIN

Persian Gulf War

Afagan war :अमेरिकेने अफगाणिस्तान मध्ये तालीबान ला घडवले?

अफगाणिस्तान मधील स्थानिक लोकांनी भरपूर वर्ष अमेरिकेचे समर्थन घेऊन सोवियत संघ विरोधात अभियान चालवले होते. अमेरिकेने सुद्धा त्यांना हत्यार आणि पैसे पुरविले होते. अमेरिकेचा यामागचा उद्देश होता की सोवियत रूस ने अफगाणिस्तान सोडून जावे.

Afagan war

clod war

अमेरिकेचा सुद्धा सोवियत संघ विरोधात एक मनसुबा होता. ते म्हणजे अमेरिकेसोबत जे व्हिएतनामध्ये झाले आणि अमेरिका व्हिएतनाम मध्ये हरली तीच गत अफगाणिस्तान मध्ये सोवियत रुस ची व्हावी. यासाठी अमेरिका खूप प्रयत्न करत होती. यासाठी अमेरिकेने ‘ऑपरेशन सायक्लोन’ सुद्धा सुरू केले. आणि अमेरिकन मीडियाने या ऑपरेशनला जगातील सर्वात गुप्त ऑपरेशन म्हणून सांगितले होते.

https://shorturl.bz/sTc

सोवियत संघाचे सैनिक जेव्हा वापस जात होते तेव्हा आठ वर्षाच्या अंतराने 1996 ला तालिबान ने काबुल वरती कब्जा केला. आणि अफगाणिस्तान वर एक ‘इस्लामी कट्टरपंथी निजाम’ आणला. नंतर संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली. कारण तालिबानने मानवधिकाराची उल्लंघन केले होते. त्यामुळे संपूर्ण जगात तालिबानची आलोचना होत होती.

त्यानंतर एक प्रश्न असा सुद्धा येतो की यामध्ये अमेरिकेचा हात होता का?

याची सुरुवात कशी झाली

वर्ष होते 1979 तात्कालीन सोवियत संघाचे 30000 पेक्षा जास्त सैनिक, लढाकू विमान ,आणि टॅंक हे अफगाणिस्तानच्या दिशेने रवाना झाले. ते काबुल मधील ‘क्रांतिकारी सरकारला’ मदत करण्यासाठी येत होते.

हे सर्व होण्याच्या पहिले एका वर्षाआधी अफगाणिस्तान मध्ये ‘सौर क्रांती’ झाली होती. त्यानंतर अफगाणिस्तान मध्ये साम्यवादी सरकार चे गठन झाले होते. पण त्या साम्यवादी सरकारला काही इस्लामी गटांचा विरोध होत होता. हे गट स्वतःला मुजाहिद्दीन समजत होते. त्यांना वाटत होते की जे विरोध करत आहे तो एक जिहाद आहे.

सोवियत संघाला वाटत होते अफगाणिस्तान मध्ये साम्यवादी सरकार टिकून राहावे पण राष्ट्रपती बबरक करमाल यांच्या सरकारच्या विरोधात मुज्जाहिद्दीनाची बगावत जास्त वाढत होती.

Bangladesh Crisis 2024:शेख हसीनाच्या पतनाचा आनंद साजरा करेल बांगलादेश, देश सोडला त्या दिवशी राष्ट्रीय सुट्टी

अफगाणिस्तान मध्ये साम्यवादी सरकार होते त्यामुळे अमेरिका खूपच गोंधळलेल्या अवस्थेत होता खरंतर अमेरिका पन्नासच्या दशकापासून अफगाणिस्तान मध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता. 50 च्या दशकात सोवियत अफगाणिस्तान मध्ये विकास परियोजना करत होता तेव्हा सुद्धा अमेरिका सोवियत संघा सोबत प्रतिस्पर्धा करत होता.

civil war

या वेळेला तत्कालीन राष्ट्रपती ‘जिम्मी कार्टर’ ला त्यांचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर जबीगंन्यू ब्रेजेंसकी आणि बाकी सहकाऱ्यांनी त्यांना अफगाणिस्तान मध्ये गुप्ता अभियान सुरू करण्याचा सल्ला दिला. आणि नंतर अमेरिकेने बगावत करणाऱ्या मुजाहिदिनांना हत्यार आणि पैसा पाठवण्यासाठी प्रस्ताव ठेवला.

त्यानंतर शीत युद्धामध्ये आणखीन जास्त अमेरिकेने तेल ओतले आणि एका नव्या अध्यायाला सुरुवात झाली . यामध्ये अमेरिका आणि रशिया आपला दबदबा संपूर्ण जगात व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. दोघेही एकमेकांचे विरोधात प्रतिस्पर्धी होते पण हे दोन्ही देश आमने-सामने येऊन लढत नव्हते.

पण तिसऱ्या जगातील देशांमध्ये जी लढाई चालत होती त्यामध्ये ते आपल्या साथीदार देशाला मदत देत होते इंग्रजी भाषेत त्याला ‘प्रॉक्सिवार’ असे म्हणतात. अशाच प्रकारे अमेरिका अफगाणिस्तान मध्ये जिहाद्याना मदत पुरवत होता जे जिहादी सोवियत विरुद्ध लढत होते.

ऑपरेशन सायक्लोन

सुरुवातीला ऑपरेशन साइक्लॉन मध्ये विद्रोहींना सोवियत काळातील जुने हत्यार देण्यात आले. जसे की AK 47 आणि आरब देशातून त्यांना पैसे पुरविले जात. अमेरिकेने हे यासाठी केले की अमेरिका आपला सहभाग आहे हे दाखवत नव्हता. यामध्ये सौदी अरब देश सर्वात सक्रिय देश होता. यामध्ये मिश्र देशाचा अन्वर अल सदात आणि बाकी भरपूर नेत्यांनी सोवियत विरुद्ध मदत पाठवली होती.

यामध्ये पाकिस्तानची गुप्त यंत्रणा सुद्धा असायला पाहिजे असे अमेरिकेला वाटत होते.आणि इथूनच जीहादी गटांना ऑपरेट केले जात होते अमेरिका काँग्रेसचे सदस्य राहिलेले ‘हब आर रिज ‘ने 1988साली त्यांनी सांगितले कि त्यांनी ‘टेनिसी ‘ च्या केंटूकी मिलिटरी बेस वरती 700खचर पाठीवले होते. या खचरांना पाकिस्तान मध्ये पाठवायचे होते.

वाईट हाऊस मध्ये राष्ट्रपती रोनाल्ड रिगन आल्यानंतर अफगाणिस्तान मध्ये अमेरिकेचा हात आहे हे संपूर्ण जगाला समजले.

अमेरिकेमध्ये काही श्रीमंत लोकांनी मुजाहीद्दीनांना मदत करण्यासाठी सरकारकडे मागणी करत होते. या लोकांचे म्हणणे होते अफगाणिस्तान मध्ये केवळ शस्त्री पाठवून काम होणार नाही तर त्यापेक्षा मोठे पाऊल उचलले पाहिजे म्हणजे अमेरिकन आर्मीला अफगाणिस्तान मध्ये पाठवावे

1984 मध्ये अमेरिकी काँग्रेसने अफगाणिस्तान वरती एक प्रस्ताव पारित केला प्रस्तावामध्ये होते अफगाणिस्तान मधील मुजाहिद्दीन (अमेरिकेने यांना शिपाई म्हटले होते )त्यांना फक्त लढण्यासाठी शस्त्र आणि काही मदत पाठवणे पुरेसं होणार नाही तर यापेक्षा जास्त काही करावे लागेल.

रोनाल्ड रीगन यामध्ये इतके पुढे गेले की त्यांनी ओव्हल ऑफिसमध्ये मुजाहिद्दीन नेत्यांच्या प्रति मंत्रिमंडळासोबत मेजवानी सुद्धा केली.

1986 मध्ये स्टेट ऑफ द युनियनच्या भाषणात रीगन यांनी अफगान मुजाहिद्दीन यांना संदेश दिला ‘स्वातंत्र्याच्या शिपायांनो तुम्ही एकटे नाहीत अमेरिका तुमच्या सोबत आहे.’

त्यानंतर रिगन यांनी अफगाणिस्तान मध्ये असे काही केले की त्यांच्या बयाना पेक्षाही महत्त्वपूर्ण होते . त्यांनी अफगान मुजाहिदिनांना ‘स्टिंगर मिसाईल’ देण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय येणाऱ्या काळात खूप महत्त्वाचा ठरणार होता.

अमेरिकेच्या या मदतीमुळे अफगाणिस्तानी डोंगरदऱ्यामध्ये लपून बसत आणि सोवियत हेलिकॉप्टरना खाली पाडत असत त्यामुळे अफगाणिस्तान मधील समीकरण खूप जास्त प्रमाणात बदलत होते.

