सिरियाई गृहयुद्ध ज्याने जग दोन भागात विभागले गेले होते. -भाग 2

आपण बघत आहोत सिरिया मधील गृह युद्ध भाग एक मध्ये काही भाग बघितला आता बघूया भाग 2

गृहयुद्ध

सिरियाई विद्रोह हा गृहयुद्धा मध्ये कधी बदलून गेला हे कोणालाच समजले नाही. जुलै महिन्यात सिरियाई सैन्या मधून काही विद्रोही पळून गेले होते आणि त्यांनी एक विद्रोह गट निर्माण केला त्याचे नाव होते ‘फ्री सिरीयन आर्मी ‘पण स्थानिक लोकांनी त्यांना मान्यता दिली नाही.

2011च्या शेवटी आणि 2012च्या सुरवातीला हा सत्तासंघर्ष थांबवण्यासाठी अंतरराष्ट्रीय संघटनानी भरपूर प्रयत्न केले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. नोव्हेंबर 2011च्या सुरवातीला काही सिरीयन अधिकाऱ्यांनी एका समझोत्यावर सहमती दाखवली. अरब लीग ने सांगितले सिरियाई सरकार प्रदर्शन कारी लोकांवर हिंसा करते ती थांबवावी, शहरा मधून सैनिक आणि त्यांचे टॅंक हटवावे, प्रदर्शनकारी जे अटक झाले होते त्यांना सोडावे. डिसेंबर 2011मध्ये डिसेंबर 2011मध्ये सिरिया सरकार ने अरब लीग च्या अधिकाऱ्यांना सिरिया मध्ये येऊन निरीक्षण करण्याची अनुमती दिली.

दुसरा करार, संयुक्त राष्ट्र महासचिव च्या मध्यस्थीने झाला. कोफी अन्नान च्या नेतृत्वात संयुक्त राष्ट्र आणि अरब लीग यांच्या द्वारा एका प्रयोजित संयुक्त राष्ट्र महासभा 75व्या सत्रात एक युद्ध विराम झाला. पण त्यानंतर लवकरच पुन्हा एकदा सिरिया मध्ये हिंसा सुरु झाल्या आणि सुरवाती पेक्ष्या जास्त प्रमाणात ह्या हिंसा होत्या. आणि त्यामुळे अरब लीग आणि सयुक्त राष्ट्राची टीम यांना वापस बोलावण्यात आले.प्रदर्शनकारी आणि सरकार यांच्यात शांती स्थापित करण्यात सफलता भेटली नाही.

त्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि अरब लीग ने या समाधानासाठी आंतरराष्ट्रीय संमेलन मध्ये जिनेवा विज्ञप्ती तयार केली. पण या साठी अमेरिका आणि रुस यावर सहमत न्हवते.कारण येणाऱ्या काळात सिरियाच्या सरकारात असद ला घ्यायचे का नाही हा विषय होता.

2012च्या सुरवातीला स्पष्ट झाले होते कि ऑगस्ट 2011मध्ये इस्ताबूल मध्ये गठीत विध्यार्थी समूह सिरिया राष्ट्रीय परिषद (snc)विपक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी खूप कमजोर आहे कारण त्यांच्यात अंतर्गत मतभेद होते.

त्यानंतर नोव्हेंबर मध्ये सिरियातील सर्व सरकार विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार विरोधात एक गटबंधन तयार केले ‘सिरिया क्रांतिकारी आणि विपक्षा साठी’ राष्ट्रीय गठबंधन तयार केले. आणि केवळ एका महिन्यात भरपूर देशानी यांना मान्यता दिली. 2012च्या उन्हाळ्यात विद्रोही लोकांना काही प्रमाणात सफलता मिळवता आली. सिरियाच्या सैनिकांना उत्तर आणि पूर्व च्या इलाख्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे विद्रोहीना पहिली वेळ एका महत्वपूर्ण जागेवर नियंत्रण करता आले.

जैले महिन्यात सिरियाचे सर्वात मोठे शहर अलेप्पो वरती हल्ला केला आणि शहराच्या पूर्व भागात नियंत्रण केले.

2013च्या सुरवातीला सिरीयन सैनिकांनी विद्रोहीना बरेच मागे ढकलले विद्रोहीनी उत्तरी भागात आपली पकड मजबूत बनवली. पण त्यांच्याकडे सैन्याच्या विरोधात लढण्यासाठी हात्त्यार कमी होते त्या मुळे ते कमजोर पडले आणि सिरीयन आर्मी सुद्धा इथे कमी पडत गेली.

जे क्षेत्र विवादित होते त्या क्षेत्रात लढाया जास्त प्रमाणात होत होत्या. त्यामुळे सामान्य माणूस सुद्धा त्या मध्ये नहाग मारल्या जात होता. आणि या सामान्य माणसाच्या मृत्यू चा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला होता.

ही लढाई कोणत्याही निर्णयाकडे जात न्हवती ना सरकार जिंकले होते ना विद्रोही त्या मुळे ज्यांच्या त्यांच्या अंतरराष्ट्रीय सहयोगिनी समर्थन वाढवायला सुरवात केली. टर्की, सौदी अरब आणि कतर हे देश विद्रोहीना हत्यार देत होते. अमेरिकन सरकार हत्यार देण्यासाठी घाबरत होते कारण त्यांना भीती होती कि शस्त्र आतंकवाद्याच्या आणि कट्टर पंथी लोकांच्या हाताला लागतील. 2012च्या शेवटी हिजबुल्ला संघटनाने सुद्धा सिरिया सरकार ला मदत दिली.

त्यानंतर सिरिया गृहयुधाच्या दिशेने वाटचाल करू लागला.

युद्धात रासायनिक हत्त्यार

21ऑगस्ट 2013ला दमिश्क शहराच्या भागात रासायनिक हाथीयारांचा हल्ला झाला आणि हजारो लोक मारल्या गेले त्यानंतर सिरिया मध्ये अंतरराष्ट्रीय सैन्य कारवाईसाठी आव्हान करण्यात आले.

सिरियाच्या विपक्ष दलानि सरकार वरती आरोप केले कि हे हल्ले सरकार समर्थीत लोकांनी केले पण असद सरकार ने साफ नकार दिला आणि विद्रोही लोकांना जिम्मेदार ठरविले.त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाच्या हाथीयार निरंक्षकांनी रासायनिक स्थळावर सबूत एकत्र केले आणि सिरीयन सरकार ची निंदा केली. अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांनी सांगितले होते ते असद सरकार च्या विरोधात कारवाई करण्या संबंधि विचार करत आहेत. त्यानंतर रुस, चीन आणि इराण यांनी सुद्धा असद सरकार ला उधड पणे पाठिंबा दिला. आणि पश्चिम देशा विरोधात लढण्याची ग्वाही दिली.

ऑगस्ट च्या शेवट पर्यंत अंतरराष्ट्रीय कारवाई होणार ही गोष्ट फिकी पडली. अमेरिका आणि इंग्लंड हे सिरियामध्ये सैन्य कारवाईच्या विरोधात होते. इंग्लंड संसदेत सिरिया मध्ये सैन्य कारवाई करण्या संबंधी मतदान झाले आणि विफल ठरले. अमेरिकी काँग्रेस मध्ये सुद्धा 10सप्टेंबर ला मतदान होणार होते पण ते स्थागित करण्यात आले. आणि त्याच वेळेला कुटनीती सर्वांच्या कामी आली. 14सप्टेंबर ला रुस सिरिया आणि अमेरिका यांच्या त एक करार झाला त्या नुसार सिरिया मधील संपूर्ण रासायनिक हत्यार आंतरराष्ट्रीय नियंत्रणात असतील असे ठरले या कराराला लागू केले 30जून 2014 साली आणि या कराराची समय सीमा पर्यंत सिरिया मधून रासायनिक हत्यार काढून घेण्यात आले.

नुसरा फ्रंट आणि isis चा उदय

2013साली इस्लामिक आतंकवाद्यानी महत्वाच्या जागी कब्जा करायला सुरवात केली. कारण तोपर्यंत विद्रोही सैनिक आणि सरकार यांच्यातील लढाईने त्यांचे सैनिक कमजोर झाले होते.

नुसरा फ्रंट (जबाहत अल नुसरा )सिरिया मध्ये सक्रिय असलेली संघटना अल कायदा सोबत मिळालेली होती. ही संघटना बाकीच्या आतंकवादी तुलनेत मोठी होती.

इकडे एप्रिल मध्ये isis चा ‘अबू बक्र अल बगदादी ‘ने घोषणा केली होती कि इराक मध्ये isis संघटना नुसरा फ्रंट सोबत मिळवेल. पण नुसरा फ्रंट आणि isis यांच्यात छोट्या मोठ्या लढाया होत राहिल्या. कारण isis ला सिरिया मध्ये आपले पाय रोवायचे होते. ज्याची सुरवात ‘अल रक्का ‘शहरातील ‘फरात’ घाटी पासून झाली आणि त्याचा विस्तार इराक सिरिया सीमा भागा पर्यंत झाला.

अंतराष्ट्रीय हस्तक्षेप आणि रुस चा प्रवेश

इराक मध्ये isis ची अचानक बढत झाली. ज्याच्या सोबत हिंसक आणि क्रूर प्रचाराची सुद्धा सुरवात झाली. त्यावेळी जागतिक पातळीवर isis विरोधात कारवाईची मागणी होत होती. त्यानंतर ही मागणी आणखी त्रिव होत गेली.