अफगाणिस्तान मध्ये फौज पाठवण्याच्या नऊ वर्षानंतर सप्टेंबर 1988 मध्ये सुवियत संघाचे नेता मिखाइल गोरबाचेव यांनी रशियन सेना वापस घेण्याचा निर्णय घेतला.

तालिबानला अमेरिकेच्या मदतीचा फायदा झाला?

अमेरिकेने तालिबान मोहिमेला समर्थन केले होते कारण अमेरिकेला त्याचा फायदा घ्यायचा होता पण काही थेरी च्या अनुसार ही वास्तविकता नाही.

1994 पर्यंत अफगाणिस्तानच्या दक्षिण शहर कंधार मध्ये तालिबान हे नाव सुद्धा लोकांनी ऐकले नव्हते ज्यांना तालिबान विषयी माहीत होते ते मदरशांमध्ये ट्रेन झालेले होते. हे पश्चतून समाजाचे लोक होते. ते स्वतःला तालिब (विध्यार्थी )म्हणतं होते. म्हणून यांची कंधार भागात लोकप्रियता वाढत होती.

तालीबान च्या उद्याया पर्यंत सोवियत संघांचे पतन झाले होते. पण हे सुद्धा सत्य आहे कि सोवियत विरोधात जे लढत होते नंतर ते तालीबान मध्ये आले. आणि यांना अमेरिकेचा पूर्ण पणे पाठिंबा होता.

सोवियत संघाला अफगाणिस्तान मधून हाकलून देणे हा अमेरिकेचा सर्वात मोठा हेतू होता. आणि अमेरिका त्या वेळेला ह्याना आतंकवादी म्हणतं न्हवती. कारण या मुळे अमेरिकेची बदनामी झाली असती. अल कायदा सारख्या आतंकवादी संघटनेला सुद्धा हे आतंकवादी मानत नव्हते.

अमेरिकेचा फायदा झाला का?

90 च्या दशकात अमेरिकेला हे समजले की संपूर्ण जगात अमेरिकेला टक्कर देणारा कोणीही नाही. पण समोरच्या काळात अमेरिकेसमोर चीन नावाचा दुश्मन होता.

अफगाणिस्तान मध्ये जे Afagan war गृह युद्ध होते त्या दरम्यान अमेरिकेने मुजाहीजद्दीनांना समर्थन दिले त्यांच्याकडून जे मानव अधिकार्‍याच्या उल्लंघन झाले तिकडे अमेरिकेने मुद्दामहून दुर्लक्ष केले.

तेव्हा संपूर्ण जगासमोर अमेरिकेचा दुपट्टीपणासमोर आला त्याच्या पहिले सुद्धा अमेरिकेचा जिथे फायदा झाला तिथे अमेरिकेने वाटेल ते केले.

खरंतर अफगाणिस्तानची जी आज अवस्था आहे त्याला पूर्णपणे अमेरिका जिम्मेदार आहे. जोपर्यंत अमेरिकेला अफगाण मुज्जाहीद्दीना कडून फायदा होत होता तो पर्यंत अमेरिकेने त्यांना आतणकवादी म्हटले नाही. इतकंच काय पण त्यांच्या कडून मानवधिकाराचे उ्लंघन सुद्धा झाले पण अमेरिकेने तिकडे कांना डोळा केला. ओसामा बिन लादेन ला सुद्धा अमेरिकेने घडवले होते. अश्या प्रकारे Afagan war अफगाणिस्तान मध्ये जो आतणकवाद पेरला गेला या मध्ये फक्त अमेरिकाच होती.

The Balochistan story and history:बलोचिस्थान इतिहास आणि संघर्ष

The Balochistan story :बलोचिस्थान इतिहास आणि संघर्ष

पाकिस्तान म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येतो तो आतंकवाद. पाकिस्तान काश्मीर मध्ये जो आतंकवाद पेरतो ते संपूर्ण जग बघतच असते. आणि हाच आतंकवाद बलोचीस्तान मध्ये सुद्धा पेरत असतो.

आज आपण बघणार आहोत The Balochistan story and historyबलोचीस्तान विषयी मागील सत्तर वर्षांपासून बलोच पाकिस्तान च्या ताब्यात आहे. तेथील बलोच लोकांना पाकिस्तान सरकार कडून काहीही अर्थसाहाय्य भेटत नाही. उलट पाकिस्तान सरकार कडून त्यांना प्रताडीत केले जाते.

https://shorturl.bz/sTc

पाकिस्तान ने बलोचीस्तान वरती कब्जा कसा केला

भारत पाकिस्तान विभाजन झाले तेव्हा बलोचीस्तान चे सुद्धा विभाजन झाले होते. बलोचीस्तान 11ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य झाला होता. विभाजन झाल्यानंतर 255,दिवस बलोचीस्तान एक स्वतंत्र देश होता.

1948मध्ये ऑल इंडिया रेडिओ वरती एका प्रसारणा मुळे जिन्ना ला बलुचिस्तान घेण्याची संधी भेटली. पाकिस्तान च्या मध्ये भागी असा एक भाग होता ज्याला स्वातंत्र्य ठेवण्यासाठी मोहम्मद आली जिन्ना ने वकालत केली होती. तो भाग होता कलात. 27मार्च 1948 कलात मध्ये खान मिर अहमद खान होते. सकाळी ठीक 9वाजता ऑल इंडिया रेडिओ वरती एक प्रसारण होत होते. तेव्हा खान मिर अहमद खान यांच्या पायाखालची जमीन सरकली. बातमी होती भारताने त्यांच्या रियासात विलंय चा प्रस्ताव नकाराला होता.

मुद्दा हा न्हवता कि भारताने प्रस्ताव नकाराला. पण मोठी समस्या ही होती कि पाकिस्तान ने सुद्धा ही बातमी ऐकली होती. आणि दुसऱ्याच दिवशी. पाकिस्तान आर्मी ने खान रियासतीवर धावा बोलला. कलात ला स्वातंत्र्य ठेवण्याचा मुद्दा मातीत मिळाला. कलात पाकिस्तान च्या बलुचिस्तान प्रांता मध्ये एक रियासात होती. विभाजना वेळेस खान सल्तनत ने स्वतःला स्वातंत्र्य घोषित केले होते. पण नंतर पाकिस्तान ने त्यांच्यावर कब्जा केला.

प्रत्येक वर्षी 2मार्च ला बलोचीस्तान मध्ये मध्ये बलोच संस्कृती वाचवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. बलोच संस्कृती पाकिस्तान पाकिस्तान संस्कृती पेक्ष्या वेगळी आहे.

बलोचीस्तान एक स्वातंत्र्य राष्ट्र होते

ज्याला आपण बलोचीस्तान नावाने ओळखतो त्यामध्ये चार रियासते होती. कलात, खरान, लास बेला, मकरान. 1870मध्ये इंग्रजानी कलात च्या खान सल्तनत सोबत एक करार केला. ज्यामुळे ही रियासात इंग्रजाच्या आधीन गेली. तरी सुद्धा इंग्रजाचा यांच्यावर कंट्रोल न्हवता.

या रियासतीची हालत जवळपास भूतान सारखीच होती.रुस आक्रमण करेल या भीतीने इंग्रजानी एक सैन्य तुकडी इथे नेहमी असायची. पण इंग्रज या प्रशासनात कोणतीही दखल देत न्हवते. जेव्हा विभाजनाची वेळ आली तेव्हा इंग्रजानी भूतान आणि सिक्कीम सारखी कॅटेगिरी इथे लावली. बलोचीस्तान च्या बाकी रियासात पाकिस्तान च्या बाजूने होत्या. पण कलात पाकिस्तान च्या बाजूने जायला तयार न्हवते. खान मिर अहमद खान स्वातंत्र्य राहणार होते.The Balochistan story and history

1946पासूनच त्यांनी प्रयत्न सुरु केले होते 1946साली कॅबिनेट मिशन जेव्हा भारतात आले तेव्हा खान मिर अहमद खान यांनी आपला एक वकील भारतात पाठवला होता. आणि हा वकील होता मोहम्मद आली जिन्ना.

जिन्ना आणि मिर अहमद यांची खूप मैत्री होती. मिर अहमद यांनी मुस्लिम लीग ला भरपूर पैसा दिला होता. जिन्ना ने सुद्धा खान सोबतची मैत्री पूर्ण केली होती. भारतात येऊन 1946ला जिन्ना ने कलात चा प्रश्न ठेवला होता. तेव्हा जिन्ना म्हणाला होता. “विभाजन करताना कलात ला स्वातंत्र्य देश म्हणून घोषित केले पाहिजे कारण ‘कलात करार ‘ हा ब्रिटिश इंडिया सरकार ने न करता ‘ब्रिटिश क्राऊन ‘ने केला होता.

त्या वेतिरिक्त मिर अहमद ने ‘समद खान ‘नावाचा एक बलोच नेता दिल्लीला पाठवला होता. समद खान ने जवाहरलाल नेहरु यांची भेट घेतली. पण नेहरू यांनी कलात ला स्वातंत्र्य असण्यासाठी नकार दिला.