8ऑगस्ट ला अमेरिकेने isis ला उत्तरी इराक मध्ये रोकून धरले कारण समोर कुर्द क्षेत्र होते या भागात इसाई आणि यजदी समुदाय राहत होते. त्यामुळे अमेरिकेने isis वरती हवाई हल्ले सुरु केले. पण त्यानंतर isis च्या आतंकवाद्यानी काही क्रूर वीडियो पाठवायला सुरवात केली ज्यामध्ये पत्रकारांचे गळे कापले होते. 33डिसेंबर ला अमेरिका आणि अरब देश यांनी एक गठबंधन करून सिरिया मध्ये isis च्या ठिकाणावर हवाई हमले केले.

2015मध्ये रुस यामध्ये आणखी सक्रिय झाला.’लताकीया ‘मध्ये एका हवाई अड्डयावर रुसी सैनिकांना तैन्यात करण्यात आले.

सप्टेंबर मध्ये रुस ने पहिला हवाई हमला केला. रशियाच्या अधिकाऱ्यांनी दावा केला होता कि हवाई हमले isis ला निशाणा बनवत आहेत. पण त्यानंतर अमेरिकेने आरोप केला कि रशिया असद च्या विरोधात लढणाऱ्या विद्रोही लोकांवर हल्ले करत आहे. रुस ने सुद्धा अमेरिकेवर आरोप केला होता कि अमेरिका isis च्या ठिकाणावर हल्ला न करता सिरीयन आर्मी वर करत आहे.

सप्टेंबर 2016मध्ये रुस आणि सिरीययी सैनिक आणि पश्चिम समर्थीत विद्रोही मध्ये युद्ध विराम संपल्यानंतर रुस ने व सिरीयन सैनिकांनी विद्रोहीच्या कब्जात असलेले ‘अल्लेपो’ शहर आणि त्याचा पूर्वी हिस्सा वर आपले ध्यान केंद्रित केले. त्यानंतर रसियाने भरपूर हवाई हल्ले केले.

2016पर्यंत isis काही वर्ष उत्तरी सिरिया आणि पूर्वी सिरिया मध्ये अजेय होत होता. त्यानंतर कुर्द सैनिक, अमेरिकी सहयोगि, इराण रुस समर्थीत असद सैनिक यांच्यातील टाकरावणे isis कमजोर पडू लागला.

उत्तरेला कुर्द आणि तुर्की समर्थीत सैनिक यांनी तुर्की सीमा भागात आपली पकड मजबूत केली. त्यामुळे isis च्या हातून एक महत्वपूर्ण क्षेत्र गेले. आणि अमेरिकेने isis वरती हवाई हमले आणखी जास्त वाढवल्यामुळे isis खूप जास्त कमजोर झाले.

असद सरकार पडले

2024मध्ये एक नवीन विद्रोह झाला त्यावेळी असद सरकार ला आंतरराष्ट्रीय समर्थन जास्त मिळत न्हवते. रुस युक्रेन युद्धा मुळे रुस ची असद ला सहायत्ता खूप कमी होती. आणि इराण आणि इस्राईल यांच्यामध्ये तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळे असद ला इराण कडून सुद्धा जास्त समर्थन मिळत न्हवते. आक्टोबर मध्ये हिजबुल्हाने सुद्धा सिरिया मधून त्यांचे माणसं वापस बोलावले होते.

त्यानंतर hts एका आठवढ्यात ‘हामा’ पर्यंत आपला विस्तार करण्यात त्यांना यश मिळाले.त्यानंतर ‘दरारा आणि होम्स वरती 7डिसेंबर ला कब्जा केला. त्यानंतर विद्रोही सेना ‘दमिश्क’ शहरात आली आणि रातो रात त्यांनी ‘दमिश्क’शहरावर आपले नियंत्रण मिळवले. त्यावेळी त्यांना समजले कि असद हे देश सोडून पळून गेले होते. त्यानंतर सिरिया मध्ये नवीन सरकार चे गठन करण्यात आले आणि असद सरकार कायमचे कोसळले.असद यांनी रुस मध्ये राजकीय आश्रय घेतला आहे.

what is indus water treaty?काय आहे सिंधू जल करार? ज्याने पाकिस्तान चा थरकाप उडाला आहे.

भारताच्या जमिनीवर आणखी एकदा आतंकवादी हमला झाला. भारत सरकार ने आतंकवाद्याला समर्थन देणाऱ्या पाकिस्तान विरोधात मोठी कारवाई केली आहे.भारत सरकार ने सिंधू जल करार थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तान चे चांगलेच कंबरडे मोडणार आहे आणि या मुळे पाकिस्तान मध्ये अन्न, पाणी आणि ऊर्जा चे मोठे संकट उद्भवणार आहे.

दक्षिण काश्मीर च्या पहलगाम मध्ये पर्यटकावर आतंकवादी हल्ला झाल्यानंतर भारत सरकार सुरक्षा समितीची (CCS) बैठक झाली. या बैठकीत पाच मोठे निर्णय घेण्यात आले या मध्ये 1960झाली झालेल्या ‘सिंधू जल करार ‘ला थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

काश्मीर मध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्या नंतर पाकिस्तान च्या विरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे, असे बोलले जात आहे. सिंधू जल करारा मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये नेहमी वाद होत आला आहे. या मध्ये आपल्याला माहित असणे आवश्यकत आहे कि सिंधू जल करार काय आहे?

काय आहे सिंधू जल करार

भारत आणि पाकिस्तान मध्ये सिंधू जल करार हा 19सप्टेंबर 1960 ला कराची मध्ये झाला होता. हा करार सिंधू नदीच्या उपनद्या चे पाणी वापर साठी झाला होता. विश्व् बँक या करारासाठी भारत आणि पाकिस्तान मध्ये 9 वर्षा पासून बोलणी करत होते. भारता कडून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तान कडून राष्ट्रपती अयुब खान ने या करारावर स्वाक्षरी केली.

सिंधू करारा वर भारत सरकार पुन्हा एकदा विचार करत होते.

भारताने जानेवारी 2023 मध्ये पाकिस्तान ला सिंधू जल करारावर बदल करण्यासाठी एक नोटीस पाठवली होती यामध्ये भारताने झालेल्या करारावर आणखी सुधार करायची असे बोलले होते. त्या नंतर दीड वर्ष्याने सप्टेंबर 2024मध्ये भारत सरकार ने पुन्हा एकदा पाकिस्तान ला नोटीस पाठवली होती.

या मागचा भारत सरकार चा उद्देश होता कि मागील 64वर्ष्यापासून जो करार झाला होता तो रद्द करून नवीन करार करण्यात यावा. भारत पाकिस्तान सिंधू जल करारा मध्ये अनुच्छेद XII(3) नुसार दोघांच्या सहमतीने वेळो वेळी या करारा मध्ये सुधारणा करू शकतो. भारताने या अनुच्छेद चा वापर करून पाकिस्तान ला या करारा मध्ये बदल करण्यासाठी नोटीस पाठवली होती.

भारताने जम्मू काश्मीर मध्ये दोन जल विदयुत प्रकलपाचे काम चालू केले आहे. त्यामध्ये एक परियोजना बंदिपोरा जिल्ह्यातील झेलम नदीची उपनदि किशनगंगा नदीवर आहे. आणि दुसरा रतले हाईड्रॉइलेक्ट्रिक प्रकल्प किश्तवाड जिल्हातील चेनाब नदीवर आहे. दोन्ही प्रकल्प नदीच्या प्राकृतिक पद्धतीने वीज बनवू शकतात.

भारताचा उद्देश आहे कि या प्रोजेक्ट पासून क्रमश :330मेगावॅट आणि 850मेगावॅट ऊर्जा बनवण्याचे लक्ष आहे.

indus water

पाकिस्तान याचा विरोध करत आहे.

पाकिस्तान चा या प्रकल्पला लगातार विरोध होत आहे. पाकिस्तान चे म्हणणे आहे हे प्रकल्प म्हणजे सिंधू जल कराराचे उ्लंघन आहे. आणि भारत सरकार ने सुद्धा या विषयी बातचीत करण्यासाठी बोलले होते. या साठी नोटीस सुद्धा पाठवल्या होत्या.

शहापूर कडी बांध

सिंधू जल विभाजन साठी भारत आणि पाकिस्तान मध्ये 1960 ला सिंधू जल करारा वर हस्ताक्षर झाले होते. कराराच्या अनुसार भारताला रावी, व्यास आणि सतलज या तीन नद्याच्या पाण्याचा पूर्ण अधिकार भेटला. भारत सरकार च्या म्हणण्यानुसार रावी नदी चे पाणी माधोपूर हेडवर्क च्या माध्यमातून पाकिस्तान मध्ये बरबाद होत आहे. पाण्याची ही बरबादी थांबवण्यासाठी ‘शहापूर कडी बांध’ परियोजना ची कल्पना केली.

शहापूर कडी बांध विषयी समजण्यासाठी 1979च्या करारा विषयी समजणे आवश्यक आहे. जानेवारी 1979 मध्ये पंजाब आणि जम्मू काश्मीर यांच्यात एक द्विपक्षीय करार झाला. या करारा च्या अनुसार ‘रणजित सागर ‘ बांध आणि शहापूर कडी बांध चे निर्माण पंजाब सरकार द्वारा केले जाणार होते. रणजित सागर बांध ऑगस्ट 2000 मध्ये चालू केले होते. शहापूर कडी बांध परियोजनेला रावी नदी च्या रणजित सागर बांधाच्या 8किमी अपस्ट्रीम वर बनवायचे होते. योजना आयोगाने नोव्हेंबर 2001 ला या परियोजना मंजूर केल्या.

पाकिस्तान मध्ये अन्नाचे आणि पाण्याचे संकट येऊ शकते.