त्यानंतर काही महिन्यांनी कलात ची एक डिलिगेशन दिल्ली मध्ये आली या वेळेला ‘कलात स्टेट नेशनल पार्टी ‘ चे अध्यक्ष गौस बक्ष ने मौलाना अबुल कलाम आजाद यांची भेट घेतली. आजाद यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि पाकिस्तान चे विभाजन झाल्या नंतर कलात रियासात ही स्वातंत्र्य राहु शकत नाही.

जिन्ना बलोचीस्तान च्या बाजूने वकील होता. सर्व प्रयत्न फसल्यानंतर कलात चे खान मिर स्वतःहा दिल्ली मध्ये आले होते. 4ऑगस्ट 1947ला दिल्ली मध्ये राउंड टेबल मिटिंग होती. या मिटिंग मध्ये जिन्ना आणि लॉर्ड माउंटबेटन सुद्धा होते. आणि या मिटिंग मध्ये ठरले होते कि कलात हा एक स्वतंत्र देश असेल. या मध्ये खरान, लॉस बेला सुद्धा विलंय होतील. त्यानंतर एका आठवड्यात 11ऑगस्ट 1947ला मुस्लिम लीग आणि कलात यांच्यात एका घोषणा पत्रावर हस्ताक्षर करण्यात आले. त्यामध्ये असे म्हटले होते कि कलात ची आपली एक वेगळी ओळख आहे. आणि मुस्लिम लीग कलात च्या स्वातंत्र्याचा सन्मान करेल.

15ऑगस्ट ला भारत स्वातंत्र्य झाला आणि याच्या पहिलेच कलात ने स्वतःला स्वातंत्र्य म्हणून घोषित केले होते. मिर अहमद यांनी लगेच कलात मध्ये संसद गठन केले होते.

या मध्ये दोन पार्लमेंट होते. उच्च सदन चे नाव होते ‘दारूल उमराह ‘आणि खालच्या सदन चे नाव होते ‘दारूल आवाम ‘दोन्ही सदन मध्ये स्वातंत्र्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आणि घोषणा केली कि पाकिस्तान सोबत त्यांचे संबधं मैत्रीचे असतील.

पाकिस्तान नावाचा देश सुद्धा नवीन झाला होता. पण आणि जिन्ना या मध्ये वेस्थ होता. पण 21ऑगस्ट 1947 साली एक घटना घडली आणि सर्व उलटे घडायला सुरवात झाली.

बलोच वरती जिन्ना ची नजर

बलोचीस्तान मध्ये चार रियासते होती. या मध्ये एक खरान रियासात होती. त्याचे शासक मिर मुहम्मद हबीबुल्ला ने जिन्ना ला एक पत्र लिहले होते. त्या मध्ये होते.

“माझी सल्तनत कलात च्या कब्जात जाणार नाही. आणि गेली तर आम्ही याचा भरपूर विरोध करू “.

हे पत्र म्हणजे खरान ला कलात मध्ये राहायचे नसून पाकिस्तान च्या बाजूने जायचे असा याचा अर्थ होत होता. त्यानंतर लॉस बेला, मकरान यांनी सुद्धा पाकिस्तान मध्ये जाण्याचा सुर लावायला सुरवात केली होती.

balochistan

BALOCH ARMY

कलात वरती दबाव जास्तच वाढत होता.ऑक्टोबर मध्ये जिन्ना ने सुद्धा कलात विरोधात बोलायला सुरवात केली होती. आणि यानंतर मिर खान यांनी सुद्धा त्यांच्या दारूला आवाम मधून जिन्ना ला उत्तर दिले.

“अफगाणिस्तान आणि इराण सारखीच आमची सुद्धा वेगळी संस्कृती आहे. आणि ती संस्कृती पाकिस्तान पेक्षा खूप वेगळी आहे. केवळ मुसलमान असल्यामुळे आम्ही पाकिस्तानी होऊ शकत नाही. आणि असे असेल तर इराण आणि अफगाणिस्तान ला सुद्धा पाकिस्तान मध्ये विलंय व्हावं लागेल.”

ऑल इंडिया रेडिओ वरील ती बातमी

जिन्ना चे संपूर्ण लक्ष काश्मीर, जुनागढ आणि हैद्राबाद वरती होते. 17मार्च 1948मध्ये खरान, लॉस बेला, यांचा पाकिस्तान मध्ये विलंय झाला. म्हणजे बलोचीस्तान च्या एक तिहाई हिस्यावर पाकिस्तान ने कब्जा केला होता. त्यानंतर जिन्ना चे संपूर्ण लक्ष कलात वरती होते.

27मार्च 1928 ऑल इंडिया रेडिओ वरती एक प्रसारण होत होते. केंद्रीय सचिव विपी मेनन यांनी म्हटले होते. कलात चे खान भारताच्या बाजूने आहेत. पण मेनन चे म्हणणे होते “यात भारताला काहीही देणंघेणं नाही “. त्या वेळेला मेनन हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सोबत होते. आणि भारतातील रियासते भारताच्या बाजूने आणण्याचे काम करत होते.

ऑपेरेशन ‘रेथ ऑफ गोड ‘:ज्यामुळे इस्राईल चे दुश्मन आज सुद्धा घाबरतात.

baloch history

कलात मध्ये खान जेव्हा हे भाषण ऐकत होता तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन हादरून गेली होती. कारण खान ला माहित होते. आता पाकिस्तान शांत बसणार नाही. इकडे भारतात सुद्धा या बातमी मुळे वेगळे अर्थ निघत होते.

दुसऱ्या दिवशी हे वातावरण शांत करण्यासाठी एक बयान दिले. आणि त्यांनी सांगितले अश्या प्रकारे कोणतेही बयान दिले नाही.

Story of Balochistan

Baloch History

पण यानंतर सुद्धा जे नुकसान होणार होते ते नुकसान झाले.

28मार्च ला जिन्ना ने पाकिस्तानी आर्मिला कलात वर चढाई करण्याचा आदेश दिला. त्यानंतर कलात च्या खान ला पाकिस्तानी सेनाने अटक केली आणि त्यांच्यावर दबाव टाकून विलय पत्रावर स्वाक्षरी घेतली.

अश्या प्रकारे 225दिवस स्वातंत्र्य राहून कलात वर पाकिस्तान ने कब्जा केला.

The balochistan story

operation D-DAY ऑपेरेशन डी डे दुसऱ्या महायुद्धतील सर्वात मोठी सैन्य कारवाई

इतिहासाच्या पानामध्ये एक ऑपेरेशन असे सुद्धा आहे जाने दुसऱ्या महायुद्धला एक निर्णायक परिणाम दिला. नाझी जर्मनी जेव्हा संपूर्ण युरोप मध्ये धुमाकूळ घालत होती तेव्हा मित्र राष्ट्र पूर्ण पणे हताश झाले होते. चारी बाजूने फक्त हिटलर चा विजय होत होता. हिटलर चे हवाई हमले इंग्लंड च्या लंडन वरती सुद्धा होत होते. इकडे अमेरिका आणि जपान लढत होते जपाण्यानी सुद्धा अमेरिकेला पुरतं घायाळ करून सोडले होते. हिटलर च्या जीवनतील सर्वात मोठे ऑपरेशन बरबारोसा मुळे सोवियत रुस सुद्धा पूर्ण पणे बिखरून गेला होता. या दुसऱ्या महायुद्धात हिटलर अजय ठरत होता. नाझी सैनिकांनी मानव जातीला लाजवेल असे काम केले होते. जर्मनी मध्ये येहुदी समाजाला लाजिरवाण्या पद्धतीने नाझी मारत होते. हिटलर आणि नाझी यांनी अत्याचाराचा कळस गाठला होता. आणि आता मित्र राष्ट्रा कडे एकच पर्याय उरला होता. हिटलर ला हरवणे आणि दुसरे महायुद्ध समाप्त करणे कारण या या महायुद्धात लाखो करोडो लोक तो पर्यंत मारल्या गेले होते. आणि हे युद्ध चालूच होते. त्या नंतर या महायुद्धला एक निर्णायक मोड भेटला आणि तो म्हणजे ऑपेरेशन d day तर आज आपण बघणार आहोत ऑपेरेशन d day विषयी जाने दुसरे महायुद्ध संपले.

6जून 1944हा दिवस म्हणजे 20व्या शतकाला पूर्ण पणे कलाटणी देणारा ठरला होता. दुसऱ्या महायुद्धच्या झळा संपूर्ण जगाला लागल्या होत्या.

D day मानवाच्या इतिहासातील सर्वात मोठे संयुक्त सैन्य ऑपरेशन

1944पर्यंत महायुद्ध संपूर्ण जगात पोहचले होते. नाझी जर्मनिनी अत्याचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या होत्या. आणि युरोपीय देशाची अवस्था खूप बिकट झाली होती त्यामुळे त्यांच्या समोर ‘करो या मरो ‘ची स्तिती झाली होती.

अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि सर्वच मित्र राष्ट्र हे युद्ध थांबेल कसे याचा विचार करत होते. 1944जून मध्ये मित्र राष्ट्रानी 1लाख 56हजार सैनिक नाझी जर्मनीच्या विरोधात उभे केले. मित्र राष्ट्राच्या सैनिकांनी 6जून 1944ला उत्तरी फ्रान्स च्या नॉरमेंडी शहराच्या किनाऱ्यावर घुसपैठ केली. हा भाग जर्मनीच्या ताब्यात होता. या घुसपैठीला मानव इतिहासातील सर्वात मोठी सबमरीन घुसपैठ म्हणतात. दुसऱ्या महायुद्धातील सर्वात मोठे सैन्य अभियान आहे.

या संयुक्त सैन्य अभियानाला ऑपेरेशन ओव्हरलोड सुद्धा म्हणतात. युरोप मध्ये नांझिंच्या भागात हा हमला होता. या ऑपरेशन ला नेपच्युन हे सुद्धा नाव दिले होते. दुसरे महायुद्ध समाप्त करणे हाच याचा उद्देश होता. या अभियानात तिन्ही सेनानीं भाग घेतला होता. पोर्टसमाऊथ च्या डी डे संग्रहालयातील आकाड्यानुसार नाझी सैनिकांच्या विरोधात जे सैन्य अभियान चालू होते त्या मध्ये मित्र राष्ट्राचे 4413सैनिक मारले गेले होते आणि नाझी जर्मनीचे 9हजार सैनिक मारले गेले होते.

या ऑपेरेशन मध्ये मित्र राष्ट्रानी फ्रान्स मध्ये चढाई करून फ्रान्स नांझिंच्या हातून सोडून घेतले. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धला एक नवीन दिशा मिळालली. त्यानंतर सोवियत सैनिकांनी सुद्धा पूर्वे कडून हमाला केला ज्यामुळे हिटलर चे बर्लीन शहर त्याच्या हातून जाणार होते. त्यानंतर केवळ 11महिन्यांनी नाझी जर्मनी दुसरे महायुद्ध हरली.

नॉरमंडी च्या लढाई नंतर एका वर्षात दुसरे महायुद्ध संपले

नॉरमंडी च्या लढाई नंतर हिटलर सोबत जे राष्ट्र होते ते हरत चालले होते.

आणि त्यांचा एक एक भाग मित्र राष्ट्राच्या ताब्यात जात होता. ऑक्टोबर मध्ये फिलिपीन्स च्या लेटी भागावर मित्र राष्ट्रानी धावा बोलला. ज्या मध्ये जपान हरला. त्यानंतर ओकेनावा भुभागवरून सुद्धा जपान चा ताबा गेला. जो भुभाग जपान कडे मागील 75वर्षांपासून होता. त्या नंतर जे घडणार होते ते महाभयंकर होते. मानव जातीच्या इतिहासातील सर्वात मोठा असा हल्ला होणार होता.

6ऑगस्ट ला अमेरिकेने हिरोशीमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. या हल्ल्यात हजारो माणसे मारल्या गेली आणि लाखो माणसे जखमी झाली किंवा अर्ध मेली झाली.

Hiroshima

दुसरा अणुबॉम्ब तीन दिवसाने नागासाकी शहरावर टाकला. त्यानंतर 2सब्टेंबर 1945ला जपान ने बिना शर्त आत्मसमर्पण केले. यानंतर 6वर्ष चालणार महायुद्ध समाप्त झालं.

word war 2

Adolf hitlar

ऑपेरेशन ‘रेथ ऑफ गोड ‘:ज्यामुळे इस्राईल चे दुश्मन आज सुद्धा घाबरतात.

इस्राईल गुप्तचर यंत्रणा म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते त्यांचे वेगवेगळे ऑपेरेशन आणि त्यांनी बनविलेला प्लान ज्याने त्यांच्या दुश्मनाचा थरकाप उडतो. आज आपण बघणार आहोत अश्याच एका ऑपेरेशन विषयी माहिती ऑपेरेशन रेथ ऑफ गोड विषयी माहिती.

1980आणि 90च्या दशकात फिलिस्तींनी समर्थक आतंकवाद्याच्या घरी एक फुलाचा गुलदस्ता येत होता. त्या सोबत एक नोट असायची त्यात लिहिलेले असायचे “आम्ही विसरत नाही, आणि माफ सुद्धा करत नाही. त्यानंतर तेथील आतंकवाद्याची हत्या होत असे. आणि हे काम होत जगातील सर्वात खतरनाक गुप्तचर यंत्रणा मोसाद चे. या वेळेस इस्राईल चे दुस्मन जगाच्या पाठीवर कोठेही लपलेले असतील तर त्यांना शोधून मारण्याची ताखत मोसाद कडे होती. पण अशी कोणती घटना घडली होती कि मोसाद आपल्या दुश्मणाला संपूर्ण जगात शोधून मारत होते.

म्युनिख नरसंहार

6सप्टेंबर 1972 या दिवशी इस्राईल देश्यातील नागरिक TV आणि रेडिओ ला चिपकून बसले होते. जर्मनीच्या म्युनिख शहरांत ऑलम्पिक चालू होते. पण त्या दिवशी इस्राईली नागरिक ऑलम्पिक गेम बघत न्हवते तर तिथे चालू होता इस्राईल खेळाडूंचा नरसंहार.

फिलिस्तीन च्या एका आतंकवादी संघटनेच्या काही आतंकवाद्यांनी इस्राईल च्या खेळाडूंना बंधक बनविले होते ज्या आतंकवाद्यानी इस्राईल च्या खेळाडूंना बंधक बनविले होते ज्या आतंकवाद्यानी खेळाडूंना बंधक बनवले होते त्या आतंकी संघटनेच नाव होत “, ब्लॅक सप्टेंबर “.

या आतंकवाद्यानि सुरवातीला दोन खेळाडूंना मारले आणि बाकीच्यांना बंधक बनविले या बांधकाच्या बदल्यात 200 फिलिस्तींनी कैद्याना सोडण्याची मागणी केली.

जर्मनीचे चान्सलर विली ब्रांट यांनी इस्राईल च्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांना फोन केला आणि या घटनेबद्दल सांगितले गोल्डा मेयर या इसराईल च्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. 17मार्च 1969 ला त्या इसराईल च्या सत्तेवर आल्या होत्या. सत्तेवर आल्यापासून सर्वात मोठी समस्या त्यांच्या समोर आली होती. त्यांनी इसराईल ची जुनी परंपरा कायम ठेऊन त्यानि जर्मन चान्सलर विली ब्रांट यांना सांगितले ‘आम्ही आतंकवाद्याची कोणतीही मागणी पूर्ण करणार नाही ‘.

आतंकवाद्यानि बंधकांना विमान तळावर नेले तेव्हा जर्मन सुरक्षा रक्षकांनी एक रेस्क्यू ऑपेरेशन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सर्वांचे लक्ष या ऑपेरेशन वरती होते तेव्हा tv वरती एक बातमी आली. आतंकवाद्या पासून खेळाडूंना सोडवण्यात यश आले आहे. त्यानंतर इस्राईल मध्ये सर्वत्र आनंद वेक्त होत होता. पंतप्रधान गोल्डा मेयर सुद्धा आपल्या ऑफिस मध्ये आनंद वेक्त करत होत्या. त्यांना वाटत होते खूप मोठ्या संकटातून खेळाडू वाचले पण त्यांना काय माहित होते? कि हा आनंद फक्त एका रात्री पुरताच आहे.कारण दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना समजले कि ही बातमी पूर्ण पणे खोटी होती.आणि सकाळी त्यांना या पेक्षा सुद्धा मोठा धक्का बसला होता. केवळ गोल्डा मेयर च नाही तर संपूर्ण इसराईल आणि जगाला सुद्धा कारण आतकंवाद्यानी इस्राईल च्या सर्व खेळाडूंना मारले होते.आणि ही भयंकर बातमी पचवण इस्राईल साठी एवढं सुद्धा सोपं न्हवत. खरं तर केवळ इसराईल साठीच नाही तर तर संपूर्ण ऑलम्पिक साठी हा दिवस काळा झाला होता. या मध्ये जर्मनीला सुद्धा खूप मोठा धक्का होता. हे सर्व जर्मनीच्या जमिनीवर चालू होत. पंचवीस ते तीस वर्ष्यापुर्वी याच जर्मनीत लाखो येहुदी हिटलर ने मारले होते आणि त्यानंतर ही घटना घडली होती. यानंतर पाच आतंकवाद्याना मारले होते पण आणखी तीन जिवंत होते.

संपूर्ण इसराईल शोकाकुल होते दुःख आणि राग त्यांच्या मनात भरला होता. त्यांच्याकडून एकच आवाज येत होता. झालेल्या घटनेचा बदला.