सिंधू नदीचे पाणी थांबवल्या नंतर पाकिस्तान मध्ये पाण्याचे संकट येऊ शकते पाकिस्तान ची 80%शेती या पाण्यावर अवलंबून आहे. पाणी थांबवल्यानंतर पाकिस्तान मध्ये अन्न आणि पाण्याचे संकट येऊ शकते. सिंधू नदीवर पाकिस्तान चे प्रमुख शहर कराची, लाहोर, मुलतान हे निर्भर आहेत. पाकिस्तान चे तरबेला आणि मंगला सारखे पॉवर प्रोजेक्ट या नदीवर निर्भर आहेत. आणि या मुळे नक्कीच पाकिस्तान चे कंबरडे मोडणार आहे.

sindhu jal karar

सिरियाई गृहयुद्ध ज्याने जग दोन भागात विभागले गेले होते. -भाग 1

मार्च 2011मध्ये सिरीयाच्या एका भागात लोकशाही मार्गाने विरोध प्रदर्शन सुरु झाले. प्रदर्शनाचे कारण होते असद सरकार बरखास्त करण्याची मागणी कारण असद सरकार हे सत्तावादी होते. आणि याची सुरवात 1971मध्य झाली जेव्हा ‘बशर अल असद ‘ चे वडील ‘हाफिज अल असद ‘ हे सिरियाचे राष्ट्रपती झाले.

हे प्रदर्शन दाबण्यासाठी सिरीयाई सरकार ने प्रदर्शनकारी लोकांसोबत हिंसा केली होती. ज्यामध्ये, पोलीस, सेना आणि अर्धसैनिक यांचा उपयोग केला होता.

नंतर हे प्रदर्शन गृहयुद्धात बदलून गेले. नोव्हेंबर 2024 च्या शेवटी सैन्य सहयोग समाप्त झाला.त्यामुळे सिरिया देशामधील विपक्ष आणखी मजबूत झाला. आणि असद सरकार हे कमजोर पडले. डिसेंबर च्या सुरवातीला ‘बशर अल असद ‘ देश सोडून पळून गेले आणि रशिया मध्ये त्यांनी आश्रय घेतला.

तर आज आपण पाहणार आहोत सिरिया देशातील गृह युद्ध आणि त्यामागील इतिहास.

सिरिया मध्ये विद्रोह

जानेवारी 2011मध्ये सिरियाचे राष्ट्रपती ‘बशर अल असद ‘यांना विचारले कि अरब जगतात जे सत्तावादी सरकार च्या विरोधात विरोध प्रदर्शन सुरु आहेत त्यामध्ये ‘ट्युनिशिया,’ आणि ‘मिस्र ‘या देशातील सत्तावादी सरकार संपले आहे आणि हे प्रदर्शन सिरिया पर्यंत पोहचेल का? तेव्हा असद यांनी सांगितले होते कि सिरिया मध्ये आर्थिक समस्या भरपूर आहेत. आणि ही समस्या सुधारण्यासाठी प्रगती खूप हळू आहे. पण त्यांना विश्वास होता कि सिरिया मध्ये असे कोणतेही प्रदर्शन होणार नाही कारण ते अमेरिका आणि इस्राईल चा विरोध करतात आणि ही मान्यता सिरीयन लोकांचीच आहे.

पण त्या नंतर काही आठवड्यातच सरकार विरोधात प्रदर्शन सुरु झाले. आणि त्यावेळी संपूर्ण जगाला समजले कि असद ने जे सांगितले त्या पेक्ष्या जास्त आर्थिक समस्या सिरिया मध्ये आहेत.

एकच घराणे सत्तेवर असल्यामुळे आर्थिक समस्या आणखी जास्त वाढतच गेली. जेव्हा ‘बशर अल असद’ यांनी पदभार सांभाळला तेव्हा वर्ष होते 2000 आणि ‘बशर अल असद ‘यांच्याकडे जनता सुधारक आधुनिकरन करणारा अश्या नजरेने बघत होती.

असं जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा जनतेमध्ये एक नवीन अशा निर्माण झाली होती पण ती काही पूर्ण झाली नाही पण पण त्या उलट असत ना त्यांच्या वडिलांसारखेच केले आणि असंच सरकार विरोधी जर कोणी जात असेल तर त्याला क्रूर मारल्या जात असे

सुरुवातीला असद अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फायदा जनतेला न मिळता देशातील पुंजीपतींना च भेटला . त्यामुळे सिरिया मध्ये आर्थिक असमानता जास्त प्रमाणात वाढू लागली.

सिरीयच्या विद्रोहामध्ये पर्यावरण संकटाची सुद्धा भूमिका होती. 2006ते 2010 पर्यंत सिरिया मध्ये दुष्काळ होता. त्यामुळे लाखो शेतकरी कर्जबाजारी होऊन गरिबी रेषेखाली गेले. त्यामुळे गावातील जनता शहरा कडे गेली. मार्च 2011 मध्ये सिरियाच्या दक्षिण भागात जिथे दुष्काळ पडला होता तिथे पहिले आणि मोठे विरोध प्रदर्शन झाले होते.

या विरोध प्रदर्शनामध्ये एक मुलांचा ग्रुप आला होता ते सुद्धा प्रदर्शन करत होते आणि असद विरोधी काही पोस्टर त्यांनाकडे होते. त्यानंतर तेथील पोलिसांनी त्या मुलांच्या ग्रुप ला अटक केली आणि त्यांना प्राताडित केले.

स्थानिक जनता राजनीतिक आणि आर्थिक सुधारणासाठी रस्त्यावर आले होते. तेव्हा तेथील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. प्रदर्शन करणार्यांना अटक झाली आणि त्यांच्यावर गोळीबार सुद्धा केला. त्यामुळे संपूर्ण सिरिया भर विरोध प्रदर्शन सुरु झाले आणि ते काही प्रमाणात हिंसक सुद्धा झाले होते. तेव्हा प्रदर्शनकारी लोकांवर गोळीबार केलेल्याचे video सुद्धा आले होते.

सुरवातीपासून सरकार आणि विद्रोही यांच्यात एक संप्रदायिक तेढ होते. या मध्ये प्रदर्शन करणारे सुन्नी होते आणि सत्ताधारी असद हे ‘आलावी ‘पंथाचे होते. असद घराणे हे सिरिया मध्ये आल्पसंख्यक होते.

सुरवातीला संप्रदायिक विभाजन जास्त प्रमाणात न्हवते. जसा जसा संघर्ष होत गेला तसें संप्रदायिक विभाजन होत गेले. पण सुरवातीपासूनच काही कट्टरपंथी सिरिया मध्ये ‘आलावी’ पंथीयांना मारत होते.

त्यानंतर विरोध प्रदर्शन जास्त प्रमाणात होत गेले आणि सरकार सुद्धा या विरोधात कठोर कारवाई करत होते.

असद सरकार ने ज्या शहरात जास्त प्रदर्शन होत होते ते संपूर्ण शहर घेरायला सुरवात केली. त्यावेळी काही प्रदर्शन कारणाऱ्या लोकांनी सरकार विरुद्ध हाथीयार उचलायला सुरवात केली. त्यानंतर असद सरकार ने सुद्धा मोठे पाऊल उचलायला सुरवात केली आणि जून महिन्यात सिरियाई सेना ‘टॅंक’ घेऊन ‘जिस्र अल शुगर ‘ नावाच्या शहरात गेली. तेव्हा भरपूर लोकांचे पलायन झाले आणि ते लोक तुर्की मध्ये गेले.

siriyan civil war

2011च्या उन्हाळ्यापर्यंत सिरिया देश्यातील विद्रोह बद्दल संपूर्ण जगाला कळाले. आणि त्या वेळेला जग सुद्धा दोन भागात विभागले गेले काही देश असद सरकार कडून होते तर काही देश विद्रोही लोकांना पाठिंबा देत होते. अमेरिका आणि युरोपीय संघ असद सरकार ची आलोचना करत होते. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती बराक ओबामा आणि काही युरोपीय राष्ट्रअध्यक्ष असद ला आपला पदभार सोडण्याचे सांगत होते. 2011च्या शेवटी कतर,तुर्की आणि सौदी अरब यांनी मिळून असद च्या विरोधात एक गट निर्माण केला. यामध्ये सिरिया देशाचे जुने मित्र इराण आणि रुस ने असद सरकार ला आपले समर्थन दिले.

siriya war

इराण परमाणू कार्यक्रम काय आहे? जाने अमेरिका आणि इस्राईल नेहमी सतर्क असतात.

इराण आणि जगातील सहा प्रमुख ताखती यांनी इराण परमाणू समझोता केला होता. त्या मध्ये अमेरिका सुद्धा होती पण वर्ष 2018मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा या समझोत्यातून अमेरिका बाहेर पडली.

त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण वरती पुन्हा आर्थिक प्रबधं लावले त्यामुळे इराण नाराज झाले. आणि इराण वरती सैन्य कारवाईची सुद्धा धमकी दिली.

तर इराण आणि अमेरिका, इस्राईल यांच्यात नेहमी वाद होत असतो त्या वादाचे मुख्य कारण आहे इराण परमाणू कार्यक्रम तर आज आपण बघणार आहोत इराण परमाणू कार्यक्रम विषयी या परमाणू कार्यक्रमा मुळे इस्राईल आणि अमेरिका नेहमी सतर्क असतात. या मध्ये इस्राएल च्या म्हणण्यानुसार जर इराण हा परमाणू संप्पन देश साला तर ते इसराईल च्या अस्तित्वासाठी खतरनाक आहे त्यामुळे नेहमी इस्राईल हा इराणच्या परमाणू कार्यक्रमा विरोधात असतो आणि त्या विरोधात कारवाई करत असतो. तर बघूया थोडक्यात काय आहे? इराण परमाणू कार्यक्रम ज्या मुळे इस्राईल आणि अमेरिका नेहमी सतर्क असतात.