प्लेन हाईजाक

इस्राईल ने या हत्येचा बदला घेण्यासाठी लेबनानं आणि सिरिया मध्ये आतंकवाद्या च्या ठिकाणावर भरपूर हवाई हमाले केले या हमल्यात 200पेक्ष्या जास्त आतंकी मारले गेले. पण तरीही इसराईल शांत बसू शकत न्हवता कारण ते तीन आतंकी आणखीन सुद्धा जिवंत होते आणि त्या हत्येचा प्लॅन बनवणारे सुद्धा जिवंतच होते. त्या तीन आतंकवाद्याची नावे होती अदनान अल गाशे, जमाल अल गाशे, आणि मोहमद गदाफी हे सर्व जर्मनी च्या ताब्यात होते पण जर्मनी च्या संविधाना नुसार त्यांना मृत्यू दंड देता येत न्हवता. त्यामुळे इस्राईल जर्मणीकडे मागणी करत होता कि हे आतंकी इस्राईल च्या हवाली करा. त्यानंतर काही आठवड्यात एक घटना घडली आणि इस्राईल जर्मणीकडे जी मागणी करत होता त्या मागणी वर पाणी फिरले होते.

आक्टोबर 1972ला एक विमान 615सिरिया मधून जर्मनीला जात होते. त्या विमानात दोन आतंकवादी होते. काही वेळात त्यांनी ते विमान हाईजाक केले. त्यांची मागणी होती म्युनिख मध्ये जे तीन आतंकवादी पकडले होते ते सोडावे. जर्मनीने आपल्या नागरिकांसाठी त्यांची मागणी पूर्ण केली. आणि साहजिकच इसराईल मध्ये एक संतापाची लाट उठली.

इस्राईल पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्यावर खूप जास्त जनतेकडून दबाव वाढत होता. जनतेची एकच मागणी होती. ती म्हणजे बदला. गोल्डा मेयर यांनी इस्राईल च्या गुप्त अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली आणि या बैठकीत एक कमिटी बनवली त्या कमिटीला नाव दिले कमिटी एक्स आणि या कमिटीलाच ठरवायचे होते म्युनिख च्या आतंकवाद्याना कसे व केव्हा मारायचे.हे काम सोपं सुद्धा न्हवत.

गुप्तचरांकडून मिळालेल्या माहिती नुसार 20ते 35लोकांची त्यांनी एक लिस्ट बनवली हे सर्व आतंकी युरोप किंवा मध्य पूर्व मध्ये होते.प्रत्येक आतंकवाद्याला शोधायचे होते आणि मारायचे होते.या मध्ये एक दक्षता घ्यायची होती कि हे सर्व मारल्या नंतर कोणत्याही प्रकारे संशयाची सुई इसराईल कडे होता कामा नाही. हे सर्व फक्त इसराईल ची मोसादच करू शकत होती मोसाद ने या ऑपरेशन ला नाव दिले “रेथ ऑफ गोड “.

मोसाद च्या या ऑपरेशन ला लीड करत होते एजेंट मायकल हरारी. त्यांनी पाच टीमा बनविल्या. आणि या प्रत्येक टीम ला हिब्रू अल्फा बेट मध्ये नाव दिले.

1)आलीफ – या टीम मध्ये दोन किलर होते

2)बेट – या टीम मध्ये दोन एजेंट असे होते कि ते कोणाची ही खोटी identy बनवत होते.

3)हेट – या टीम च्या एजेंट ना काम होते हॉटेल आणि कार चा बंदोबस्त करणे.

4)आयिन -या टीम चे काम होते बाकी टीम साठी एस्केप रूट तयार करणे.

5)कोफ –या टीम चे काम होते बाकी सर्व टीम च्या संपर्कात राहायचे.

या ऑपेरेशन मधील एजेंट चा इसराईल सरकार सोबत कोणताही संबंध ठेवला न्हवता ते फक्त मायकल हरारी ला रिपोर्ट देत होते.

ईश्वराचा उद्रेक

या ऑपरेशन ला सुरवात झाली 16ऑक्टोबर 1972ला रोम मधील एका हॉटेल मध्ये गोळ्यांचा आवाज आला.आणि या लिस्ट मधून एक नाव काढण्यात आले एका आतंकी चा खात्मा झाला होता. त्यानंतर एका महिन्याने फ्रान्स मधून अशीच एक बातमी आली. ‘ब्लॅक सप्टेंबर ‘चा लीडर महमूद हमशारी याला माहित होते कि आपल्यावर मोसाद ची नजर आहे.मोसाद च्या भीतीने तो आपल्या अपार्ममेंट मध्ये लपून बसला होता. त्यामुळे त्याला मारणे अवघड होऊन बसले होते. त्यानंतर मोसाद च्या टीम ने एक प्लान बनविला. एके दिवशी त्याला एका पत्रकाराचा फोन आला. पत्रकाराने त्याला भेटण्यासाठी बोलावले. महमूद त्या पत्रकारला भेटण्यासाठी बाहेर गेला त्याच वेळेला मोसाद ची टीम त्याच्या घरात गेली. आणि त्याच्या टेलिफोन मध्ये बॉम्ब सेट केला. जेव्हा महमुद घरी गेला आणि त्याला एक फोन आला त्याने फोन उचलला आणि एक स्फोट झाला. त्यात महमूद गंभीर जखमी झाला. तो काही दिवस हॉस्पिटल मध्ये होता पण डॉक्टर त्याचा जीव वाचवू शकले नाहीत. त्यानंतर असेच हमले होत राहिले आणि म्युनिख हमल्याला जिम्मेदार असलेले सर्व आतंकवादी मारले गेले. हे ऑपरेशन करताना मोसाद ने कोणाचाही विचार केला नाही. बेरूत मधील एका युनिव्हर्सिटी मध्ये काम करणाऱ्या प्रोफेसर ला सुद्धा मारले.त्या प्रोफेसर वरती मोसाद ला संशय होता कि म्युनिख हत्या कांड मध्ये त्याचा सुद्धा हात होता.

ह्या सर्व आतंकवाद्यांना मारण्या आगोदर मोसाद त्यांच्या घरी फुलांचा एक गुलदस्ता पाठवत होते. आणि त्यावर लिहिलेले असायचे “आम्ही विसरत नाही आणि माफ सुद्धा करत नाही “यावेतिरिक्त पेपर मध्ये सुद्धा मरणारा विषयी शोक संदेश लिहिला जात असे. त्यामुळे मरणाराला जास्तच भीती वाटत असे.

OPERATION WRATH OF GOD

mosad

ऑपेरेशन स्प्रिंग ऑफ युथ

या अचानक हल्ल्यामुळे आतंकवाद्यामध्ये घाबराट सुटली होती. मोसाद च्या लिस्ट मधील तीन आतंकवाद्यानि आपल्या घरासमोर सुरक्षा लावली होती. त्यांना मारणे मोसाद साठी अवघड होऊन बसले होते. मोसाद ने यांना मारण्यासाठी स्पेशल ऑपरेशन चा फ्लान करावा लागला त्या ऑपरेशन चे नाव होते. स्प्रिंग ऑफ युथ. या ऑपरेशन साठी इसराईल नेवी आणि एअरफ़ोर्स चा उपयोग घेतला गेला.स्पीड बोट घेऊन इसराईली स्पेशल फ़ोर्स चे कमांडो लेबनान च्या किनाऱ्यावर आले. त्यांनी तेथील स्थानिक नागरिकांची वेशभूषा केली. काही कमांडोनी बुरखा घातला आणि टार्गेट पर्यंत गेले. रोतो रात हे कमांडो त्या बिल्डिंग मध्ये गेले आणि त्या तीन आतंकवाद्यांना मारून बाहेर पडले.

हे सर्व चालू असताना इसराईल च्या पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या हत्तेचा सुद्धा प्रयन्त झाला होता. पण मोसाद आतंकवाद्याच्या या प्लान वरती पाणी फिरवले. पंतप्रधान गोल्डा मेयर यांच्या हत्येचा प्लान बनविणारा आतंकी ‘आली हसन सलामेह ‘होता तो भरपूर दिवस मोसाद ला चकमा देत होता पण शेवटी 1979ला मोसाद ने त्याच्या गाडीत बॉम्ब ठेवला आणि त्याचा सुद्धा खात्मा केला.

GOLDA MAIR

सिरियाई गृहयुद्ध ज्याने जग दोन भागात विभागले गेले होते. -भाग 2

आपण बघत आहोत सिरिया मधील गृह युद्ध भाग एक मध्ये काही भाग बघितला आता बघूया भाग 2

गृहयुद्ध

सिरियाई विद्रोह हा गृहयुद्धा मध्ये कधी बदलून गेला हे कोणालाच समजले नाही. जुलै महिन्यात सिरियाई सैन्या मधून काही विद्रोही पळून गेले होते आणि त्यांनी एक विद्रोह गट निर्माण केला त्याचे नाव होते ‘फ्री सिरीयन आर्मी ‘पण स्थानिक लोकांनी त्यांना मान्यता दिली नाही.