इराण ला परमाणू बॉम्ब ठेवण्याची परवानगी का नाही?

इराण चे म्हणणे आहे त्यांचा परमाणू कार्यक्रम केवळ नागरी उद्देशासाठी आहे. इराण नेहमी सांगत असतो कि इराण परमाणू बॉम्ब विकसित करत नाही.पण संपूर्ण जगभरातील परमाणू कार्यक्रमावर नजर ठेवणारी संस्था ” आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा एजन्सी “(IAEA) इराण च्या या दाव्याला सहमत नाही.

वर्ष 2002 मध्ये जेव्हा इराण च्या गुप्त परमाणू ठिकाणाचा पत्ता लागला. तेव्हा पासून इराण हा येणाऱ्या काळात परमाणू बॉम्ब बनवेल असा संशय येत होता.

NPT नावाची अंतरराष्ट्रीय संस्था सैन्या साठी आणि बाकी गरजा साठी परमाणू तकनिक वापरण्याची अनुमती देते. यामध्ये शेती,ऊर्जा, चिकित्सा साठी अनुमती आहे. पण परमाणू बॉम्ब बनवण्याची कोणतीही परवानगी देत नाही.

वर्ष 2018 मध्ये जेव्हा अमेरिका JCPOA पासून दूर झाला तेव्हा पासून इराण ने अमेरिकेने लावलेल्या प्रतिबंधा विरुद्ध उ्लंघन करायला सुरवात केली.

इराण चा परमाणू बॉम्ब किती विकसित आहे?

इराण ने युरेनियम संवर्धणासाठी हजारो सेंट्रिंफ्युज मशीन विकसित केली आहे. आणि यावर सुद्धा JCPOA ने प्रतिबंध लावले होते.

परमाणू बॉम्ब साठी 90% शुद्ध युरेनियम ची आवश्यकता असते आणि JCPOA नुसार इराण ला केवळ 300किलो ग्राम युरेनियम ठेवण्याची आवश्यकता होती आणि एवढे युरेनियम बाकी कामासाठी पुरे आहे.

त्यानंतर IAEA च्या म्हणण्यानुसार 2025 पर्यंत इराण जवळ 275किलो ग्राम युरेनियम होते. ज्याला इराण ने 60%पर्यंत शुद्ध केले होते. आणि इराण ने या युरेनियम ला आणखी जास्त शुद्ध केले असते तर इराण ने नक्कीच परमाणू बॉम्ब विकाशित केला असता. काही अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इराण त्या युरेनियम ला केवळ एका आठवड्यात परमाणू बॉम्ब बनवण्याच्या प्रमाणात बदलू शकतो आणि काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्या नुसार इराण एक ते दीड वर्ष्यात परमाणू बॉम्ब बनवू शकतो.

अमेरिका इराण परामानु समाझोत्या मधून बाहेर का पडला?

संयुक्त राष्ट्र, अमेरिका आणि युरोप संघाने वर्ष 2010 मध्ये इराण वर आर्थिक प्रतिबंध लावले होते. कारण त्यांना संशय होता कि इराण परमाणू बॉम्ब बनवत आहे.

या आर्थिक प्रतिबंधमुळे इराण ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेल विकता येणार नव्हते आणि 100अरब डॉलर पेक्ष्या जास्त इराण ची विदेशी मुद्रा फ्रिज केली.

त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था दाबघाईला आली आणि इराणी चलन खूप प्रमाणात कोसळले.यामुळे देशात प्रमाणापेक्षा जास्त महागाई वाढली.

वर्ष 2015 मध्ये इराण आणि जगातील प्रमुख सहा देश ज्यामध्ये अमेरिका, चिन, फ्रान्स, रुस, जर्मनी, ब्रिटन हे देश JCPOA वरती सहमत होते. या मध्ये इराण परमाणू कार्यक्रमा संबंधी जे काही करण्याची अनुमती या वरील देशानी दिली होती त्या सोबत काही अटी सुद्धा होत्या. ज्यामध्ये इराण परमाणू ठिकाणाची चौकशी होईल. आणि त्या बदल्यात इराण वरती जी आर्थिक पाबंदी लावली होती त्याला हटवण्याची सुद्धा अनुमती दिली होती.

JCPOA 15 वर्ष्या करता होता. त्यानंतर इराण वरती लावलेले आर्थिक प्रतिबंध संपणार होते.

त्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्रपती पदावर डोनाल्ड ट्रम्प आले आणि 2018 साली त्यांनी JCPOA कायद्यापासून अमेरिकेला दूर केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हा सौदा एकदम बेकार होता.

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा निर्णय आल्यानंतर इस्राईल ने या निर्णयचे स्वागत केले होते कारण सुरवातीपासून इस्राईल या विरोधात होता.

इस्राईल च्या म्हणण्यानुसार इराण हा गुप्त पणे परमाणू बॉम्ब बनवत आहे. आणि इराण ला जे अरबो डॉलर्स दिले आहेत ते पैसे इराण आपली सैने ताकत वाढवण्यासाठी वापरत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली होती कि इराण सोबत वार्ता करण्यासाठी अमेरिका तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प नेहमी म्हणतं आले कि JCPOA पेक्ष्या चांगला सौदा करणार पण इराण ने या साठी नकार दिला होता.

अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा म्हणाले होते की इराण ने जर नवीन समझोता नाही केला तर इराणवर अमेरिका हल्ला करेल.

त्यानंतर इराणचे विदेश मंत्री “अब्बास आराघची ” यांनी सांगितले कि ते बातचीत करण्यासाठी तयार आहेत. पण अमेरिकेने कोणतीही सैने कारवाई करू नये आणि या साठी ते सहमत झाले पाहिजे.

इसराईल प्रधान मंत्री नेत्यांनाहू यांनी म्हटले आहे या मध्ये स्वीकार करण्यासारखे काहीच नाही फक्त एकच सौदा होईल तो म्हणजे इराण ने आपला परमाणू बॉम्ब बनवण्याचा कार्यक्रम बंद करावा.

नेत्यांनाहू हे सुद्धा म्हणाले होते कि जर इराण या साठी तयार नसेल तर आम्ही अमेरिकेच्या देखरेखी मध्ये इराण चे परमाणू ठिकाणे उडवून देऊ आणि जेवढे इराण कडे परमाणू उपकरण आहेत त्यांना सुद्धा नष्ट करू.

इराण ला सर्वात मोठी भीती ही आहे कि अमेरिका इराण वरती त्यांना जे वाटेल तो समझोता करेल आणि जागतिक राजकारणात अमेरिकेची कुटणिती जीत झाली हे सांगतील.

इकडे इसराईल चे म्हणणे आहे जर इराण कडे परमाणू बॉम्ब आला तर तो इसराईल च्या अस्तित्वासाठी खतरा आहे.

Israil hamas war history :इस्राईल हमास युद्धाचा इतिहास
इस्राईल हमास युद्धाचा इतिहास

Israil hamas war history :इस्राईल हमास युद्धाचा इतिहास

मध्य पूर्व म्हणजे युद्धाचे सर्वात मोठे क्षेत्र आहे मागील सात ते आठ दशका पासून ही जमीन युद्धाच्या आगीत जळते आहे. अरब आणि येहूदी लोकांचा हा संघर्ष काही नवा नाही हा संघर्ष मागील हजारो वर्षांपासून आहे.खरं तर आज ज्या जमिनी साठी अरब लढतायेत आणि संपूर्ण जगाला सांगण्याचा प्रयत्न करतात कि ही जमीन फक्त फिलिस्तींनी लोकांची आहे पण आपण थोडे मागे जर गेलो तर कदाचित तुम्हला सुद्धा कळेल कि ही जमीन खऱ्या अर्थाने तेथील येहूदी लोकांची आहे. मुस्लिम साम्राज्य जेव्हा मध्ये पूर्वेत सर्वीकडे आपले साम्राज्य सर्व दिशेला वाढवत होत तेव्हा त्यांनी आजच्या इस्राईल वरती सुद्धा कब्जा केला आणि तेथील येहूदी लोकांना त्यांच्याच जमिनीवरून हाकलून दिल.

आज इस्राईल झालेल्या अन्यायाच्या विरोधात लढतोय तर आज आपण बघू हमास आणि इस्राईल चा संघर्ष आणि त्या संघर्ष्याचा इतिहास.

Israel hamas war

19व्या शतकात ऑटोमन सम्राज्याच्या नकाशावर एक छोटा जमिनीचा हिस्सा होता. या भागात फक्त दोन शहर होते एक गजा आणि दुसरा खान युनूस.

त्या वेळी या भागात राहणारे काही अरब खेडे गावात सुद्धा राहत होते. हे गाव मिस्र आणि फिलिस्तीन ला जोडणाऱ्या रस्त्यावर होते.

गजा हे शहर समुद्राच्या किनाऱ्यावर होते. आपण त्या समुद्राला भूमध्य समुद्र म्हणून ओळखतो. पहिले महायुद्ध सुरु झाले तेव्हा तिथे अरब जास्त होती आणि येहूदी फक्त 6% होते त्यानंतर 1917 च्या सुमारास ऑटोमन साम्राज्य ऱ्हास झाले आणि तिथे ब्रिटिश साम्राज्य अस्तित्वात आले. आणि संपूर्ण गजा पट्टी ब्रिटिश सम्राज्याच्या आधीन झाली.

याच वेळेला बेलफोर्ड डिक्लिरेशन अस्तित्वात आले आणि हे डिक्लिरेशन आसा विचार होता कि या मुळे येहूदी लोकांमध्ये राष्ट्रवाद जन्माला आला. आणि याच जमिनिवर यहूदी लोकांसाठी देश स्थापन करण्याची चर्चा होऊ लागली.

1920ते 1940 च्या दशकात याच भागात यहूदी लोक येत होते.दुसऱ्या महायुद्धात हिटलर कडून यातना होत असताना या भागात येहुदी लोकसंख्या जास्त प्रमाणात पलायन करून येत होती.

1947 पर्यंत येहुदी लोकसंख्या या भागात 33%झाली आणि यानंतर अरब आणि येहूदी यांच्यात तणाव निर्माण होत होता आणि हा तणाव बऱ्याच वेळा हिंसक होत होता. काही अरबी लोक येहूदी लोकांच्या घरावर चालून जात असत आणि त्यांना मारहान करत असत. त्यांच्या घराला आग लावत असत. या मुळे येहूदी लोक खूप त्रस्त झाले होते आणि त्यांना आता हक्काचे घर पाहिजे होते.

यानंतर युनाटेडनेशन ने 1947साली फिलिस्तीन चे विभाजन केले आणि 55% जमीन येहूदी लोकांना दिली आणि 45%जमीन अरबी लोकांना दिली आणि या भागातील महत्वाचे शहर म्हणजे ‘येरुशा्लेम’ ला अंतराराष्ट्रीय शहर म्हणून घोषित केले.या निर्णयामुळे तेथील अरब लोक नाखुष होती.

इकडे दुसरे महायुद्ध संपले या मध्ये ब्रिटिश सम्राज्यचा सुद्धा ऱ्हास झाला आणि इंग्रजाना हा भाग सोडून द्यावा लागला. 1948 मध्ये येहूदी देश इस्राईल ची स्थापना झाली. आणि या नवीन झालेल्या देश्या विरुद्ध संपूर्ण अरब राष्ट्र एक झाले आणि इस्राईल विरुद्ध युद्ध सुरु केले.

या युद्धनंतर स्थानिक लोकांचा काहीच फायदा झाला नाही पण गजा पट्टी मिस्र देश्याच्या नियंत्रणात आली आणि ईस्ट जेरुसा्लेम जॉर्डन कडे गेल. आणि वेस्ट जेरूसलेम वरती इस्राईल चे नियंत्रण झाले.

1948च्या युद्धात गजापट्टी इस्राईल च्या हातात नाही आली पण त्यावेळचे इस्राईल कामंडर यीगाल अलोन म्हणतं होते या युद्धात इस्राईल ला जर फक्त दोन दिवस भेटले असते तर गजा आज इस्राईल च्या ताब्यात असते.

या युद्धात लाखो फिलस्तींनी लोकांचे विस्थापन झाले. या विस्थापनाला ‘नकाब’असे बोलले जाते. आणि या नंतर गजा मध्ये जागोजागी शरनार्थी दिसत होते. इस्राईल चे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन गरियन यांनी 1955 साली गजापट्टीवर कब्जा करण्याचा प्रस्थावं ठेवला त्या मागचा उद्देश होता तेथील शरनार्थी लोकांना लोकांना जॉर्डन मध्ये पाठवणे.

1967 साली पुन्हा एकदा इस्राईल आणि अरब युद्ध झाले त्याला ‘सिक्स दे वार ‘ म्हणून ओळखल्या जात. या युद्धा नंतर मध्य पूर्व चा नकाशा भरपूर प्रमाणात बदलून गेला. इस्राईल ने या युद्धात ईस्ट जेरूसलेम आणि वेस्ट बँक जिंकून घेतले. या नंतर या विषयी भरपूर राजकारण झाले. खरं तर या फिलस्तींनी लोकांना उसकावण्याचं काम बाकी अरब आणि मुस्लिम राष्ट्रानी केल. आणि हमास सारख्या आतंकवादी संघटना जन्माला घातल्या.

1987साली पहिला ‘इतिफादा ‘झाला. इतिफादा हा एक अरबी शब्द आहे याचा अर्थ ‘विद्रोह आंदोलन’ करणे आहे. आणि याचा उद्देश होता वेस्ट बँक आणि पूर्वी जेरूसलेम इस्राईल च्या कब्जातून वापस घेणे. याच वेळेस ‘शेख अहमद यासिन’ ने हमास ची स्थापना केली. हमास चे पूर्ण नाव ‘हरकत अल मुकम्मा अल इस्लामिया ‘म्हणजे ‘इस्लामिक रजिस्ट्स मुमेंट ‘

हमास या संघटनेला भरपूर देशानी आतंकवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. त्या मध्ये अमेरिका, ब्रिटन,इजराइल,जपान,ऑस्ट्रेलिया, इत्यादी.

2004पर्यंत 7000 हजार इस्राईली नागरिक गजा मध्ये राहत होते आणि या लोकांसाठी वीज, पाणी, अन्न आणि इस्राईली फौज तैनात होती. त्यानंतर 2004साली इस्राईल चे पंतप्रधान एरियल शेरोन यांनी म्हटले होते.आता वेळ आली आहे कि गजा मधून सर्व इस्राईली नागरिक काढावे लागतील. आणि त्यानंतर गजा मधून सर्व इस्राईली नागरिक आणि फौज बाहेर काढली त्यानंतर हळू हळू गजा मधून इस्राईल ची ताकत कमी होत गेली. पण फिलाडेफी कॅरिडोर मिश्र आणि गजा मधून जातो तिथे आज सुद्धा इस्राईली आर्मी आहे.

इस्राईल ने सांगितले होते आम्ही गजा मध्ये स्थाई बेस ठेवणार नाही पण एअर स्पेस इस्राईलचाच असेल आणि कोस्ट लाईन वरती इस्राईल ची नजर असेल.त्या वेळेस इस्राईल ने हे सुद्धा बोलले होते कि गजा ही इस्राईल ची अधिकृत जमीन नाही पण आम्ही गजा वर नजर ठेवणार.

इस्राईल आणि गजा भुराजनीती

इस्राईल मागील सात दशकापासून एक देश आहे त्याच्या पूर्वेला आणि दक्षिणेला जमिनीचे दोन भाग आहेत. याला फिलिस्तींनी टेरीटरीज म्हणतात. पूर्व दिशेला वेस्ट बँक, दक्षिण मध्ये गजा पट्टी (या भागाला जमिनीचे दोन भाग यासाठी म्हटले आहे कि यांना देशाचा दर्जा नाही. )

वेस्ट बँक वरती फिलिस्तीन आथॉरिटी म्हणजे PA सरकार चालवते. त्यामध्ये फतेह मुमेंट चा दबदबा आहे. पण वेस्ट बँक वरती त्यांचा दबदबा नाही. कारण तिथे इस्राईल चा दबदबा दिसून येतो.

दुसरी टेरीटरी आहे गजा पट्टी जवळपास 41किमी लांब एक जमिनीचा तुकडा आहे त्याची चौडाई 6ते 12 किमी आहे. त्याची पश्चिम सीमा भुमध्य समुद्राला मिळते आणि उत्तर पूर्व सीमा इस्राईल ला लागून आहे.

2007 पासून गजा पट्टी चा कंट्रोल हमास कडे आहे. या भुभागाविषयी थोडक्यात माहिती आपण बघितली आता आपण जाऊया 7आक्टोबर 2023 कडे. याच दिवशी हमास ने आणि काही फिलिस्तींनी गटांनी इस्राईल वर हमला केला. आतंकवादी इस्राईल च्या सीमा भागात आले आणि इस्राईल चे 1200 पेक्ष्या जास्त नागरिक मारले आणि 250पेक्ष्या जास्त लोकांना बंधक बनविले. त्यानंतर इस्राईल ने गजा विरुद्ध युद्ध सुरु केले.

हे युद्ध 15महिने चालू होते. 15महिन्याच्या युद्धनंतर 17जानेवारी 2025 ला तीन चारणात युद्ध विराम लागू करण्यासाठी इस्राईल आणि हमास तयार झाले. 19जानेवारीला पहिले चरण चालू साले ते 1मार्च पर्यंत संपले पण युद्ध समाप्त न्हवते झाले.

पर्ल हार्बर :जपान च्या या चुकीमुळे, हिरोशीमा आणि नागासाकी घडले

कारण हमास चे आतंकवादी इस्राईली बंधकांना सोडायला तयार न्हवते इस्राईली सरकार ने विनंती करूनही हमास चे आतंकवादी बंधकांना सोडायला तयार न्हवते. त्या मुळे इस्राईल सुद्धा म्हणतं होते जो पर्यंत युl हमास ला संपवणार नाही तोपर्यंत युद्ध थांबणार नाही.

साहजिकच या युद्धामुळे गजा मध्ये संपूर्ण जणजीवन विस्कळीत झाले आणि या युद्धा मुळे इस्राईल चे सुद्धा भरपूर नुकसान झाले. पण कदाचित हे युद्ध बंद होणारच नाही किंवा एक दिवस इस्राईल संपूर्ण गजावर आपले नियंत्रण आणेल.

Israil hamas war history :इस्राईल हमास युद्धाचा इतिहास

Israil hamas war history :इस्राईल हमास युद्धाचा इतिहास

israel hamas war

पर्ल हार्बर :जपान च्या या चुकीमुळे, हिरोशीमा आणि नागासाकी घडले

7डिसेंबर 1941 प्रशांत महासागराच्या एका द्विप समूहावर दोन घंटे अशी बॉम्ब भेक झाली कि दुसऱ्या महायुद्धचे वारे फिरले.

जपान च्या या चुकीमुळे अमेरिका दुसऱ्या महायुद्धात उतरली आणि दुसऱ्या महायुद्धाची रूपरेखा पूर्ण पणे बदलली.

त्यानंतर अमेरिकेने जपान च्या हिरोशीमा आणि नागासाकी शहरावर परमाणू हमला केला. आणि दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली.