2011च्या शेवटी आणि 2012च्या सुरवातीला हा सत्तासंघर्ष थांबवण्यासाठी अंतरराष्ट्रीय संघटनानी भरपूर प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नोव्हेंबर 2011च्या सुरवातीला काही सिरीयन अधिकाऱ्यांनी एका समझोत्यावर सहमती दाखवली. अरब लीग ने सांगितले सिरियाई सरकार प्रदर्शन कारी लोकांवर हिंसा करते ती थांबवावी, शहरा मधून सैनिक आणि त्यांचे टॅंक हटवावे, प्रदर्शनकारी जे अटक झाले होते त्यांना सोडावे. डिसेंबर 2011मध्ये डिसेंबर 2011मध्ये सिरिया सरकार ने अरब लीग च्या अधिकाऱ्यांना सिरिया मध्ये येऊन निरीक्षण करण्याची अनुमती दिली.

दुसरा करार, संयुक्त राष्ट्र महासचिव च्या मध्यस्थीने झाला. कोफी अन्नान च्या नेतृत्वात संयुक्त राष्ट्र आणि अरब लीग यांच्या द्वारा एका प्रयोजित संयुक्त राष्ट्र महासभा 75व्या सत्रात एक युद्ध विराम झाला. पण त्यानंतर लवकरच पुन्हा एकदा सिरिया मध्ये हिंसा सुरु झाल्या आणि सुरवाती पेक्ष्या जास्त प्रमाणात ह्या हिंसा होत्या. आणि त्यामुळे अरब लीग आणि सयुक्त राष्ट्राची टीम यांना वापस बोलावण्यात आले.प्रदर्शनकारी आणि सरकार यांच्यात शांती स्थापित करण्यात सफलता भेटली नाही.

त्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि अरब लीग ने या समाधानासाठी आंतरराष्ट्रीय संमेलन मध्ये जिनेवा विज्ञप्ती तयार केली. पण या साठी अमेरिका आणि रुस यावर सहमत न्हवते.कारण येणाऱ्या काळात सिरियाच्या सरकारात असद ला घ्यायचे का नाही हा विषय होता.

2012च्या सुरवातीला स्पष्ट झाले होते कि ऑगस्ट 2011मध्ये इस्ताबूल मध्ये गठीत विध्यार्थी समूह सिरिया राष्ट्रीय परिषद (snc)विपक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप कमजोर आहे कारण त्यांच्यात अंतर्गत मतभेद होते.

त्यानंतर नोव्हेंबर मध्ये सिरियातील सर्व सरकार विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार विरोधात एक गटबंधन तयार केले ‘सिरिया क्रांतिकारी आणि विपक्षा साठी’ राष्ट्रीय गठबंधन तयार केले. आणि केवळ एका महिन्यात भरपूर देशानी यांना मान्यता दिली. 2012च्या उन्हाळ्यात विद्रोही लोकांना काही प्रमाणात सफलता मिळवता आली. सिरियाच्या सैनिकांना उत्तर आणि पूर्व च्या इलाख्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे विद्रोहीना पहिली वेळ एका महत्वपूर्ण जागेवर नियंत्रण करता आले.

जैले महिन्यात सिरियाचे सर्वात मोठे शहर अलेप्पो वरती हल्ला केला आणि शहराच्या पूर्व भागात नियंत्रण केले.

2013च्या सुरवातीला सिरीयन सैनिकांनी विद्रोहीना बरेच मागे ढकलले विद्रोहीनी उत्तरी भागात आपली पकड मजबूत बनवली. पण त्यांच्याकडे सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी हात्त्यार कमी होते त्या मुळे ते कमजोर पडले आणि सिरीयन आर्मी सुद्धा इथे कमी पडत गेली.

जे क्षेत्र विवादित होते त्या क्षेत्रात लढाया जास्त प्रमाणात होत होत्या. त्यामुळे सामान्य माणूस सुद्धा त्या मध्ये नहाग मारल्या जात होता. आणि या सामान्य माणसाच्या मृत्यू चा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला होता.

ही लढाई कोणत्याही निर्णयाकडे जात न्हवती ना सरकार जिंकले होते ना विद्रोही त्या मुळे ज्यांच्या त्यांच्या अंतरराष्ट्रीय सहयोगिनी समर्थन वाढवायला सुरवात केली. टर्की, सौदी अरब आणि कतर हे देश विद्रोहीना हत्यार देत होते. अमेरिकन सरकार हत्यार देण्यासाठी घाबरत होते कारण त्यांना भीती होती कि शस्त्र आतंकवाद्याच्या आणि कट्टर पंथी लोकांच्या हाताला लागतील. 2012च्या शेवटी हिजबुल्ला संघटनाने सुद्धा सिरिया सरकार ला मदत दिली.

त्यानंतर सिरिया गृहयुधाच्या दिशेने वाटचाल करू लागला.

युद्धात रासायनिक हत्त्यार

21ऑगस्ट 2013ला दमिश्क शहराच्या भागात रासायनिक हाथीयारांचा हल्ला झाला आणि हजारो लोक मारल्या गेले त्यानंतर सिरिया मध्ये अंतरराष्ट्रीय सैन्य कारवाईसाठी आव्हान करण्यात आले.

सिरियाच्या विपक्ष दलानि सरकार वरती आरोप केले कि हे हल्ले सरकार समर्थीत लोकांनी केले पण असद सरकार ने साफ नकार दिला आणि विद्रोही लोकांना जिम्मेदार ठरविले.त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या हाथीयार निरंक्षकांनी रासायनिक स्थळावर सबूत एकत्र केले आणि सिरीयन सरकार ची निंदा केली. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी सांगितले होते ते असद सरकार च्या विरोधात कारवाई करण्या संबंधि विचार करत आहेत. त्यानंतर रुस, चीन आणि इराण यांनी सुद्धा असद सरकार ला उधड पणे पाठिंबा दिला. आणि पश्चिम देशा विरोधात लढण्याची ग्वाही दिली.

ऑगस्ट च्या शेवट पर्यंत अंतरराष्ट्रीय कारवाई होणार ही गोष्ट फिकी पडली. अमेरिका आणि इंग्लंड हे सिरियामध्ये सैन्य कारवाईच्या विरोधात होते. इंग्लंड संसदेत सिरिया मध्ये सैन्य कारवाई करण्या संबंधी मतदान झाले आणि विफल ठरले. अमेरिकी काँग्रेस मध्ये सुद्धा 10सप्टेंबर ला मतदान होणार होते पण ते स्थागित करण्यात आले. आणि त्याच वेळेला कुटनीती सर्वांच्या कामी आली. 14सप्टेंबर ला रुस सिरिया आणि अमेरिका यांच्या त एक करार झाला त्या नुसार सिरिया मधील संपूर्ण रासायनिक हत्यार आंतरराष्ट्रीय नियंत्रणात असतील असे ठरले या कराराला लागू केले 30जून 2014 साली आणि या कराराची समय सीमा पर्यंत सिरिया मधून रासायनिक हत्यार काढून घेण्यात आले.

नुसरा फ्रंट आणि isis चा उदय

2013साली इस्लामिक आतंकवाद्यानी महत्वाच्या जागी कब्जा करायला सुरवात केली. कारण तोपर्यंत विद्रोही सैनिक आणि सरकार यांच्यातील लढाईने त्यांचे सैनिक कमजोर झाले होते.

नुसरा फ्रंट (जबाहत अल नुसरा )सिरिया मध्ये सक्रिय असलेली संघटना अल कायदा सोबत मिळालेली होती. ही संघटना बाकीच्या आतंकवादी तुलनेत मोठी होती.

इकडे एप्रिल मध्ये isis चा ‘अबू बक्र अल बगदादी ‘ने घोषणा केली होती कि इराक मध्ये isis संघटना नुसरा फ्रंट सोबत मिळवेल. पण नुसरा फ्रंट आणि isis यांच्यात छोट्या मोठ्या लढाया होत राहिल्या. कारण isis ला सिरिया मध्ये आपले पाय रोवायचे होते. ज्याची सुरवात ‘अल रक्का ‘शहरातील ‘फरात’ घाटी पासून झाली आणि त्याचा विस्तार इराक सिरिया सीमा भागा पर्यंत झाला.

अंतराष्ट्रीय हस्तक्षेप आणि रुस चा प्रवेश

इराक मध्ये isis ची अचानक बढत झाली. ज्याच्या सोबत हिंसक आणि क्रूर प्रचाराची सुद्धा सुरवात झाली. त्यावेळी जागतिक पातळीवर isis विरोधात कारवाईची मागणी होत होती. त्यानंतर ही मागणी आणखी त्रिव होत गेली.