चला तर आज आपण बघू जपान ने पर्ल हार्बर वरती केलेल्या हल्ल्याची थोडक्यात माहिती.

त्या दिवशी सकाळी सकाळी हवाई द्विप समूहावरील अमेरिकी नौसेनेच्या एका अड्डयावर जपान ने हमला केला. हा हमला एवढा मोठा होता कि पर्ल हार्बर वर तैनात असलेले अमेरिकेचे आठ जंगी जहाज नष्ट झाले. यामधून चार समुद्राच्या तळाशी गेले.

दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेवरती हा पहिला हमला होता या हमल्यापूर्वी अमेरिका दुसऱ्या महायुद्धा पासून दूर होती पण जपान ने केलेल्या आकस्मित हमल्या मुळे अमेरिका या महायुद्धात उतरली.

जपान च्या या हमल्या मध्ये 2400 पेक्ष्या जास्त अमेरिकी जवान मारल्या गेले आणि सर्व 19जहाज निकामी झाले. त्यामध्ये आठ जंगी जहाज होते. आणि 328अमेरिकी विमान सुद्धा नष्ट झाले.

एवढा सगळा विनाश करायला जपान ला एक घंटा पंधरा मिनिटापर्यंत बमबारी करावी लागली. या हमल्यात 100पेक्ष्या जास्त जपानी सैनिक सुद्धा मारले गेले. त्यानंतर अमेरिका सुद्धा मित्र राष्ट्राकडून या महायुद्धात उतरली.

7डिसेंबर 1941 च्या सकाळी पर्ल हार्बर वर जो हमला झाला ती केवळ एक घटना न्हवती तर तो जपान ने जाणीवपूर्वक केलेला हमला होता.

हा हमला अमेरिकेसाठी खूप आश्चर्यात टाकणारा होता. कारण त्याच वेळेला वॉशिंगटन मध्ये जपानी प्रतिनिधी अमेरिकेच्या विदेश मंत्र्या सोबत बातचीत करत होते. विषय होता जपान वरती अमेरिकेने लावलेले आर्थिक प्रतिबंध कमी करणे.

आणि त्याच वेळेला जपान ने अमेरिकेवर हमला केला. अमेरिकेने जपान वरती या साठी प्रतिबंध लावले होते कि जपान चीन मध्ये जास्त प्रमाणात हस्तक्षेप करत होता. त्यानंतर अमेरिकेने चीन ला सैन्य सहायत्ता देण्याचे ठरवले होते. याच कारणाने जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वरती हमला केला.

त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्र्पती फ्रँकलीन डी रुजवेल्ट ने सुद्धा जपान विरुद्ध युद्धाची घोषणा केली.

जपान अमेरिका संबंध

दुसरे महायुद्ध समाप्त झाल्यानंतर सुद्धा अमेरिका आणि जपान मध्ये संबंध बिघडलेले होते.

2016च्या मे महिन्यात तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती यांनी यांनी हिरोशीमा शहरला भेट दिली होती.

बराक ओबामा अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते ज्यांनी हिरोशीमा शहराला भेट दिली.

क्यूबा मिसाइल संकट :जेव्हा संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धच्या संकटात आले होते

आज रशिया आणि युक्रेन युद्ध चालू आहे या युद्धात अनेक लोक बेघर झाले भरपूर लोक या युद्धात मारले गेले. एकीकडे रुस आणि युक्रेन युद्ध चालू आहे तर दुसरी कडे पॅलेस्टिन आणि इस्राईल युद्ध चालू आहे. संपूर्ण जग या युद्धच्या काळ्या गर्द छायेत गेले आहे. अश्याच प्रकारे साठ वर्ष्यापूर्वी अमेरिका आणि सोवियत रुस मध्ये परमाणू युद्ध होण्याची शक्यता होती. पण ती घटना टाळाली गेली.

60वर्ष्यापुर्वी जग परमाणू युद्धच्या संकटात गेलं होत.

आणि या संकटाला ‘क्यूबा मिसाईल संकटा ‘च्या नावाने ओळखले जाते. क्यूबा मिसाईल संकटाची सुरवात 1962 मध्ये झाली होती.

14आक्टोबर ला अमेरिकन ‘टोही’ विमानाने बघितले कि अमेरिकेच्या फक्त काही किमी दूर अंतरावर क्यूबा मध्ये सोवियत संघाने परमाणू मिसाईल तैनात केली होती.

तेव्हा अमेरिकेला येणारा खतरा समजला त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती यांना सोवियत संघा कडे शांततेचा प्रस्ताव पाठवावा लागला.

रुस ने बदला घेतला

क्यूबा एक लहान द्विपीय कम्युनिस्ट देश ज्याची अमेरिकेसोबत दुस्मनी होती. कारण क्यूबा हा देश कम्युनिस्ट असल्या कारणाने अमेरिकेचा वैचारिक विरोधी होता. आणि अमेरिकेने सुद्धा क्यूबा देश्याच्या राजकारणात हस्तक्षेप केला होता. क्यूबा हा अमेरिकेचा शेजारी देश आहे.

सोवियत संघाने सुद्धा क्यूबा देशाचा वापर आपल्याच फायद्या साठी केला होता. कारण सोवियत संघाला सुद्धा अमेरिकेच्या शेजारी आपल्या विचाराचा देश पाहिजे होता. म्हणजे त्या देश्याच्या आडून अमेरिकेत लक्ष ठेवता येत होते.

1962मध्ये शीत युद्ध हे चरम वरती होती. आणि त्याच वेळेला रुस ने अमेरिकेच्या जवळ क्यूबा मध्ये परमाणू मिसाईल ठेवायला सुरवात केली.

पण ही रुस ची एकतरफा कारवाई न्हवती. अमेरिकेने सुद्धा ब्रिटन, तुर्की आणि इटली मध्ये 100पेक्ष्या जास्त परमाणू मिसाइल ठेवल्या होत्या.

आणि रुस ने सुद्धा क्यूबा मध्ये मिसाईल ठेऊन बदला घेतला होता.

ह्या मिसाईल जिथे ठेवल्या होत्या तेथून फ्लो्रीडा तट फक्त 150km दूर होता.

शीत युद्धा मध्ये क्यूबा मिसाईल संकट एक तणावपूर्ण घटना होती. आणि कोणत्याही क्षणात युद्धाची ठिणगी पडली असती.

14आक्टोबर ला अमेरिकेच्या एका जासूसी विमानाने क्यूबा मध्ये जाऊन 928 फोटो घेतले. त्या मध्ये रुसी परमाणू मिसाईल दिसल्या होत्या.

युद्ध टळले

अमेरिकेचे राष्ट्रपती जॉन एफ कॅनडी ने क्यूबा ची नौसैनिक नाकाबंदी सुरु केली होती. त्याच्या मागचा उद्देश होता रुसी मिसाइल जी क्यूबा मध्ये रुस आणत होते त्याला अडवणे.

28आक्टोबर ला अमेरिकी राष्ट्रपती ने सोवियत संघाला एक संदेश पाठवला आणि येणारे संकट टळले.

सोवियत संघांचे नेता निकिता खुर्चेव्ह यांनी क्यूबा मधून मिसाइल हटवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी अमेरिकाकडे दोन शर्ते ठेवली एक तर अमेरिका क्यूबा वरती हल्ला करणार नाही आणि दुसरी म्हणजे तुर्की देश्यातील मिसाईल काढून घेणे.

Cuban Missile Crisis

OPERATION THUNDERBOLT :ऑपेरेशन थंडरबोल्ड मोसाद ने युगांडा देशातून इस्राईली नागरिकांना सोडवले :भाग 2

त्या नंतर एका दुसऱ्या ऑपेरेशन विषयी चर्चा झाली. त्या ऑपेरेशन चे नाव होते ऑपेरेशन थंडरबोल्ट आणि सर्वच्या सहमतीने हे ऑपरेशन सुरु झाले.

इस्राईली सुरक्षाबल बंधकांना सोडवण्यासाठी काही मार्गांचा शोध घेत होती पण त्यांना कोणत्याही प्रकारे मार्ग सापडत न्हवता.

मोसाद ला एका नकाशा विषयी माहिती मिळाली तो नकाशा होता. त्याच बिल्डिंग चा ज्या मध्ये आतंकवाद्यांनी बंधकांना ठेवले होते.

त्यानंतर मोसाद ने रेस्क्यू ऑपरेशन ची योजना बनवली.

मोसाद ने त्या लोकांसोबत चर्चा केली जे आतंकवाद्यानी सोडून दिले होते. त्यानंतर मोसाद ला समजले कि आतंकवादी किती आहेत आणि त्यांच्याकडे कोण कोणती शस्त्रे आहेत.

ही सर्व माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ठरवले कि एक सैन्य तुकडी जाईल आणि रेस्क्यू ऑपेरेशन करून वापस येईल.

या कामासाठी इसराईल सेने ची सर्वात महत्वाची कामंडो युनिट ‘सेयेरेट मटकल’ ही जाईल.या युनिट ला लीड करत होते ‘योनातन नेत्यांनाहू’

इस्राईल चे पंतप्रधान :बेलज्यामिन नेत्यांनाहू ‘हे योनातन नेत्यांनाहू चे लहान भाऊ आहेत.

इकडे आतंकवाद्यांनी धमकी दिली होती कि त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर 1जुलै पासून बंधकांना मारायला सुरवात करतील.

इसराईल सरकार 30जून ला आतंकवाद्या सोबत बोलणी करण्यासाठी तयार झाले. आणि या मुळे इस्राईल सैनिकांना आणखी तीन दिवसाचा वेळ मिळाला.