8ऑगस्ट ला अमेरिकेने isis ला उत्तरी इराक मध्ये रोकून धरले कारण समोर कुर्द क्षेत्र होते या भागात इसाई आणि यजदी समुदाय राहत होते. त्यामुळे अमेरिकेने isis वरती हवाई हल्ले सुरु केले. पण त्यानंतर isis च्या आतंकवाद्यानी काही क्रूर वीडियो पाठवायला सुरवात केली ज्यामध्ये पत्रकारांचे गळे कापले होते. 33डिसेंबर ला अमेरिका आणि अरब देश यांनी एक गठबंधन करून सिरिया मध्ये isis च्या ठिकाणावर हवाई हमले केले.

2015मध्ये रुस यामध्ये आणखी सक्रिय झाला.’लताकीया ‘मध्ये एका हवाई अड्डयावर रुसी सैनिकांना तैन्यात करण्यात आले.

सप्टेंबर मध्ये रुस ने पहिला हवाई हमला केला. रशियाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला होता कि हवाई हमले isis ला निशाणा बनवत आहेत. पण त्यानंतर अमेरिकेने आरोप केला कि रशिया असद च्या विरोधात लढणाऱ्या विद्रोही लोकांवर हल्ले करत आहे. रुस ने सुद्धा अमेरिकेवर आरोप केला होता कि अमेरिका isis च्या ठिकाणावर हल्ला न करता सिरीयन आर्मी वर करत आहे.

सप्टेंबर 2016मध्ये रुस आणि सिरीययी सैनिक आणि पश्चिम समर्थीत विद्रोही मध्ये युद्ध विराम संपल्यानंतर रुस ने व सिरीयन सैनिकांनी विद्रोहीच्या कब्जात असलेले ‘अल्लेपो’ शहर आणि त्याचा पूर्वी हिस्सा वर आपले ध्यान केंद्रित केले. त्यानंतर रसियाने भरपूर हवाई हल्ले केले.

2016पर्यंत isis काही वर्ष उत्तरी सिरिया आणि पूर्वी सिरिया मध्ये अजेय होत होता. त्यानंतर कुर्द सैनिक, अमेरिकी सहयोगि, इराण रुस समर्थीत असद सैनिक यांच्यातील टाकरावणे isis कमजोर पडू लागला.

उत्तरेला कुर्द आणि तुर्की समर्थीत सैनिक यांनी तुर्की सीमा भागात आपली पकड मजबूत केली. त्यामुळे isis च्या हातून एक महत्वपूर्ण क्षेत्र गेले. आणि अमेरिकेने isis वरती हवाई हमले आणखी जास्त वाढवल्यामुळे isis खूप जास्त कमजोर झाले.

असद सरकार पडले

2024मध्ये एक नवीन विद्रोह झाला त्यावेळी असद सरकार ला आंतरराष्ट्रीय समर्थन जास्त मिळत न्हवते. रुस युक्रेन युद्धा मुळे रुस ची असद ला सहायत्ता खूप कमी होती. आणि इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे असद ला इराण कडून सुद्धा जास्त समर्थन मिळत न्हवते. आक्टोबर मध्ये हिजबुल्हाने सुद्धा सिरिया मधून त्यांचे माणसं वापस बोलावले होते.

त्यानंतर hts एका आठवढ्यात ‘हामा’ पर्यंत आपला विस्तार करण्यात त्यांना यश मिळाले.त्यानंतर ‘दरारा आणि होम्स वरती 7डिसेंबर ला कब्जा केला. त्यानंतर विद्रोही सेना ‘दमिश्क’ शहरात आली आणि रातो रात त्यांनी ‘दमिश्क’शहरावर आपले नियंत्रण मिळवले. त्यावेळी त्यांना समजले कि असद हे देश सोडून पळून गेले होते. त्यानंतर सिरिया मध्ये नवीन सरकार चे गठन करण्यात आले आणि असद सरकार कायमचे कोसळले.असद यांनी रुस मध्ये राजकीय आश्रय घेतला आहे.

what is indus water treaty?काय आहे सिंधू जल करार? ज्याने पाकिस्तान चा थरकाप उडाला आहे.

भारताच्या जमिनीवर आणखी एकदा आतंकवादी हमला झाला. भारत सरकार ने आतंकवाद्याला समर्थन देणाऱ्या पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली आहे.भारत सरकार ने सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान चे चांगलेच कंबरडे मोडणार आहे आणि या मुळे पाकिस्तान मध्ये अन्न, पाणी आणि ऊर्जा चे मोठे संकट उद्भवणार आहे.

दक्षिण काश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकावर आतंकवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकार सुरक्षा समितीची (CCS) बैठक झाली. या बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले या मध्ये 1960झाली झालेल्या ‘सिंधू जल करार ‘ला थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

काश्मीर मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्या नंतर पाकिस्तान च्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे, असे बोलले जात आहे. सिंधू जल करारा मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये नेहमी वाद होत आला आहे. या मध्ये आपल्याला माहित असणे आवश्यकत आहे कि सिंधू जल करार काय आहे?

काय आहे सिंधू जल करार

भारत आणि पाकिस्तान मध्ये सिंधू जल करार हा 19सप्टेंबर 1960 ला कराची मध्ये झाला होता. हा करार सिंधू नदीच्या उपनद्या चे पाणी वापर साठी झाला होता. विश्व् बँक या करारासाठी भारत आणि पाकिस्तान मध्ये 9 वर्षा पासून बोलणी करत होते. भारता कडून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तान कडून राष्ट्रपती अयुब खान ने या करारावर स्वाक्षरी केली.

सिंधू करारा वर भारत सरकार पुन्हा एकदा विचार करत होते.

भारताने जानेवारी 2023 मध्ये पाकिस्तान ला सिंधू जल करारावर बदल करण्यासाठी एक नोटीस पाठवली होती यामध्ये भारताने झालेल्या करारावर आणखी सुधार करायची असे बोलले होते. त्या नंतर दीड वर्ष्याने सप्टेंबर 2024मध्ये भारत सरकार ने पुन्हा एकदा पाकिस्तान ला नोटीस पाठवली होती.

या मागचा भारत सरकार चा उद्देश होता कि मागील 64वर्ष्यापासून जो करार झाला होता तो रद्द करून नवीन करार करण्यात यावा. भारत पाकिस्तान सिंधू जल करारा मध्ये अनुच्छेद XII(3) नुसार दोघांच्या सहमतीने वेळो वेळी या करारा मध्ये सुधारणा करू शकतो. भारताने या अनुच्छेद चा वापर करून पाकिस्तान ला या करारा मध्ये बदल करण्यासाठी नोटीस पाठवली होती.

भारताने जम्मू काश्मीर मध्ये दोन जल विदयुत प्रकलपाचे काम चालू केले आहे. त्यामध्ये एक परियोजना बंदिपोरा जिल्ह्यातील झेलम नदीची उपनदि किशनगंगा नदीवर आहे. आणि दुसरा रतले हाईड्रॉइलेक्ट्रिक प्रकल्प किश्तवाड जिल्हातील चेनाब नदीवर आहे. दोन्ही प्रकल्प नदीच्या प्राकृतिक पद्धतीने वीज बनवू शकतात.

भारताचा उद्देश आहे कि या प्रोजेक्ट पासून क्रमश :330मेगावॅट आणि 850मेगावॅट ऊर्जा बनवण्याचे लक्ष आहे.

indus water

पाकिस्तान याचा विरोध करत आहे.

पाकिस्तान चा या प्रकल्पला लगातार विरोध होत आहे. पाकिस्तान चे म्हणणे आहे हे प्रकल्प म्हणजे सिंधू जल कराराचे उ्लंघन आहे. आणि भारत सरकार ने सुद्धा या विषयी बातचीत करण्यासाठी बोलले होते. या साठी नोटीस सुद्धा पाठवल्या होत्या.

शहापूर कडी बांध

सिंधू जल विभाजन साठी भारत आणि पाकिस्तान मध्ये 1960 ला सिंधू जल करारा वर हस्ताक्षर झाले होते. कराराच्या अनुसार भारताला रावी, व्यास आणि सतलज या तीन नद्याच्या पाण्याचा पूर्ण अधिकार भेटला. भारत सरकार च्या म्हणण्यानुसार रावी नदी चे पाणी माधोपूर हेडवर्क च्या माध्यमातून पाकिस्तान मध्ये बरबाद होत आहे. पाण्याची ही बरबादी थांबवण्यासाठी ‘शहापूर कडी बांध’ परियोजना ची कल्पना केली.