त्यानंतर वेळ होती ऑपेरेशन ची पण सर्वात मोठा अडथळा होता युगंडा आणि इसराईल मध्ये साढे चार हजार किमी चे अंतर होते. विमानाला जाऊन वापस येणे हे शक्यच न्हव्हते.

इस्राईल कडे हवे मध्ये रिफ्युलिंग करण्याची क्षमता न्हवती त्यासाठी कोण्यातरी देशाची मदत घेणे आवश्यक होते. त्या देश्यामध्ये जाऊन रिफ्युलिंग करता आले असते.आणि या साठी केनिया देश तयार झाला.

त्यानंतर केनिया मधून एक विमान पाठवून एतांबे विमानतळाचे काही फोटो घेतले त्यामुळे इसराईल कमांडोना अंदाज आला कि विमानतळ कसे आहे आणि युगांडा सैनिकांनी पोजिशन काय आहे.

त्यानंतर इसराईल कमांडो साठी एक चांगली घटना घडली. राष्ट्रपती इदी अमीन हा 3 जुलै ला देशाबाहेर गेला होता.

दुपारी 1वाजून 20 मिनिटे झाली होती. दोन लॉकहिड C-130 हरक्युलीज विमान युगांडा देश्याच्या दिशेने निघाले होते.

या मध्ये 200कमांडो एक ‘काळी मर्सडीज ‘आणि दोन लँड रोवर गाड्या होत्या. एक तिसरे विमान सुद्धा होते ते बांधकासाठी होते. त्यांच्या मागून दोन ‘बोईंग 707’ होते जे फक्त 40फूट उंचावून उडत होते.

प्रत्येक विमानाचे एक काम होते. बोईंग 707 केनिया मध्ये उतरले होते. त्या मध्ये डॉक्टर होते. दुसरे बोईंग हे’ कमांड पोस्ट ‘साठी होते.

मोसाद ला मिळालेल्या माहिती नुसार इदी अमीन हा एक ‘काळी मर्सडीज ‘वापरत होता. आणि त्याच्या गार्ड साठी लँड रोवर होत्या.

त्यांची योजना अश्या प्रकारे होती कि कमांडोचा एक ग्रुप मर्सडीज मध्ये बसून टर्मिनल कडे जाईल म्हणजे विमान तळावर जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना असे वाटेल कि इदी अमीन आला आहे. आणि अश्या प्रकारे कामंडो तिथे पोहचणार होते जिथे बंधक आहेत.

‘एतांबे विमानतळावर ’11 वाजता पहिले ‘हरक्युलीज विमान ‘ उतरले आणि त्याचे दरवाजे पहिलंच उघडलेले होते. कारण कमांडो आणि आतमधील मर्सडीज आणि लँड रोवर गाड्या लवकर बाहेर याव्यात.

काळ्या मर्सडीज मध्ये बसून युनिट जुन्या टर्मिनल कडे रवाना झाली. एक युनिट रणवे वरती होती आणि तिसरी युनिट खाली विमानाच्या सुरक्षेसाठी होती.ज्या मध्ये बंधकांना घ्यायचे होते.

चौथी युनिट होती एतांबे विमानतळावर. जेवढे युगंडाचे विमान होते त्यांना नष्ट करायचे काम या चौथ्या युनिट कडे होते. या मिशन साठी केवळ एका तासाचा वेळ दिला होता त्यामुळे एकाच तसाच मिशन पूर्ण करायचे होते.

ऑपेरेशन थंडरबोल्ट

योनातन नेत्यांनाहू यांची युनिट मर्सडीज आणि लँड रोवर मध्ये निघाली. पण सुरवातीलाच त्यांना एक मोठा अर्थळा निर्माण झाला. त्यांना असे वाटले कि विमान तळावरील गार्ड असे समजतील कि हा राष्ट्रपती इदी अमीन चा काफीला आहे. पण युगांडा सुरक्षा राक्षकांनी त्यांना थांबिवले.

मोसाद कडून एक चूक झाली होती त्यांना माहित न्हवते कि इदी अमीन ने काही दिवसापूर्वी आपली गाडी बदलली आणि आता काळी गाडी नसून पांढरी गाडी आहे.

नेत्यांनाहू यांच्याकडे वेळ खूप कमी होता त्या मुळे त्यांनी त्या गार्ड वरती गोळीबारी करण्याचा आदेश दिला. गोळीबारीच्या आवाजाने विमानतळावरील गार्ड सतर्क झाले. त्यामुळे इसरायली कमांडोना हे काम लवकर उरकायचे होते.

कामंडो टर्मिनल कडे गेले आणि त्यांनी मेगाफोन मधून “हिब्रू भाषेत “एक घोषणा केली.”सर्व जण खाली बसा. आम्ही इसराईली कामंडो आहोत ” आणि त्यानंतर कमांडोनी अंधाधून गोळीबारीला सुरवात केली या मध्ये काही आतंकवादी मारले गेले पण ‘या मैमुनी ‘नावाचा एक मुलगा ज्याला हिब्रू भाषा समजत नसल्या करणानाने मारला गेला. आणखी दोन बंधक सुद्धा मारले गेले.

इसराईल कामंडोनी खूप चपळाईने हे ऑपरेशन पूर्ण केले. सर्व आतंकवाद्याना त्यांनी मारले. पण तोपर्यंत युगांडा सैनिकांनी सुद्धा गोळीबारी सुरु केली या गोळीबारीत युगांडा चे 45सैनिक मारले गेले.

या नंतर कमांडोनी सर्व बंधकांना विमानात बसवले आणि आणि विमानाने उड्डाणं भरली. एका युनिट ने विमानतळावरील युगांडाच्या सर्व विमानाना नष्ट केले. त्यानंतर सर्व कामंडो विमानात बसले आणि इसराईल च्या दिशेने गेले.

या ऑपेरेशन मध्ये इसराईल चे एक कमांडो मारल्या गेले योनातन नेत्यांनाहू. यामुळे इसराईल मध्ये या ऑपेरेशन ला योनातन ऑपेरेशन सुद्धा म्हणतात.

OPERATION THUNDERBOLT

OPERATION THUNDERBOLT :ऑपेरेशन थंडरबोल्ड मोसाद ने युगांडा देशातून इस्राईली नागरिकांना सोडवले:भाग 1

इस्राईल च्या मोसाद विषयी सर्वांनाच माहित आहे.इस्राईल ची मोसाद अशी आहे ती आपल्या शत्रूला जगाच्या कोणत्याही देश्यात जाऊन संपवते.

अश्याच एका मोसाद च्या एका ऑपेरेशन ची कहाणी ज्याने संपूर्ण जग अचंबित झाले. स्थान होते यूंगाडा देश आणि काही आतंकवाद्यांनी एक विमान हैजाक केले. त्यामध्ये 90 इस्राईली नागरिक होते

आतंकवाद्यांना या नागरिकांच्या बदल्यात इस्राईल कडे जे आतंकवादी होते ते मागितले होते.

तर बघूया ऑपेरेशन थंडरबोल्ड.

विमान आतंकवाद्याच्या ताब्यात

तारीख होती 27जून 1976 रविवार चा दिवस होता. इस्राईल ची राजधानी तेल अविव च्या ‘बेन गरियन ‘ आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक विमान पॅरिस ला जाण्यासाठी निघाले.

पण मधात ग्रीस ची राजधानी ‘एथेन्स ‘ मध्ये उतरले. जेव्हा एथेन्स मधून विमान निघाले तेव्हा विमानात एक मोठी गडबड झाली. विमानाचे पायलट यांनी एक मोठा आवाज एकाला. त्यांनी एका इंजिनिअर ला आवाजाच्या च्या दिशेने पाठवले. इंजिनिअर ने जेव्हा कॉकपीट चा दरवाजा उघडला तेव्हा समोर एक वेक्ती होती. त्या वेक्ती कडे बघून त्या इंजिनिअर साहेबाचा पार थरकाप उडाला कारण त्या वेक्ती च्या हातात एक रिवाल्वर आणि दुसऱ्या हातात एक हाता बॉम्ब होता.

त्या आतंकी सोबत एक महिला सुद्धा होती. दोघे जण कॉकपीट च्या आत मध्ये घुसले आणि विमान आपल्या ताब्यात घेतले.

त्यांनी विमान लिबि्याकडे वळवण्याचे सांगितले. विमान दिशा बदलून दुसरीकडे जात होते पण नेमके कोठे जाणार हे कोणालाच माहित नव्हते.

काही तासानंतर विमान एका एअरपोर्ट वरती उतरले. जेव्हा विमान उतरले आणि विमानाचा दरवाजा उघडला तेव्हा त्या दरवाज्यातून एक भला मोठा एक वेक्ती विमानाच्या आत मध्ये आला.

जेव्हा ती वेक्ती विमानात आली तेव्हा काही प्रवाश्यांच्या लक्ष्यात आले कि विमान हे युगांडा देशात आहे. कारण विमानात येणारी ती वेक्ती दुसरी कोणी नसून युगांडा देशाचा सनकी राष्ट्रपती यदी अमीन होता.

इदी अमीन ने लोकांना सांगितले आम्ही तुम्हाला सोडण्याव साठी सर्व प्रयन्त करू.

OPERATION THUNDERBOLT

पण प्रवश्यापुढे प्रश्न हा होता कि विमान हाईजाक कोणी केले? तर विमान हाईजाक केले होते जर्मनी ची आतंकी संघटना (RZ)’रिवोल्युशनरी सेल्स’ आणि दुसरी आतंकी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ फिलिस्तिन ‘या दोन आतंकी संघटनानी मिळून हे विमान हाईजाक केले होते.

त्यांचा उद्देश होता त्यांचे 51माणसे सोडवने ज्यामधून 40इस्राईल च्या ताब्यात होते. हाईजाक झालेले विमान युगांडा देश्याच्या ‘एतांबे ‘विमान तळावर उतरले होते.

इकडे इस्राईल सरकार परेशान झाले होते. आणि इस्राईल च्या पॉलिसी नुसार ते आतंकवाद्या सोबत बातचीत करू शकत न्हवते. पण या वेळेला परिस्तिथी खूप वेगळी होती. विमाना मध्ये जवळपास 90 इस्राईली नागरिक होते.

त्या हॉस्टेज झालेल्या लोकांच्या परिवाराचा सरकार वरती दबाव वाढत होता. कारण त्यांना कोणत्याही परिस्तिथीत आपले लोक जिवंत पाहिजे होते. त्यामुळे सरकार ला आतंकवाद्या सोबत बोलणे करावेच लागले.

इस्राईल कडे दोन दिवसाचा वेळ होता कारण आतंकवाद्यानी धमकी दिली होती दोन दिवसात जर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर ते लोकांना मारायला सुरवात करतील.

या दोन दिवसात आतंकवाद्यानी आणखी एक काम केले. इस्राईली नागरिकांना बाकीच्या लोकांपासून वेगळे केले. आणि जे इस्राईली न्हवते त्यांना सोडून दिले.

इस्राईल सरकार त्यांच्या वरती आरोप करत होते कि ते फक्त यहूदी लोकांना टार्गेट करत आहेत. आणि ते काही अंशी खरे सुद्धा होते.

पण इकडे जनतेचा सरकार वरती दबाव जरा जास्तच वाढत होता. त्याच वेळेला इस्राईल सेना ने एक आपत्कालीन मिटिंग बोलावली आणि रेस्क्यू ओपॅरेशन विषयी चर्चा केली.

पण इस्राईल पसून युगांडा देश साडे चार हजार किमी दूर आहे. आणि इतक्या दूर ऑपेरेशन करणे सोपे न्हवते आणि शक्यही न्हवते. आनि महत्वाचे म्हणजे विमान कोणत्या ठिकाणी आहे हे इस्राईल च्या सेनेला माहित सुद्धा न्हवते.

मोसाद ची योजना

खूप विचार केल्या नंतर एका ऑपेरेशन विषयी ठरले. ऑपेरेशन ची योजना अश्या प्रकारे होती कि इस्राईली कमांडोना युगांडा च्या ‘विक्टोरिया झील ‘ मध्ये ड्रॉप करायचे आणि यानंतर नेव्ही कमांडो आतंकवाद्याना मारतील.

पण त्यामध्ये प्रश्न असा उपस्तित होता कि इसराईल च्या नागरिकांना वापस कसे आणायचे? कारण युगांडा चा राष्ट्रपती इदी अमीन हा उघड पणे आतंकवाद्या सोबत होता.

त्यासाठी इस्राईल ने इदी अमीन ला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मिश्र देशाचे राष्ट्रपती अन्वर साधात ने इदी अमीन सोबत बोलणे केले. इतकंच काय पण यासर आराफत त्याकाळी फिलिस्तिन चे सर्वात मोठे नेते होते त्यांनी सुद्धा इदी अमीन ला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कोणाचे ही ऐकले नाही.

इस्राईल ने इदी अमीन ला एक प्रस्थावं सुद्धा दिला कि इदी अमीन ने इस्राईल ला मदत केली तर त्याला शांत तेचा नोबेल दिला जाईल. पण इदी अमीन ने सर्व प्रस्ताव पायदळी तुडवले.

इदी अमीन च्या मदती शिवाय हे ऑपेरेशन शक्य न्हवते म्हणून हे ओपॅरेशन रद्द केले.

या पुढची माहिती आपण भाग 2मध्ये बघू

OPERATION THUNDERBOLT

Operation RED DAWN: ऑपरेशन रेड डॉन ज्याने सद्दाम हुसेन ला पकडले

नमस्कार मित्रानो मी अविनाश मी आपल्याला geopolitics मध्ये घडलेल्या महत्वपूर्ण घटना विषयी सांगत असतो.

आज आपण बघणार आहोत इराक या देशाचा तानाशहा सद्दाम हुसेन याला पकडण्याची संपूर्ण कहाणी.

सद्दाम हुसेन याला एका मिशन द्वारे पकडेल त्या मिशन चे नाव होते ऑपेरेशन रेड डॉन.

30मार्च 2003 ला गठबंधन सैनिकांनी सद्दाम हुसेन ला सत्तेपासून बाजूला केले आणि इराकि लोकांना सद्दाम हुसेन च्या जाचापासून वाचवले.

दोन ते तीन आठवड्यामध्ये अमेरिकी जवानांनी इराकची राजधानी बगदाद आपल्या ताब्यात घेतले. पण सद्दाम हुसेन राजधानी बगदाद सोडून पळून गेला.

त्यानंतर इराक च्या सत्तेवर कोणीही न्हवते त्या मुळे सत्तेवर राष्ट्रपती असणे आवश्यक होते आणि ह्यासाठी अपदस्त राष्ट्रपती राष्ट्रपती ठरवण्यासाठी अमेरिकेचे नऊ महिने गेले.

हुसेन यांच्या सत्ते नंतर 4th इन्फेन्ट्री डिव्हिजन ने हुसेन यांचे राहते घर आणि आसपास त्यांची प्रॉपर्टी वरती छापा टाकला.

2003 च्या उन्हाळ्यात अमेरिकी सेना ने गुप्त एजेंट आणि दुभाषिक, HUMINT टीम यांना तैनात केले.

या लोकांनी स्थानिक लोकांची पूछताछ केली आणि सद्दाम हुसेन यांच्या परिवाराची माहिती काढली..

सुरावतीला त्या लोकांचा शोध घेण्याचे ठरवले ज्या लोकांचे नाव “ब्लॅक लिस्ट “मध्ये होते किंवा मोस्ट वांटेड “डेक ऑफ कार्ड्स ” मध्ये होते. त्यांनी सुरवातीला हुसेन चे राष्ट्रपती सचिव आणि काही इराकी नेत्यांना पकडले.

जेव्हा अमेरिकी या लोकांना पकडत होते तेव्हा दूरदूर पर्यंत सद्दाम हुसेन चा पत्ता न्हवता.

तेव्हा त्यांच्या लक्ष्यात आले कि सद्दाम ला पकडण्यासाठी त्यांचे राजकीय सहकारी काहीच कामाचे नाहीत.

त्याउलट सद्दाम हुसेन यांचे वेक्तिगत संबध ज्यांच्या सोबत आहेत त्यांनाच पकडावे लागेल.

4th इन्फ्रेन्ट्री डिव्हिजन, 1st ब्रिगेड चे गुप्त एजेंटांनी हुसेन यांच्या जवळ असलेले परिवार यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांची विचारणा करण्यासाठी एक ‘तीन स्तरीय ‘ रनणिती नेमली.

त्यांनी सद्दाम हुसेन यांच्या जवळच्या परिवारा सोबत व्यक्तिगत संबंध वाढवले. त्यांची विचारणा केल्यानंतर सद्दाम हुसेन विषयी भरपूर माहिती समोर आली.

वेगवेगळ्या स्रोता मधून जी माहिती समोर आली त्यानुसार गुप्त कर्मचाऱ्यांनी अल -मुसलीत नावाच्या बंधुवर लक्ष केंद्रित केले. हे भाऊ म्हणजे हुसेन यांच्या अंग रक्षकापैकी एक होते.

मुसलीत परिवार हा हुसेन यांचा सर्वात विश्वासू आणि जवळचा परिवार होता. कारण त्यांनीच हुसेन यांचे अगरक्षक ठरवले होते आणि ठरवत होते.

11आक्टोबर ला अल मुसलीत च्या सर्वात लहान भावाला पकडले.आणि त्याला 4th id मध्ये नेण्यात आले त्याची विचारणा करताना इब्राहिम अल मुसलीत चा ड्राइवर आणि त्याचा जवळचा मित्र बसीम लतीफ विषयी माहिती मिळाली.

बसीम लतीफ कडून जी माहिती मिळाली ती माहिती खूप महत्वाची होती कारण त्यानंतर हुसेन कोठे आहे याचे धागे दोरे मिळायला सुरवात झाली.

लतीफ याला पुन्हा एकदा पूछताछ करण्यासाठी बोलावले,त्याने यावेळी इब्राहिम अल मुसलीत चा पत्ता सांगितला.

लतीफ याची चौकशी झाल्या नंतर समोरचा घटनाक्रम खूप वेगाने होत होता.

13डिसेंबर ला सकाळी सकाळी टास्क फोर्स 121ने लतीफ द्वारा जे स्थान सांगितले त्या सर्व जागेवर छापे मारले आणि इब्राहिम अल मुसलीत ला पकडले.

इब्राहिम ची जेव्हा चौकशी झाली तेव्हा त्याने सांगितले सद्दाम हुसेन तकरिक च्या दक्षिण भागात ‘एड डावर ‘पाशी एका एका शेतात लपला आहे.

त्यानंतर सायंकाळी सहा च्या सुमारात operation रेड डॉन च्या साहाय्याने ब्रिगेड 1,टास्क फोर्स 121,ने टीगारस नदी पासी दोन फार्महाउस वरती छापा मारला पण त्यांना हुसेन सापडला नाही.

त्यानंतर MUMINT ने तो जिथे लपला आहे त्याचा शोध लावला. त्यानंतर 121फोर्स ने ज्या जागी लपला होता त्या जागी जाऊन पकडले.

हुसेन जमिनीखाली एका गड्ड्यात लपला होता जेव्हा टीम तिथे गेली तेव्हा त्या गड्ड्यात सद्दाम हुसेन होता. आणि त्यांतर टीम ने त्याला पकडले.

Operation RED DAWN