शहापूर कडी बांध विषयी समजण्यासाठी 1979च्या करारा विषयी समजणे आवश्यक आहे. जानेवारी 1979 मध्ये पंजाब आणि जम्मू काश्मीर यांच्यात एक द्विपक्षीय करार झाला. या करारा च्या अनुसार ‘रणजित सागर ‘ बांध आणि शहापूर कडी बांध चे निर्माण पंजाब सरकार द्वारा केले जाणार होते. रणजित सागर बांध ऑगस्ट 2000 मध्ये चालू केले होते. शहापूर कडी बांध परियोजनेला रावी नदी च्या रणजित सागर बांधाच्या 8किमी अपस्ट्रीम वर बनवायचे होते. योजना आयोगाने नोव्हेंबर 2001 ला या परियोजना मंजूर केल्या.

पाकिस्तान मध्ये अन्नाचे आणि पाण्याचे संकट येऊ शकते.

सिंधू नदीचे पाणी थांबवल्या नंतर पाकिस्तान मध्ये पाण्याचे संकट येऊ शकते पाकिस्तान ची 80%शेती या पाण्यावर अवलंबून आहे. पाणी थांबवल्यानंतर पाकिस्तान मध्ये अन्न आणि पाण्याचे संकट येऊ शकते. सिंधू नदीवर पाकिस्तान चे प्रमुख शहर कराची, लाहोर, मुलतान हे निर्भर आहेत. पाकिस्तान चे तरबेला आणि मंगला सारखे पॉवर प्रोजेक्ट या नदीवर निर्भर आहेत. आणि या मुळे नक्कीच पाकिस्तान चे कंबरडे मोडणार आहे.

sindhu jal karar

सिरियाई गृहयुद्ध ज्याने जग दोन भागात विभागले गेले होते. -भाग 1

मार्च 2011मध्ये सिरीयाच्या एका भागात लोकशाही मार्गाने विरोध प्रदर्शन सुरु झाले. प्रदर्शनाचे कारण होते असद सरकार बरखास्त करण्याची मागणी कारण असद सरकार हे सत्तावादी होते. आणि याची सुरवात 1971मध्य झाली जेव्हा ‘बशर अल असद ‘ चे वडील ‘हाफिज अल असद ‘ हे सिरियाचे राष्ट्रपती झाले.

हे प्रदर्शन दाबण्यासाठी सिरीयाई सरकार ने प्रदर्शनकारी लोकांसोबत हिंसा केली होती. ज्यामध्ये, पोलीस, सेना आणि अर्धसैनिक यांचा उपयोग केला होता.

नंतर हे प्रदर्शन गृहयुद्धात बदलून गेले. नोव्हेंबर 2024 च्या शेवटी सैन्य सहयोग समाप्त झाला.त्यामुळे सिरिया देशामधील विपक्ष आणखी मजबूत झाला. आणि असद सरकार हे कमजोर पडले. डिसेंबर च्या सुरवातीला ‘बशर अल असद ‘ देश सोडून पळून गेले आणि रशिया मध्ये त्यांनी आश्रय घेतला.

तर आज आपण पाहणार आहोत सिरिया देशातील गृह युद्ध आणि त्यामागील इतिहास.

सिरिया मध्ये विद्रोह

जानेवारी 2011मध्ये सिरियाचे राष्ट्रपती ‘बशर अल असद ‘यांना विचारले कि अरब जगतात जे सत्तावादी सरकार च्या विरोधात विरोध प्रदर्शन सुरु आहेत त्यामध्ये ‘ट्युनिशिया,’ आणि ‘मिस्र ‘या देशातील सत्तावादी सरकार संपले आहे आणि हे प्रदर्शन सिरिया पर्यंत पोहचेल का? तेव्हा असद यांनी सांगितले होते कि सिरिया मध्ये आर्थिक समस्या भरपूर आहेत. आणि ही समस्या सुधारण्यासाठी प्रगती खूप हळू आहे. पण त्यांना विश्वास होता कि सिरिया मध्ये असे कोणतेही प्रदर्शन होणार नाही कारण ते अमेरिका आणि इस्राईल चा विरोध करतात आणि ही मान्यता सिरीयन लोकांचीच आहे.

पण त्या नंतर काही आठवड्यातच सरकार विरोधात प्रदर्शन सुरु झाले. आणि त्यावेळी संपूर्ण जगाला समजले कि असद ने जे सांगितले त्या पेक्ष्या जास्त आर्थिक समस्या सिरिया मध्ये आहेत.

एकच घराणे सत्तेवर असल्यामुळे आर्थिक समस्या आणखी जास्त वाढतच गेली. जेव्हा ‘बशर अल असद’ यांनी पदभार सांभाळला तेव्हा वर्ष होते 2000 आणि ‘बशर अल असद ‘यांच्याकडे जनता सुधारक आधुनिकरन करणारा अश्या नजरेने बघत होती.

असं जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा जनतेमध्ये एक नवीन अशा निर्माण झाली होती पण ती काही पूर्ण झाली नाही पण पण त्या उलट असत ना त्यांच्या वडिलांसारखेच केले आणि असंच सरकार विरोधी जर कोणी जात असेल तर त्याला क्रूर मारल्या जात असे

सुरुवातीला असद अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फायदा जनतेला न मिळता देशातील पुंजीपतींना च भेटला . त्यामुळे सिरिया मध्ये आर्थिक असमानता जास्त प्रमाणात वाढू लागली.

सिरीयच्या विद्रोहामध्ये पर्यावरण संकटाची सुद्धा भूमिका होती. 2006ते 2010 पर्यंत सिरिया मध्ये दुष्काळ होता. त्यामुळे लाखो शेतकरी कर्जबाजारी होऊन गरिबी रेषेखाली गेले. त्यामुळे गावातील जनता शहरा कडे गेली. मार्च 2011 मध्ये सिरियाच्या दक्षिण भागात जिथे दुष्काळ पडला होता तिथे पहिले आणि मोठे विरोध प्रदर्शन झाले होते.

या विरोध प्रदर्शनामध्ये एक मुलांचा ग्रुप आला होता ते सुद्धा प्रदर्शन करत होते आणि असद विरोधी काही पोस्टर त्यांनाकडे होते. त्यानंतर तेथील पोलिसांनी त्या मुलांच्या ग्रुप ला अटक केली आणि त्यांना प्राताडित केले.

स्थानिक जनता राजनीतिक आणि आर्थिक सुधारणासाठी रस्त्यावर आले होते. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. प्रदर्शन करणार्यांना अटक झाली आणि त्यांच्यावर गोळीबार सुद्धा केला. त्यामुळे संपूर्ण सिरिया भर विरोध प्रदर्शन सुरु झाले आणि ते काही प्रमाणात हिंसक सुद्धा झाले होते. तेव्हा प्रदर्शनकारी लोकांवर गोळीबार केलेल्याचे video सुद्धा आले होते.

सुरवातीपासून सरकार आणि विद्रोही यांच्यात एक संप्रदायिक तेढ होते. या मध्ये प्रदर्शन करणारे सुन्नी होते आणि सत्ताधारी असद हे ‘आलावी ‘पंथाचे होते. असद घराणे हे सिरिया मध्ये आल्पसंख्यक होते.

सुरवातीला संप्रदायिक विभाजन जास्त प्रमाणात न्हवते. जसा जसा संघर्ष होत गेला तसें संप्रदायिक विभाजन होत गेले. पण सुरवातीपासूनच काही कट्टरपंथी सिरिया मध्ये ‘आलावी’ पंथीयांना मारत होते.

त्यानंतर विरोध प्रदर्शन जास्त प्रमाणात होत गेले आणि सरकार सुद्धा या विरोधात कठोर कारवाई करत होते.

असद सरकार ने ज्या शहरात जास्त प्रदर्शन होत होते ते संपूर्ण शहर घेरायला सुरवात केली. त्यावेळी काही प्रदर्शन कारणाऱ्या लोकांनी सरकार विरुद्ध हाथीयार उचलायला सुरवात केली. त्यानंतर असद सरकार ने सुद्धा मोठे पाऊल उचलायला सुरवात केली आणि जून महिन्यात सिरियाई सेना ‘टॅंक’ घेऊन ‘जिस्र अल शुगर ‘ नावाच्या शहरात गेली. तेव्हा भरपूर लोकांचे पलायन झाले आणि ते लोक तुर्की मध्ये गेले.

siriyan civil war

2011च्या उन्हाळ्यापर्यंत सिरिया देश्यातील विद्रोह बद्दल संपूर्ण जगाला कळाले. आणि त्या वेळेला जग सुद्धा दोन भागात विभागले गेले काही देश असद सरकार कडून होते तर काही देश विद्रोही लोकांना पाठिंबा देत होते. अमेरिका आणि युरोपीय संघ असद सरकार ची आलोचना करत होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा आणि काही युरोपीय राष्ट्रअध्यक्ष असद ला आपला पदभार सोडण्याचे सांगत होते. 2011च्या शेवटी कतर,तुर्की आणि सौदी अरब यांनी मिळून असद च्या विरोधात एक गट निर्माण केला. यामध्ये सिरिया देशाचे जुने मित्र इराण आणि रुस ने असद सरकार ला आपले समर्थन दिले.

siriya war